शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
3
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
4
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
5
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
6
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
7
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
8
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
9
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
10
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
11
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
12
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
13
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
14
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
15
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
16
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
17
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
18
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
19
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
20
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

तुकडोजी वॉर्ड परिसरातील प्रकार : पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

अनेक वार्डात हीच स्थिती दिसून येत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे. नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने नाल्याही आता धोकादायक झाल्या आहेत. पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या दुर्लक्षाने येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभंडारा शहरात रस्त्यांसह नाल्यांची दूरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील तुकडोजी वॉर्डाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रस्त्यासह पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अनेक वार्डात हीच स्थिती दिसून येत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे.नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने नाल्याही आता धोकादायक झाल्या आहेत. पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या दुर्लक्षाने येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.अनेक वषार्चा जुना सिंमेंटचा रस्ता असल्यामुळे रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे गिट्टीही उखडलेली आहे.याच परिसरात एलआयसी ऑफिस, मत्स्य कार्यालय, पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, दुय्यम निबंधक तसेच पोलीस अधिक्षक, तहसील कार्यालय असल्याने येथे परिसरात नेहमीच वर्दळ असते.रस्त्यावरून पायदळ, सायकलस्वार, मोटारसायकल व चारचाकी वाहने सतत ये - जा करतात. यामुळे मोटार सायकलसह सायकलस्वारांना वाहने चालविणे कठीण झाले आहे.ज्या रस्त्यावरुन दिवसभरात काही वर्दळ नसते असे रस्त्येही सिमेंटचे बनविले आहेत. परंतु सततच्या रहदारीच्या मार्गावर विविध सुविधांपासून दुर्लक्षित असलेल्या या वार्डातील नागरिकांवर नगर परिषद प्रशासनाकडून अनेक वर्षापासून अन्याय होत आहे.अनेक वषार्पासून या रस्त्याचे दुसऱ्यांदा सिमेंटीकरणाचे काम होऊ शकले नाही, हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. तसेच येथील नाल्याही मागील कित्येक वर्षापासून मोडकळीला आल्या आहेत.अनेकदा पाणी या रस्त्यावरच साचलेले असते. येथे नळयोजना व नाल्यांची योग्य सोय नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेत.हीच अवस्था सिव्हिल लाईन परिसराची झाली आहे. ‘अ’ वर्गाच्या दर्जाचे कर नगर परिषदेकडून वसूल केले जात असतांना सुविधा मात्र काहीच दिल्या जात नाही. या समस्याबाबत वारंवार तक्रारी देवून झाल्या परंतू तुकडोजी वाडार्तील एलआयसी ऑफिसमागील गल्लीची स्थिती अनेक वर्षापासून जैसे थे च आहे.जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे येथील रहिवाशांमध्ये नगर परिषदेविरोधात संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान