शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुकडोजी वॉर्ड परिसरातील प्रकार : पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

अनेक वार्डात हीच स्थिती दिसून येत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे. नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने नाल्याही आता धोकादायक झाल्या आहेत. पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या दुर्लक्षाने येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभंडारा शहरात रस्त्यांसह नाल्यांची दूरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील तुकडोजी वॉर्डाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रस्त्यासह पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अनेक वार्डात हीच स्थिती दिसून येत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे.नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने नाल्याही आता धोकादायक झाल्या आहेत. पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या दुर्लक्षाने येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.अनेक वषार्चा जुना सिंमेंटचा रस्ता असल्यामुळे रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे गिट्टीही उखडलेली आहे.याच परिसरात एलआयसी ऑफिस, मत्स्य कार्यालय, पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, दुय्यम निबंधक तसेच पोलीस अधिक्षक, तहसील कार्यालय असल्याने येथे परिसरात नेहमीच वर्दळ असते.रस्त्यावरून पायदळ, सायकलस्वार, मोटारसायकल व चारचाकी वाहने सतत ये - जा करतात. यामुळे मोटार सायकलसह सायकलस्वारांना वाहने चालविणे कठीण झाले आहे.ज्या रस्त्यावरुन दिवसभरात काही वर्दळ नसते असे रस्त्येही सिमेंटचे बनविले आहेत. परंतु सततच्या रहदारीच्या मार्गावर विविध सुविधांपासून दुर्लक्षित असलेल्या या वार्डातील नागरिकांवर नगर परिषद प्रशासनाकडून अनेक वर्षापासून अन्याय होत आहे.अनेक वषार्पासून या रस्त्याचे दुसऱ्यांदा सिमेंटीकरणाचे काम होऊ शकले नाही, हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. तसेच येथील नाल्याही मागील कित्येक वर्षापासून मोडकळीला आल्या आहेत.अनेकदा पाणी या रस्त्यावरच साचलेले असते. येथे नळयोजना व नाल्यांची योग्य सोय नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेत.हीच अवस्था सिव्हिल लाईन परिसराची झाली आहे. ‘अ’ वर्गाच्या दर्जाचे कर नगर परिषदेकडून वसूल केले जात असतांना सुविधा मात्र काहीच दिल्या जात नाही. या समस्याबाबत वारंवार तक्रारी देवून झाल्या परंतू तुकडोजी वाडार्तील एलआयसी ऑफिसमागील गल्लीची स्थिती अनेक वर्षापासून जैसे थे च आहे.जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे येथील रहिवाशांमध्ये नगर परिषदेविरोधात संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान