शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

तुकडोजी वॉर्ड परिसरातील प्रकार : पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

अनेक वार्डात हीच स्थिती दिसून येत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे. नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने नाल्याही आता धोकादायक झाल्या आहेत. पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या दुर्लक्षाने येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभंडारा शहरात रस्त्यांसह नाल्यांची दूरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील तुकडोजी वॉर्डाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रस्त्यासह पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अनेक वार्डात हीच स्थिती दिसून येत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे.नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने नाल्याही आता धोकादायक झाल्या आहेत. पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या दुर्लक्षाने येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.अनेक वषार्चा जुना सिंमेंटचा रस्ता असल्यामुळे रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे गिट्टीही उखडलेली आहे.याच परिसरात एलआयसी ऑफिस, मत्स्य कार्यालय, पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, दुय्यम निबंधक तसेच पोलीस अधिक्षक, तहसील कार्यालय असल्याने येथे परिसरात नेहमीच वर्दळ असते.रस्त्यावरून पायदळ, सायकलस्वार, मोटारसायकल व चारचाकी वाहने सतत ये - जा करतात. यामुळे मोटार सायकलसह सायकलस्वारांना वाहने चालविणे कठीण झाले आहे.ज्या रस्त्यावरुन दिवसभरात काही वर्दळ नसते असे रस्त्येही सिमेंटचे बनविले आहेत. परंतु सततच्या रहदारीच्या मार्गावर विविध सुविधांपासून दुर्लक्षित असलेल्या या वार्डातील नागरिकांवर नगर परिषद प्रशासनाकडून अनेक वर्षापासून अन्याय होत आहे.अनेक वषार्पासून या रस्त्याचे दुसऱ्यांदा सिमेंटीकरणाचे काम होऊ शकले नाही, हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. तसेच येथील नाल्याही मागील कित्येक वर्षापासून मोडकळीला आल्या आहेत.अनेकदा पाणी या रस्त्यावरच साचलेले असते. येथे नळयोजना व नाल्यांची योग्य सोय नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेत.हीच अवस्था सिव्हिल लाईन परिसराची झाली आहे. ‘अ’ वर्गाच्या दर्जाचे कर नगर परिषदेकडून वसूल केले जात असतांना सुविधा मात्र काहीच दिल्या जात नाही. या समस्याबाबत वारंवार तक्रारी देवून झाल्या परंतू तुकडोजी वाडार्तील एलआयसी ऑफिसमागील गल्लीची स्थिती अनेक वर्षापासून जैसे थे च आहे.जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे येथील रहिवाशांमध्ये नगर परिषदेविरोधात संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान