शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

रोहयोतून करणार कालव्याचा कायापालट

By admin | Updated: August 24, 2015 00:47 IST

बारा हजार हेक्टर आर शेतीला रब्बी आणि खरीप हंगामात पाणी वाटप करणाऱ्या चांदपूर जलाशयाच्या नहरांची अवस्था संतापजनक झाली आहे.

लोकमत विशेषरंजीत चिंचखेडे चुल्हाड(सिहोरा) बारा हजार हेक्टर आर शेतीला रब्बी आणि खरीप हंगामात पाणी वाटप करणाऱ्या चांदपूर जलाशयाच्या नहरांची अवस्था संतापजनक झाली आहे. नहर व कालवे केरकचरा तथा झुडुपांनी तुंबल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. या नहरांंचा कायापालट रोहयोतून करण्यासाठी रोहयो परिसरातील सरपंच एकवटले आहेत.सिहोरा परिसरात शेती नागरिकांच्या उपजिवीकेचे साधन आहे. शेती व्यवसायातील प्रमुख पिक उत्पादनावर परिसरातील अर्थव्यवस्था आहे. परिसरात १२ हजार हेक्टर आर शेतीला सिंचीत करण्यासाठी चांदपूर जलाशयाचे प्रमुख कालवे आणि नहर आहेत. शेत शिवारात पादचाऱ्या आहेत. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या कालवे आणि नहराची स्वच्छता, दुरुस्ती, खोलीकरण, मातीकाम, मुरुम कामे तथा सिमेंट अस्तरीकरणाची कामे झाली नसल्याने पाणी वाटपात नवे संकट निर्माण होत आहे. नहरात झुडुपांना पाणी अडत असल्याने नहरांना यंदा भगदाड पडली आहेत. अनेक नहर जीर्ण झाली आहेत. या संदर्भात शेतकरी पाटबंधारे विभागात गाऱ्हाणे ऐकवीत आहेत. लेखी स्वरुपात तक्रारी देत आहेत. परंतु शासन स्तरावर निधी प्राप्त होत नसल्याची बाब सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. पाटबंधारे विभाग तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत नाही. आऊटलेटची बांधकामे मंजूर केली जात आहेत. कंत्राट वाटपाचे नियोजन गुपचूप पद्धतीने शिजत आहेत. मुरुमऐवजी मातीचा 'लॉलीपाप' नहरांना दिला जात आहे. यामुळे नहर आणि कालव्यांना न्याय मिळत नाही. शेतकरी दरवर्षी शासनाला पाणी पट्टी करातून २० ते २५ लाख रुपये जमा करीत आहेत. या राशीमधून विकास कामात छदामही खर्च केला जात नाही.शेतकऱ्यांना न्याय देताना प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. अधिकाधिक सिंचित क्षेत्र वाढविण्यासाठी नवीन नहर प्रस्तावित आहेत. केंद्रीय मंत्री असताना खा.प्रफुल पटेल यांची निदर्शनास शेतकऱ्यांनी आणून दिले आहे. परंतु नवीन नहर तथा पादचाऱ्यांच्या कामांना अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. यामुळे परिसरात स्थिती जैसे थे आहे. दरम्यान सिंचनाकरिता शेतीला पाणी प्राप्त होत नसल्याने कैफियत शेतकऱ्यांनी ग्रामसभेत मांडली आहे. नहर, कालवा व पादचाऱ्या चकाचक करण्याचे नियोजन रोहयोतून करण्यासाठी निवेदन दिली आहेत. या शेतकरी व जनतेच्या हिताच्या निर्णयाला सरपंचानी मंजुरी दिली असून गावाच्या हद्दीत असणाऱ्या नहरांची स्वच्छता, मातीकाम करण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रोहयोतून सिमेंट, रस्ते व नाली बांधकामावर सिहोरा परिसरात 'ब्रेक' लावण्याचे निवेदन बिडीओ यांना दिले जाणार आहे. पंचायत समितीचे गट नेते तथा सदस्य हिरालाल नागपुरे यांनी रास्त निर्णयावर आढावा बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी उदयोन्मुख निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंचायत समितीच्या रोहयो सभेत सिहोरा परिसरातील सरपंच मजुरांना कामे उपलब्ध करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी नहरांची स्वच्छता करणारा निर्णय लावून धरणार असल्याचे सरपंचांनी सांगितले.