शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

वीस वर्षांपासून २३ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:45 IST

तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले.

ठळक मुद्देगोबरवाही पाणीपुरवठा योजना : लोकार्पणानंतर केवळ तीन महिनेच मिळाले पाणी

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले. आता उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे.तुमसर तालुक्यात गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला २० वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली. या योजनेचे भूमिपूजन १९९८ मध्ये तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ही योजना ३३ कोटी रूपयांची होती. आता या योजनेतून काम होवून बरीच वर्ष लोटली. परंतु गोबरवाही परिसरातील २३ गावांना अद्यापही पाणीपुरवठा झाला नाही. ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे.बावनथडी प्रकल्पाला जोडून गोबरवाही, पवनारखारी, गणेशपूर, येदरबुची, सुंदरटोला या परिसरातील आदिवासी बहुल गावांना पाणीपुरवठा केला जाणार होता. २० वर्षांचा मोठा कालखंड लोटूनही गावे तहाणलेलीच आहे. गतवर्षी लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. मात्र केवळ तीन महिनेच ही पाणीपुरवठा योजना सुरळीत राहिली. त्यानंतर ही योजना बंद पडली ती कायमची. येथे कंत्राटदार व शासनात आर्थिक व्यवहारात तफावत निर्माण झाल्याने पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहे. योजना पुर्णत्वात जावूनही गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. रात्री-बेरात्री महिलांना पाण्यासाठी जागावे लागते.गावातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. हातपंप आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यातच अद्यापही जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे जलस्त्रोत कधी वाढणार आणि मुबलक पाणी कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. २३ गावातील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणाºया या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते पंकज कारेमोरे यांनी केली आहे.नियोजनाचा अभाव२३ गावात भूमिगत जलवाहिनी, नळबांधणी, आलेसूर येथील जलशुद्धीकरण केंद्र, बावनथडी प्रकल्पात योजनेचे पंपहाऊस व इतर महत्वाची कामे करण्यात आली आहे. परंतु नियोजनाअभावी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यास अडचणी येत आहे. संबंधित विभागात नियोजनाचा अभाव दिसत असून याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई