शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बोगस शेतकऱ्यांना तुमसरच्या तहसीलदारांनी बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:56 IST

अनुदान परत करा : सुकळी नकुलच्या यादीत घोळ

रंजित चिंचखेडेलोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : पूरग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र करण्यात आली. ही बाब गावातील शेतकऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार दिली. चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर बोगस शेतकऱ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावली आहे. शासन स्तरावरून दिले जाणारे अनुदान तत्काळ परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही नोटीस प्राप्त होताच शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. काही शेतकऱ्यांनी शासनाला निधी परत केल्याची माहिती देण्यात आली आहे.

गत सप्टेंबर महिन्यात पुराचे पाणी शिरले होते. महसूल विभागाने पूरग्रस्त शेती आणि धान पिकांचे सर्वेक्षण केले होते. राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत घोषित केली आहे. हेक्टरी आर्थिक मदत शेतकऱ्यांना डीबीटीअंतर्गत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांचे बचत खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात येत आहे. ठसुकळी नकुल गावात पूरग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत प्रसिद्ध करण्यात आली नाही. ज्या शेतकऱ्यांचे शेत शिवारात दूरवर पुराचे पाणी पोहचले नाही. अशा शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध यादीत आहेत. याशिवाय ज्यांचे नावे शेती नाही, अशा शेतकऱ्यांना ४८ हजार ६०० रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

पती, पत्नी, सासू, सासरे यांना लागली लॉटरीएकाच कुटुंबातील पती, पत्नी, सासू आणि सासरे यांना प्रत्येकी ४८ हजार ६०० रुपयांची लॉटरी लागली आहे. हे शेतकरी गावातील शेतकरी नाहीत. मोठा घबाड करण्याचा प्रयत्न झाला आहे. ०.७७ आर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना लॉटरी लागली नाही, त्यांना मात्र फक्त आश्वासनांचे गाजर दाखविण्यात आले आहे. अशांना लाभ मिळणार की नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

गावातील यादीत आहे ३० ते ४० लाखांचा घोळगावातील यादीत ३० ते ४० लाखांचा घोळ असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे तुमसर तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र तुरकर यांनी दिली होती. लेखी आणि तोंडी तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांनी चौकशी केली असता, धक्कादायक माहिती निदर्शनास आली. पूरग्रस्तांच्या यादीत गडबड असल्याचे दिसून आले आहे. अर्धेपेक्षा अधिक बोगस शेतकरी असल्याचे निदर्शनास आले आहे.

बाहेर गावातील शेतकऱ्यांना अनुदानसुकळी नकुल गावाच्या पूरग्रस्त यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे आली आहेत. त्यांच्या खात्यात अनुदान वळते करण्यात आले आहेत. ही नावे आली असल्याने संशय बळावला आहे. या शेतकऱ्यांना अनुदान परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुकळी नकुल येथील वंचित शेतकऱ्यांनी केली आहे.

५ मार्चला अशा बोगस शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहेसुरूवातीच्या काळातच परफेक्ट यादी तयार करण्यात आली असती तर आज ही वेळ उदभवली नसती, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

"माझी शेती नदीच्या पात्राच्या लगत आहे. गावाच्या दिशेने पुराची सुरुवात माझ्याच शेतीतून होते. संपूर्ण धानाचे पीक पुरात सडले होते, परंतु मदत तोडकी देण्यात आली आहे. नदीपासून ३०० मिटर अंतरावर पूर शिरले नसताना बोगस शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. दोषींवर कारवाई अन् वंचितांना न्याय मिळाले पाहिजे."- महेंद्र पारधी, नुकसानग्रस्त शेतकरी, सुकळी-नकुल.

टॅग्स :bhandara-acभंडाराtumsar-acतुमसर