शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:34 IST

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या बारीक वाणांची निवड करुन आपल्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन भंडाराचे उपविभागीय कृषि अधिकारी मिलिंद लाड यांनी केले.

ठळक मुद्दे मिलिंद लाड : भंडारा येथे खरीप हंगाम आढावा बैठक, नियोजन करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या बारीक वाणांची निवड करुन आपल्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन भंडाराचे उपविभागीय कृषि अधिकारी मिलिंद लाड यांनी केले.पंचायत समिती सभागृह, भंडारा येथे सन २०१९- २० वर्षाकरीता आयोजित खरीप हंगाम आढावा सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद कृषी अधिकारी संतोष डाबरे, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, कृषी विस्तार अधिकारी लांजेवार, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, कृषी अधिकारी पिसे, शहारे, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.मिलींद लाड म्हणाले, जिल्ह्यात पावसाची अनियमितता, कीड रोगांच्या प्रादुर्भावानुसार वाढलेली महागाई लक्षात घेता खरिप हंगामामध्ये कृषी विकास यंत्रणेने बारीक भात वाणाची म्हणजेच १२० ते १२५ दिवसात येणाºया वाणाची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केल्यास शेतकऱ्यांचा उत्पादनावरील खर्च कमी होवून शेतकºयांची आर्थिक उन्नती होईल, असे सांगितले.कार्यक्रमाचे उद्घाटक भंडारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, संतोष डाबरे म्हणाले, कृषीसेवा केंद्रधारक हा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील महत्वाचा दूवा असून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा देण्याचे काम कृषी सेवा केंद्र धारकांचे आहे.त्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करुन चांगल्या प्रतीचे गुणवत्तापूर्ण निविदा शेतकऱ्यांना पुरवठा करा, फसवणुकीचे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.भंडारा तालुका कृषि अधिकारी, अविनाश कोटांगले यांनी आपल्या प्रमुख उपस्थितीत कृषी सेवाकेंद्र धारकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यात शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बी-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशकांंचा पुरवठा व्हावा यासाठी गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथक तयार केले आहे. या पथकाच्या विविध ठिकाणी अचानक भेटी होणार असून शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले.पवनी पंंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी लांजेवार, भंडारा पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी शहारे, कृषी अधिकारी पिसे, तालुका कृषी अधिकारी झोडपे, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, पहेलाचे पर्यवेक्षक होमराज धांडे, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कृषी यंत्रणा खरीप हंगामास सज्जकमी कालावधीचे म्हणजेच १२० ते १२५ दिवसांच्या कालावधीत अधिक उत्पादन देणाºया वाणांची मार्गदर्शिका कृषी विभागाने तयार केली आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावपातळीवर शेतकऱ्यांना २५ मे पासून खरीप सभेद्वारे कमी कालावधीतील जास्त उत्पादन देणाऱ्या भाताच्या वाणांबद्दल जनजागृतीच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षीत केले जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड यांनी दिली. कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करुन प्रशिक्षणाला येणे बंधनकारक असल्याच्या सूचना त्यांनी उपस्थित कर्मचाºयांना दिल्या.गावनिहाय शेतीशाळाप्रशिक्षीत कर्मचाऱ्यांमार्फत गावतपाळीवर होणाऱ्या खरीपातील शेतीशाळा हे कृषी विस्तारांचे, शेतकऱ्यांच्या प्रगतीसोबतच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नवाढीसाठी , जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याची प्रतिक्रिया तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेती