शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मॉईल प्रशासनाला ५ जूनपर्यंत अल्टीमेटम

By admin | Updated: May 30, 2017 00:28 IST

डोंगरी मॉईल प्रशासनाच्या विरोधात सतत ८५ दिवसांपासून पिडीत कुटुंबांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी ....

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : डोंगरी मॉईल प्रशासनाच्या विरोधात सतत ८५ दिवसांपासून पिडीत कुटुंबांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी योग्य त्या मागार्ने स्थानिक ग्रामस्थ तथा शेतकऱ्यांनी १५ मे पासून आमरण उपोषण मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरु केले आहे. तत्पूर्वी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता ५ मार्च पासून साखळी उपोषण सुरु केले आहे. परंतु या पिडीत कुटुंबांचे प्रशासनाने सुद्धा दखल घेतली नाही. शिवसेनेने पिडीत उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांचा व्यथा जाणून घेतल्या. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी मॉईल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. परंतु प्रश्न न सोडवता निघून गेले. शिवसेनेनी खाणग्रस्त पिडीत कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी गंभीर इशारा दिला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी तिसरी बैठक २८ मे रोजी पार पडलीे. या बैठकित ५ जूनपर्यंत खाणग्रस्त पिडीत कुटुंबांच्या मागण्या निकाली काढण्याचे ठोस आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी दिले. मागण्यांमध्ये ब्लास्टिंगच्या रोज झटक्यामुळे परिसरातील राहत असलेल्या घरांच्या भिंतीना तडे गेले असल्याने त्या कुटुंबांचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्यात यावे, पिडीत कुटुंबांच्या नौकऱ्या देण्यात यावीे, मॉईलच्या उत्खनामुळे निर्माण झालेले मातीचे ढिगारे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी मॉईल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी फाकनिक, भट्टाचार्य, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, नायब तहसीलदार गोंड उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी पिडीत कुटुंबियांची चर्चा केली. संबंधित मागण्या ५ जूनपर्यंत मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. चर्चेदरम्यान उपसभापती शेखर कोतपल्लीवार, सुधाकर कारेमोरे, प्रकाश पारधी, दिनेश पांडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, नरेश उचीबघेले, प्रकाश लसुन्ते, मनोज चौबे, नितीन सेलोकर, जगदीश त्रिभुवनकर, किशोर यादव, कृपाशंकर डहरवाल आदी शिवसैनिक उपस्थित होते.