शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

तुमसर-बपेरा राज्यमार्ग चौपदरीकरण होणार

By admin | Updated: October 30, 2015 00:52 IST

नागपुरातील मिहान कार्गो हब व मध्यप्रदेशातील कान्हा किसली अभयारण्याला विकसीत करण्यात येत असल्याने ...

राज्य शासनाला प्रस्ताव : कान्हा किसली अभयारण्याला जोडणाररंजित चिंचखेडे चुल्हाडनागपुरातील मिहान कार्गो हब व मध्यप्रदेशातील कान्हा किसली अभयारण्याला विकसीत करण्यात येत असल्याने राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. तुमसर बपेरा राज्य मार्ग चौपदरीकरण करणाचे प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आले आहे.मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याला जोडणारा तुमसर बपेरा राज्य मार्ग २७१ आहे. बपेरा गाव भंडारा जिल्ह्याच्या अंतीम टोकावर असून बावनथडी नदी ओलांडताच मध्यप्रदेश् राज्याच्या सीमेला सुरुवात होत आहे. या नदीवरील पुलाचे बांधकाम महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्याच्या संयुक्त निधीतून झाले आहे. मध्यप्रदेशत असणाऱ्या कान्हा किसली अभयारण्याला विकसीत करण्याचे प्रयत्न राज्य शासन करीत आहे. अन्य राज्यांना जोडणारी राज्य मार्गाचे चौपदरीकरणाचे कामांना गती देण्यात आली आहे. मोवाड ते बालाघाट या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असल्याने तुमसर बपेरा राज्य मार्गाचे विकास याच धर्तीवर केले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नागपुरात मिहान आणि कार्बो हबच्या कामांना गती देण्यात आली असल्याने नजीकच्या सीमावर्ती राज्याची शहरे राज्य मार्गानी जोडली जाणार आहेत. विकसीत कार्यात अडथळे निर्माण होणार नाही. या करिता कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यातच मध्यप्रदेशच्या राज्य शासनाने मोवाड बालाघाट मार्गाचे चौपदरीकरणा तथा रुंदीकरणाचे कामे सुरु केल्याने बपेरा तुमसर राज्य मार्गाच्या रुंदीकरणाला महाराष्ट्र शासन हिरवा कंदिल देणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात मार्गाचे सर्र्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.तुमसर शहरात राज्य मार्ग निर्मितीला अडथळा असला तरी, या आधी बायपास मार्गाचे नियोजन तयार करण्यात आले आहे. यामुळे मार्गाची पुर्नबांधणी, रुंदीकरण, चौपदरीकरण तथा पुलाचे बांधकाम मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. तुमसर बपेरा राज्य मार्ग चौपदरीकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाला सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सादर करण्यात आलेला आहे. यामुळे प्रस्तावाला मंजुरी मिळताच पुढील प्रक्रियांना सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान दोन्ही राज्यात एकाच पक्षाचे सरकार असून मध्यप्रदेश शासनाने मोवाड बालाघाट राज्य मार्गाला हिरवा कंदिल दिल्याने बपेरा तुमसर राज्य मार्गाला मंजुरी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु तुर्तास या राज्य मार्ग निर्मिती व चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नसून प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन असल्याची माहिती मिळाली आहे.सिहोरा परिसरात धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणामुळे गोंदिया शहराला जोडणारे अंतर कमी झाले आहे. धरणावरून दुहेरी वाहतूक सुरु आहे. यामुळे गोंदिया रामटेक शहराला थेट जोडणारा हा धरण महत्वपूर्ण ठरत आहे. या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी सिहोरा गावातून मार्ग विकसीत केला जाणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती. या दिशेने मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु नंतर माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक. रस्ते विकासाला ब्रेक लावण्यात आला आहे. यामुळे अरुंद रस्त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. वांगी, वाहनी गावानजीक या मार्गावरून ये जा करताना अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकात कमालीची दहशत निर्माण होत आहे. शासनस्तरावर रस्ते, राज्य मार्ग विकासाला मंजुरी देण्याची मागणी होत आहे.