शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

नळयोजना ठरली कुचकामी

By admin | Updated: June 13, 2015 00:41 IST

बरबसपुरा गावात सात वर्षानंतर पूर्णत्वास आलेली नळ योजना सुरू होताच कुचकामी ठरली.

तांत्रिक विभागाचे दुर्लक्ष : सात वर्षानंतर पूर्णत्वास येऊनही नळयोजना बंदकाचेवानी : बरबसपुरा गावात सात वर्षानंतर पूर्णत्वास आलेली नळ योजना सुरू होताच कुचकामी ठरली. पाण्याच्या समस्येकरिता विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसात या नळ योजनेचे पाणी नागरिकांना मिळत नाही. तांत्रिक विभागाचे दुर्लक्ष व कंत्राटदाराचा हलगर्जीपणा ही नळयोजना कुचकामी ठरण्यामागची प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात ेयेत आहे. बरबसपुरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत सन २००६-०७ मध्ये ४४ लाख रूपयांच्या खर्चाने तयार करण्याकरिता नळयोजना मंजूर करण्यात आली होती. या नळ योजनेचे भूमिपूजन तत्कालीन आ. राजेंद्र जैन व दिलीप बन्सोड यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र नळ योजनेच्या कामाला सुरूवातीपासूनच अवकळा लागली होती. प्रारंभी या योजनेचे कंत्राट गोंदियातील कंत्राटदारांना दिले होते. त्यांनी अर्धवट काम करून ठेवले होते. काही महिन्यांनी हे काम स्वत:ला कर्तव्यदक्ष समजणाऱ्या नागपूरच्या राऊत नामक कंत्राटदाराला देण्यात आले. त्यांनी सदर काम तीन ते चार वर्षांत पूर्णत्वाकडे नेले. आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१४ मध्ये टाकीत पाणी घालून नळ योजनेतून गावकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गावातील कोणत्याही नागरिकांना नळ योजनेच्या पाण्याची योग्य सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. बरबसपुरा येथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवसापासून नळाला पाणी सोडण्यात आले, तेव्हा काही निवडक घरांना १० ते १५ गुंड पाणी मिळाले. काही घरी चार ते पाच गुंड पाणी तर काही घरी नळाचे पाणीच पोहोचले नाही. नळ योजनेद्वारे पिण्याच्या पाणी देण्यास सात ते साठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी निम्म्या गावाला सतत पंधरा दिवस पाणी उपलब्ध झालेले नाही. सद्यस्थितीत नळ योजना ठप्प पडलेली आहे. काही नागरिकांनी लोकमतला सांगितले की, या नळयोजनेतून पिण्याचे पाणी वाटप केले जात आहे. ते पाणी पिण्या योग्यच नाही. काही दिवस गढूळ पाणी नळाव्दारे आले. गावात १८० पेक्षा अधिक कुटुंबीयांनी नळ कनेक्शन घेतले. मात्र नळाचे पाणी अर्ध्या लोकांना मिळत नाही, असे सरपंच ममता लिचडे यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले, कंत्राटदरांनी काम पूर्ण केले नसल्याने एम.बी. रोकण्यात आले आहे. एम.बी. करिता कंत्राटदार राजेश राऊत तगादा लावत असले तरी काम पूर्ण केल्याशिवाय एम.बी. देण्यात येणार नाही. नरेंद्र मेश्राम यांच्या घरी नळाला पाणी येत नव्हते. मात्र बाजूला असणाऱ्या अनुसया मोटघरे आणि जावरकर यांच्या घरी नळाला पाणी येत होते. यासंबधी कंत्राटदार राजेश राऊत यांना बोलले असता, माझे काम झाले, आता तुम्ही पाहा. कदाचित भूत लागल्याने बंद पडले असेल, असे उध्दटपणाचे उत्तर राजेश राऊत यांनी दिल्याचे सरपंच लिचडे यांनी सांगितले. कार्य करण्याचा कालावधी लांब-लचक असल्याने नळ योजनेचा लाभ गावकऱ्यांना उत्तमप्रकारे मिळेल किंवा कंत्राटदार देणार, अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा पूर्णत: भंग पावली आहे. (वार्ताहर)सर्वांना मलाई, नागरिकांना फुटकी घागरबरबसपुरा नळयोजनेच्या कामाला सात वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. परंतु त्याचा लाभ ग्रामस्थांना होत असल्याचे दिसून येत नाही. नळयोजनेच्या कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने निधी उकळण्याकरिता कसे-बसे काम केले. अधिकारी व ग्रामपंचायतने टक्केवारी घेतली. अर्थात सर्वांनी मलाई खाल्ली. मात्र योजनेचा लाभ नागरिकांना मिळणे गरजेचे असताना मिळत नाही. नळ योजनेच्या कामाकडे ग्रामपंचायतने जातीने लक्ष दिले नाही व राऊत नामक कंत्राटदाराने चांगल्या बुध्दीने काम केले नाही, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे ऐकूनही घेतले नाही. त्यामुळे ही नळयोजना कुचकामी ठरल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे. नळयोजनेच्या कामाची मलाई कंत्राटदारासह अधिकारी-पदाधिकाऱ्यांना मिळाली. परंतु सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांना काय मिळाले? केवळ फुटकी घागर!कंत्राटदाराचा हलगर्जीपणा सरपंच ममता लिचडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे २०१५ रोजी ग्रामपंचायतमध्ये आमसभा झाली. नळ योजनेचे पंप सुरू करण्याकरिता लोकांच्या सहमतीने पंचनामा करून मोटार सुरू करण्यासाठी गेले असता मोटारचे कनेक्शन कंत्राटदार राजेश राऊत यांनी काढून ठेवले होते, जेणेकरून कितीही प्रयत्न केल्यावर मोटार सुरू होणार नाही. मोटार सुरू न होण्याचे कारण मोटार जळाल्याचे उत्तर देण्यात आले. नंतर दोन दिवसात त्याच स्थितीत कंत्राटदाराच्या माणसांनी सुरू केले. सद्यस्थितीत पाणी पुरविण्याची व्यवस्था कंत्राटदाराकडे आहे. पाणी सुरू करून काही तासातच बंद करुन उरलेले पाणी दुसऱ्या दिवशी कमी प्रमाणात दिल्या जाते. त्यामुळे नळ योजना कुचकामी ठरल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पाणी साठ्याची जागा आणि पाण्याच्या टाकीची उंची कमी असल्याने तसेच घरी नळ लावताना दक्षता न घेतल्याने नळयोजना अयशस्वी ठरत आहे. आतापर्यंत गावकऱ्यांना नळाचे पाणी योग्यरीत्या मिळाले नसून योजना सध्या बंद पडून आहे. अदानी पॉवरकडून बोअर करण्यात आले असून लवकरच टाकीत पाणी येण्याची व्यवस्था करण्यात येईल.ममता लिचडे, सरपंच, ग्रामपंचायत, बरबसपुरा (तिरोडा)