शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांपासून २३ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:45 IST

तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले.

ठळक मुद्देगोबरवाही पाणीपुरवठा योजना : लोकार्पणानंतर केवळ तीन महिनेच मिळाले पाणी

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले. आता उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे.तुमसर तालुक्यात गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला २० वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली. या योजनेचे भूमिपूजन १९९८ मध्ये तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ही योजना ३३ कोटी रूपयांची होती. आता या योजनेतून काम होवून बरीच वर्ष लोटली. परंतु गोबरवाही परिसरातील २३ गावांना अद्यापही पाणीपुरवठा झाला नाही. ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे.बावनथडी प्रकल्पाला जोडून गोबरवाही, पवनारखारी, गणेशपूर, येदरबुची, सुंदरटोला या परिसरातील आदिवासी बहुल गावांना पाणीपुरवठा केला जाणार होता. २० वर्षांचा मोठा कालखंड लोटूनही गावे तहाणलेलीच आहे. गतवर्षी लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. मात्र केवळ तीन महिनेच ही पाणीपुरवठा योजना सुरळीत राहिली. त्यानंतर ही योजना बंद पडली ती कायमची. येथे कंत्राटदार व शासनात आर्थिक व्यवहारात तफावत निर्माण झाल्याने पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहे. योजना पुर्णत्वात जावूनही गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. रात्री-बेरात्री महिलांना पाण्यासाठी जागावे लागते.गावातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. हातपंप आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यातच अद्यापही जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे जलस्त्रोत कधी वाढणार आणि मुबलक पाणी कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. २३ गावातील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणाºया या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते पंकज कारेमोरे यांनी केली आहे.नियोजनाचा अभाव२३ गावात भूमिगत जलवाहिनी, नळबांधणी, आलेसूर येथील जलशुद्धीकरण केंद्र, बावनथडी प्रकल्पात योजनेचे पंपहाऊस व इतर महत्वाची कामे करण्यात आली आहे. परंतु नियोजनाअभावी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यास अडचणी येत आहे. संबंधित विभागात नियोजनाचा अभाव दिसत असून याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई