शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

संरक्षण जाळीअभावी वृक्ष झाली नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजने अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा जवळपास विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. झाडांना दररोज पाणी सुध्दा देण्यात येत नाही. मात्र, झाडांच्या संगोपनाबाबत सामाजिक वनिकरण विभागाचे उदासीन धोरण असल्याने आजतागायत लाखो रुपये खर्च करण्यात आलेल्या झाडांना संरक्षण जाळी बसविण्यात आली नाही.

ठळक मुद्देवृक्ष लागवडीचा फज्जा : सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष, दोषींवर कारवाई करण्याची वनप्रेमींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : सामाजिक वनिकरण विभागाचेवतीने २०१८ - १९ या वर्षात शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र, लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी संरक्षण जाळी बसविण्यात आली नसल्याने सदर झाडे नष्ट होत आहेत. या प्रकाराकडे सामाजिक वनिकरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे .महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजने अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा जवळपास विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. झाडांना दररोज पाणी सुध्दा देण्यात येत नाही. मात्र, झाडांच्या संगोपनाबाबत सामाजिक वनिकरण विभागाचे उदासीन धोरण असल्याने आजतागायत लाखो रुपये खर्च करण्यात आलेल्या झाडांना संरक्षण जाळी बसविण्यात आली नाही. त्यामुळे सदर झाडे मोकाट जनावरांच्या भक्ष्यस्थानी सापडत आहे. त्यामुळे झाडांचे आयुष्य धोक्यात आले असताना सामाजिक वनिकरण विभागाचे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष दिसून येत आहे. शासनाचा वृक्ष लागवडीसाठी खर्च झालेला लाखो रूपयांचा निधी व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लागवड करण्यात आलेल्या झाडांपैकी केवळ मोजकीच झाडे सुस्थितीत असून, इतर प्रजातींची झाडे मात्र संरक्षण जाळीअभावी वृक्षांचे आयुष्य धोक्यात आले आहे. सध्यस्थितीत अनेक खड्डे झाडाअभावी रिकामी, तर काही झाडे योग्य संगोपनाअभावी सुकली आहेत. तर काही खड्डयात वाळलेल्या काड्या उभ्या दिसून येत आहे.या कामावर देखरेख करणारे सामाजिक वनिकरण विभागाच्या कर्मचारी वर्गावर वरिष्ठाचे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षलागवड योजनेचे तीनतेरा जजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीबाबत सामाजिक वनिकरण विभागाने माहिती फलक लावला नसल्याने सामाजिक वनिकरण विभागाच्या कार्यप्रणाली बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असतांना उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सामाजिक वनिकरण विभागाचे वतीने रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात आलेल्या झाडांची प्रत्यक्ष पाहणी करून सामाजिक वनिकरण विभागाच्या दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.अधिकारी-कर्मचाऱ्यांचे होत आहे दुर्लक्षमहाराष्ट्र शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहाने वृक्ष लागवड मोहीम राबविली. मात्र वृक्षांच्या देखभाल दुरुस्तीकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने बोटावर मोजण्याइतकेच वृक्ष जीवंत असल्याचे दिसून येते. भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हजारो वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेले असून त्याची चौकशी झाल्यास पितळ उघडे पडेल.

टॅग्स :forestजंगल