शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांपासून २३ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:45 IST

तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले.

ठळक मुद्देगोबरवाही पाणीपुरवठा योजना : लोकार्पणानंतर केवळ तीन महिनेच मिळाले पाणी

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले. आता उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे.तुमसर तालुक्यात गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला २० वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली. या योजनेचे भूमिपूजन १९९८ मध्ये तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ही योजना ३३ कोटी रूपयांची होती. आता या योजनेतून काम होवून बरीच वर्ष लोटली. परंतु गोबरवाही परिसरातील २३ गावांना अद्यापही पाणीपुरवठा झाला नाही. ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे.बावनथडी प्रकल्पाला जोडून गोबरवाही, पवनारखारी, गणेशपूर, येदरबुची, सुंदरटोला या परिसरातील आदिवासी बहुल गावांना पाणीपुरवठा केला जाणार होता. २० वर्षांचा मोठा कालखंड लोटूनही गावे तहाणलेलीच आहे. गतवर्षी लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. मात्र केवळ तीन महिनेच ही पाणीपुरवठा योजना सुरळीत राहिली. त्यानंतर ही योजना बंद पडली ती कायमची. येथे कंत्राटदार व शासनात आर्थिक व्यवहारात तफावत निर्माण झाल्याने पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहे. योजना पुर्णत्वात जावूनही गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. रात्री-बेरात्री महिलांना पाण्यासाठी जागावे लागते.गावातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. हातपंप आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यातच अद्यापही जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे जलस्त्रोत कधी वाढणार आणि मुबलक पाणी कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. २३ गावातील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणाºया या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते पंकज कारेमोरे यांनी केली आहे.नियोजनाचा अभाव२३ गावात भूमिगत जलवाहिनी, नळबांधणी, आलेसूर येथील जलशुद्धीकरण केंद्र, बावनथडी प्रकल्पात योजनेचे पंपहाऊस व इतर महत्वाची कामे करण्यात आली आहे. परंतु नियोजनाअभावी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यास अडचणी येत आहे. संबंधित विभागात नियोजनाचा अभाव दिसत असून याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई