शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

अशिक्षित शेतकऱ्याने फुलविली मिरचीची तंत्रशुद्ध बाग

By admin | Updated: December 9, 2014 22:45 IST

शेती परवडत नाही. उत्पादनानुसार भाव मिळत नाही. शेतीत पिक घेणे तोट्यातच असते. अशी बहुतेक शेतकऱ्यांची ओरड असते. परंतु, पारंपरिक पिकांना फाटा देण्याची हिंमत सिरसोली (कान्हळगाव) येथील

राजू बांते - मोहाडी शेती परवडत नाही. उत्पादनानुसार भाव मिळत नाही. शेतीत पिक घेणे तोट्यातच असते. अशी बहुतेक शेतकऱ्यांची ओरड असते. परंतु, पारंपरिक पिकांना फाटा देण्याची हिंमत सिरसोली (कान्हळगाव) येथील अशिक्षित शेतकरी गणेश मोहारे यांनी मोठ्या जिद्दीने तंत्रशुद्ध पद्धतीने मिरचीची शेती फुलविली आहे.भंडारा जिल्ह्यातील शेतकरी भाताची पारंपारीक शेती करतात. त्यानंतर काही शेतकरी गहू पीक घेतात. भात पिकांचा हंगाम येईपर्यंत जमीन कोरडीच राहते. जांब क्षेत्रात बागायती शेती बऱ्याच दिवसापासून केली जाते. आज स्थिती वेगळी आहे. मोहाडी तालुक्यात सिरसोली, खुटसावरी, खमारी, बेटाळा या परिसरात बरेच शेतकरी बागायती शेतीकडे वळले आहे. तरीही बागायती शेती पारंपरिक पद्धतीने शेतकरी करीत आहेत. अशाच एका अशिक्षित शेतकऱ्याने मिरचीची बाग फुलविली आहे. खर्च वजा जाता २५ ते ३५ लाखापर्यंत रुपये घरी नेता येतील इथपर्यंत त्यांनी प्रगती साधली आहे. सिरसोली कान्हळगाव येथील शेतकरी गणेश मोहारे यांनी आधुनिक पद्धतीने मिरचीची शेती विकसीत करून तो शेतकरी तालुक्यात रोल मॉडेल बनला आहे. या शेतकऱ्याला एवढ्या उंचीवर नेण्याच्या श्रेयात तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, कृषी सहाय्यक गणेश शेंडे यांचा मोठा वाटा आहे. गणेश मोहारे यांनी बागायती शेतीत बरेच उतारचढाव बघितले आहेत. मागीलवर्षी त्यांचे मिरचीचे ५० टक्के पिक किडीने वाया गेले. तरीही न खचता कीड कशी लागली याची कारणे शोधली. पुढील पिक खराब होवू नये, यासाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांना शेतीवर आणले. यावर्षी मोहारे यांनी प्रयोग म्हणून पारंपारिक व तंत्रशुद्ध पद्धतीने मिरचीची लागवड केली. आत्मा अंतर्गत सिरसोली येथे मिरची लागवडीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाचा लाभ घेत मोहारे यांनी ९ एकर शेतीत ठिंबक संच बसविले आहेत. त्यात सात एकर क्षेत्रात मिरचीचे पीक प्रत्येकी एक एकरात भेंडी व कारली, चवळीचे पीक लावले आहे. वरंभा पद्धतीने मिरच्या शेतीची लागवड केल्याने थोड्याच दिवसात मिरचीचे पीक हाती आले आहे. पारंपारिक पद्धतीने केलेल्या मिरचीला केवळ फुल आले आहे. एक महिन्यात तोडणीवर येणार मिरची तंत्रशुद्ध पद्धतीने १५ दिवसाच्या अंतराने तोडणीवर येत आहे. आजपर्यंत गणेश मोहारे यांनी पाच लक्ष रुपयाची मिरचीचे उत्पादन काढले आहे. खर्च ंवजा जाता मिरचीची बाग ३० लक्ष रुपये नफा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रगतशिल शेतकऱ्याची तंत्रशुद्ध मिरचीची शेती बघण्यासाठी नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक विजय धावटे सिरहोली येथे आले होते. या प्रगतशिल शेतकऱ्याचा सन्मान यावर्षी जिल्हा परिषद येथे शेतीमित्र पुरस्काराने करण्यात आला आहे.