शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

तुमसर-नाकाडोंगरी राज्यमार्गाचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

मध्यप्रदेश व महाराष्ट्रला जोडणारा राज्यमार्ग हा अख्या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात महत्वाचा डांबरी रस्ता १५ वर्षापूर्वी करण्यात आला होता. रस्त्यावर ना खड्डे पडले ना ही तो उखडला गेला होता. त्यामुळे या मार्गाची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमत धोरणामुळे त्या रस्त्यावर गरज नसतानाही डांबराचा मुलामा चढविण्यात आला.

ठळक मुद्देअपघाताच्या घटनेत वाढ : जनक्षोभाचा भडका उडणार

लोकमत न्यूज नेटवर्कतुुमसर : तालुक्यातील क्रमांक एकचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या तुमसर नाकाडोंगरी राज्यमार्गावर सुंदरटोला गाव शिवारात व परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले असून रस्त्याचे पूर्णत: विद्रुपीकरण झाले आहे. परिणामी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून किरकोळ अपघाताच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मध्यप्रदेश व महाराष्ट्रला जोडणारा राज्यमार्ग हा अख्या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात महत्वाचा डांबरी रस्ता १५ वर्षापूर्वी करण्यात आला होता. रस्त्यावर ना खड्डे पडले ना ही तो उखडला गेला होता. त्यामुळे या मार्गाची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमत धोरणामुळे त्या रस्त्यावर गरज नसतानाही डांबराचा मुलामा चढविण्यात आला. या आंतरराज्य मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात.हा मार्ग वर्दळीचा आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यातच रस्ता उखडला गेला व पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच किरकोळ अपघाताच्या घटनादेखील वाढल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. प्रशासन या मार्गावर मोठ्या अपघाताची वाट बघत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. बांधकाम विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अपघातात वाढतालुक्यातील सर्वात सुंदर अशा रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. वाहनांच्या नुकसानीबरोबरच नागरिकांच्या अपघाताची संख्येत वाढ झाली आहे. आता तरी प्रशासनाने गंभीर अपघाताची वाट न पाहता रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा जनक्षोभाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक