शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
4
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
5
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
6
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
7
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
8
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
9
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
10
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
11
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
12
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
13
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
14
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
15
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
16
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
17
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
18
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
19
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
20
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
Daily Top 2Weekly Top 5

मिरेगावच्या मुख्याध्यापकाने गाजविले दिल्ली विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत डमदेव कहालकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती आणि त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगारक्षम उपक्रम राबवितात. त्यांच्या या उपक्रमशीलतेची राज्यभरात ख्याती आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । दोन दिवस व्याख्यान, राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत मांडले विचार

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना अलिकडे नाव ठेवले जात आहे. प्रवेशासाठी शिक्षकांना विद्यार्थी शोधावे लागत आहेत. जिल्हा परिषद शाळांची अवस्था सर्वत्र बकाल झाली असताना एका उपक्रमशिल शिक्षकाने आपल्या शाळेचेच नाही तर संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केले. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिषदेत दोन दिवस व्याख्यान देऊन मिरेगावच्या शाळेचा डंका वाजविला.लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत डमदेव कहालकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती आणि त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगारक्षम उपक्रम राबवितात. त्यांच्या या उपक्रमशीलतेची राज्यभरात ख्याती आहे. अशातच राष्ट्रीय शिक्षण नियोजन व प्रशिक्षण संस्थेने देशातील उपक्रमशील शाळांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी डमदेव कहालकर यांनी चित्रफित आणि बुकलेट तयार करून आपल्या शाळेची माहिती दिल्लीच्या निपा संस्थेला पाठविली. त्यांच्या या उपक्रमाने प्रभावित होऊन दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात आयोजित शैक्षणिक संशोधन परिषदेत व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले.दिल्ली येथे गत आठवड्यात झालेल्या या परिषदेत डमदेव कहालकर यांनी देशभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांसमोर व्याख्यान दिले.आपल्या उपक्रमांची माहिती दिली. शाश्वत बदल घडविण्यासाठी कल्पक बुद्धीने काय केले याची माहिती दिली. नैसर्गिक घडामोडीतून विद्यार्थ्यांना कसे शिकविता येते. भौतीक सुविधांचा आग्रह न धरता वर्तमानातून शैक्षणिक कार्य निष्ठेने कसे करता येते याची विस्तृत माहिती त्यांनी मांडली. त्यांच्या या व्याख्यानाने सर्वच अवाक झाले.देशभरातील शिक्षणतज्ज्ञांनी एकमेकांना दिलेली शैक्षणिक शिदोरी मी शेवटपर्यंत सांभाळणार आहे. मला मिळालेली नवी दृष्टी समाजाच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रकाशमान करेल. पुस्तकी ज्ञानासोबत निसर्गाच्या सहवासातून घेतलेले ज्ञान इतरांना प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थी हा घटक महत्वाचा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानगंगा प्रवाहित ठेवणार आहे.- डमदेव कहालकर, मुख्याध्यापक, मिरेगाव.

टॅग्स :delhiदिल्लीuniversityविद्यापीठ