शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: September 7, 2015 00:46 IST

कारखाना आजारी दाखवून सुमारे २५०० हजार कामगारांना बेरोजगार करण्याचे षड्यंत्र युनिव्हर्सल फेरो कारखान्याने बीआयएफआर बोर्डासमोर केले.

युनिव्हर्सल कारखाना बंद : बीआयएफआर बोर्डाने फटकारलेतुमसर : कारखाना आजारी दाखवून सुमारे २५०० हजार कामगारांना बेरोजगार करण्याचे षड्यंत्र युनिव्हर्सल फेरो कारखान्याने बीआयएफआर बोर्डासमोर केले. बोर्डाने कारखाना आजारी उद्योगाच्या श्रेणीत येत नाही, असा निर्वाळा देऊन कारखाना पूर्ववत सुरु करा, असे निर्देश दिले. कारखान्यावर १३८ कोटींचे वीज बिल थकीत होते. बी.आय.एफ.आर. बोर्डाने माफ करून ४६ कोटी २० लक्ष २४ हजार ३८० रुपये केले. कंपनी व्यवस्थापनाने ३१५ कामगारांचे ‘क्लोजर नोटीस’ प्रकरणाच्या निकालानंतर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.तुमसरजवळील ‘युनिव्हर्सल फेरो अँड अलाईड केमिकल लिमिटेड’ मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना आहे. सन १९९८ मध्ये कंपनी व्यवस्थापनाने कारखाना आजारी आहे, या यादीत घातला. १७ वर्षापासून हा कारखाना बंदच आहे. सुमारे २५०० कामगार येथे बेरोजगार झाले. मानेकनगर (माडगी) येथील शेतकऱ्यांकडून जमिनीचे विक्रीपत्र करून कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरुपी नोकरी देण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले होते. मात्र व्यवस्थापनाने क्लोजर तथा स्वेच्छानिवृत्ती देऊन प्रथम ८०० व नंतर ३१५ कामगारांना सेवेतून काढले. कामगारांनी नंतर प्रकरण न्यायालयात दाखल केले. कंपनी व्यवस्थापनानेही न्यायालयात प्रकरण दाखल केले. दिल्ली येथील बी.आय.एफ.आर. (बोर्ड आॅफ फायनान्शियल रिकन्ट्रक्शन) येथे याचिका दाखल केली. बोर्डाचे अध्यक्ष बी.एस. मीना तथा सदस्य जे.पी. दुआ यांनी १२ डिसेंबर २०१४ ला कारखाना प्रबंधकांना युनिव्हर्सल फेरो अँड अलाईड केमिकल्स लिमिटेड कारखाना आजारी उद्योगांतर्गत येत नाही. त्यामुळे कारखाना पूर्ववत सुरु करण्याचे निर्देश दिले. वीज वितरण कंपनीचे कारखान्याकडे सुमारे १३८ कोटी वीज बिल थकीत होते. ते माफ करून ४६ कोटी २० लक्ष २४ हजार ३८० रुपये करण्यात आले. कंपनी व्यवस्थापनाने ही रक्कम भरली. वीज वितरण कंपनीने न थकीत प्रमाणपत्र २५ मार्च २०१४ ला दिले. कंपनी व्यवस्थापनाने बी.आय.एफ.आर. बोर्डाला आश्वासन दिले की, ३१५ कामगारांना क्लोजर नोटीस अंतर्गत बरखास्त केले होते. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरु आहे. १५ आॅगस्टला माडगी येथील ग्रामसभेत प्रस्ताव घेऊन निर्णय मंजूर करण्यात आला की, कारखाना तत्काळ सुरु करण्याकरिता भारतीय मजदूर संघाने त्याकरिता प्रयत्न करावे. तसेच एका महिन्यात कंपनी व्यवस्थापनाने मजदूर संघ प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात यावी. या कारखाना परिसरात एकाच ग्रुपचा दुसरा कारखाना आहे. त्याचा याचा परिणाम पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राष्ट्रीय मजदूर मंचचे अध्यक्ष हरिहर मलीक यांनी या संदर्भात राज्याचे कामगार मंत्री, खासदार नाना पटोले, आ.चरण वाघमारे यांचेकडे तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)