शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: September 7, 2015 00:46 IST

कारखाना आजारी दाखवून सुमारे २५०० हजार कामगारांना बेरोजगार करण्याचे षड्यंत्र युनिव्हर्सल फेरो कारखान्याने बीआयएफआर बोर्डासमोर केले.

युनिव्हर्सल कारखाना बंद : बीआयएफआर बोर्डाने फटकारलेतुमसर : कारखाना आजारी दाखवून सुमारे २५०० हजार कामगारांना बेरोजगार करण्याचे षड्यंत्र युनिव्हर्सल फेरो कारखान्याने बीआयएफआर बोर्डासमोर केले. बोर्डाने कारखाना आजारी उद्योगाच्या श्रेणीत येत नाही, असा निर्वाळा देऊन कारखाना पूर्ववत सुरु करा, असे निर्देश दिले. कारखान्यावर १३८ कोटींचे वीज बिल थकीत होते. बी.आय.एफ.आर. बोर्डाने माफ करून ४६ कोटी २० लक्ष २४ हजार ३८० रुपये केले. कंपनी व्यवस्थापनाने ३१५ कामगारांचे ‘क्लोजर नोटीस’ प्रकरणाच्या निकालानंतर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.तुमसरजवळील ‘युनिव्हर्सल फेरो अँड अलाईड केमिकल लिमिटेड’ मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना आहे. सन १९९८ मध्ये कंपनी व्यवस्थापनाने कारखाना आजारी आहे, या यादीत घातला. १७ वर्षापासून हा कारखाना बंदच आहे. सुमारे २५०० कामगार येथे बेरोजगार झाले. मानेकनगर (माडगी) येथील शेतकऱ्यांकडून जमिनीचे विक्रीपत्र करून कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरुपी नोकरी देण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले होते. मात्र व्यवस्थापनाने क्लोजर तथा स्वेच्छानिवृत्ती देऊन प्रथम ८०० व नंतर ३१५ कामगारांना सेवेतून काढले. कामगारांनी नंतर प्रकरण न्यायालयात दाखल केले. कंपनी व्यवस्थापनानेही न्यायालयात प्रकरण दाखल केले. दिल्ली येथील बी.आय.एफ.आर. (बोर्ड आॅफ फायनान्शियल रिकन्ट्रक्शन) येथे याचिका दाखल केली. बोर्डाचे अध्यक्ष बी.एस. मीना तथा सदस्य जे.पी. दुआ यांनी १२ डिसेंबर २०१४ ला कारखाना प्रबंधकांना युनिव्हर्सल फेरो अँड अलाईड केमिकल्स लिमिटेड कारखाना आजारी उद्योगांतर्गत येत नाही. त्यामुळे कारखाना पूर्ववत सुरु करण्याचे निर्देश दिले. वीज वितरण कंपनीचे कारखान्याकडे सुमारे १३८ कोटी वीज बिल थकीत होते. ते माफ करून ४६ कोटी २० लक्ष २४ हजार ३८० रुपये करण्यात आले. कंपनी व्यवस्थापनाने ही रक्कम भरली. वीज वितरण कंपनीने न थकीत प्रमाणपत्र २५ मार्च २०१४ ला दिले. कंपनी व्यवस्थापनाने बी.आय.एफ.आर. बोर्डाला आश्वासन दिले की, ३१५ कामगारांना क्लोजर नोटीस अंतर्गत बरखास्त केले होते. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरु आहे. १५ आॅगस्टला माडगी येथील ग्रामसभेत प्रस्ताव घेऊन निर्णय मंजूर करण्यात आला की, कारखाना तत्काळ सुरु करण्याकरिता भारतीय मजदूर संघाने त्याकरिता प्रयत्न करावे. तसेच एका महिन्यात कंपनी व्यवस्थापनाने मजदूर संघ प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात यावी. या कारखाना परिसरात एकाच ग्रुपचा दुसरा कारखाना आहे. त्याचा याचा परिणाम पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राष्ट्रीय मजदूर मंचचे अध्यक्ष हरिहर मलीक यांनी या संदर्भात राज्याचे कामगार मंत्री, खासदार नाना पटोले, आ.चरण वाघमारे यांचेकडे तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)