शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

मासे पकडणे अंगलट, दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 11:00 IST

भंडारा जिल्ह्यातील मानेगावात आले होते बिऱ्हाडासोबत

लाखनी (जि. भंडारा) : बिऱ्हाडात मुक्कामास असलेल्यांपैकी दोन तरुण मासोळी पकडण्यासाठी मानेगाव शिवारातील गाव तलावात गेले होते. तेथे बुडून त्यांचा मृत्यू झाला. बिरजूसिंग उदयसिंग चित्तोडिया (२३) व क्रिष्णा रामसिंग चित्तोडिया (१८) (दोन्ही रा.आर्वी, जि.वर्धा. हल्ली मुक्काम मानेगाव /सडक) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

मानेगाव /सडक शिवारात आयुर्वेदिक औषधी विक्रीसाठी आर्वी येथील ८-१० कुटुंबीय आपल्या बिऱ्हाडासह काही दिवसांपूर्वी वास्तव्यास आले आहेत. आंघोळीसाठी गाव तलावात जात असल्याने त्यांना गाव तलावाची माहिती होती. मंगळवारला लाखनी येथील आठवडी बाजार असल्याने तंबूतील काही लोक औषधी विक्रीसाठी गेले होते. तर बिरजूसिंग व क्रिष्णा आपल्या तंबूवर होते. ते मासोळी पकडण्यासाठी गाव तलावात गेले होते. मासोळी पकडत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.

ही बाब तेथे असलेल्या एका इसमाच्या लक्षात आली. त्याने आरडाओरड केली. बघ्यांची व गावकऱ्यांची गर्दी झाली. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक संजय कोरचे, सोनवणे, पोलिस हवालदार नीलेश रामटेके, गौरीशंकर कडव, पोलिस शिपाई सुनील मेश्राम पोहोचले. तपास लाखनी पोलिस करीत आहेत.

दोन दिवसांनंतर होते बिरजूचे लग्न

गाव तलावात बुडून मृत पावलेला बिरजूसिंग चित्तोडिया याचे अवघ्या दोन दिवसांनंतर बिऱ्हाडतच लग्न होणार होते. बिरजूच्या आकस्मिक मृत्यूने वर-वधू पक्षासह कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेbhandara-acभंडारा