शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

मिरेगावच्या मुख्याध्यापकाने गाजविले दिल्ली विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत डमदेव कहालकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती आणि त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगारक्षम उपक्रम राबवितात. त्यांच्या या उपक्रमशीलतेची राज्यभरात ख्याती आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । दोन दिवस व्याख्यान, राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत मांडले विचार

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना अलिकडे नाव ठेवले जात आहे. प्रवेशासाठी शिक्षकांना विद्यार्थी शोधावे लागत आहेत. जिल्हा परिषद शाळांची अवस्था सर्वत्र बकाल झाली असताना एका उपक्रमशिल शिक्षकाने आपल्या शाळेचेच नाही तर संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केले. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिषदेत दोन दिवस व्याख्यान देऊन मिरेगावच्या शाळेचा डंका वाजविला.लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत डमदेव कहालकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती आणि त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगारक्षम उपक्रम राबवितात. त्यांच्या या उपक्रमशीलतेची राज्यभरात ख्याती आहे. अशातच राष्ट्रीय शिक्षण नियोजन व प्रशिक्षण संस्थेने देशातील उपक्रमशील शाळांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी डमदेव कहालकर यांनी चित्रफित आणि बुकलेट तयार करून आपल्या शाळेची माहिती दिल्लीच्या निपा संस्थेला पाठविली. त्यांच्या या उपक्रमाने प्रभावित होऊन दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात आयोजित शैक्षणिक संशोधन परिषदेत व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले.दिल्ली येथे गत आठवड्यात झालेल्या या परिषदेत डमदेव कहालकर यांनी देशभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांसमोर व्याख्यान दिले.आपल्या उपक्रमांची माहिती दिली. शाश्वत बदल घडविण्यासाठी कल्पक बुद्धीने काय केले याची माहिती दिली. नैसर्गिक घडामोडीतून विद्यार्थ्यांना कसे शिकविता येते. भौतीक सुविधांचा आग्रह न धरता वर्तमानातून शैक्षणिक कार्य निष्ठेने कसे करता येते याची विस्तृत माहिती त्यांनी मांडली. त्यांच्या या व्याख्यानाने सर्वच अवाक झाले.देशभरातील शिक्षणतज्ज्ञांनी एकमेकांना दिलेली शैक्षणिक शिदोरी मी शेवटपर्यंत सांभाळणार आहे. मला मिळालेली नवी दृष्टी समाजाच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रकाशमान करेल. पुस्तकी ज्ञानासोबत निसर्गाच्या सहवासातून घेतलेले ज्ञान इतरांना प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थी हा घटक महत्वाचा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानगंगा प्रवाहित ठेवणार आहे.- डमदेव कहालकर, मुख्याध्यापक, मिरेगाव.

टॅग्स :delhiदिल्लीuniversityविद्यापीठ