शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पोलीस बंदोबस्तात शिक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 13, 2016 00:21 IST

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विभागाच्या बदल्यांचे सत्र ६ ते १३ मे या कालावधीत राबविण्यात येत आहे.

जि.प. प्रशासनाचे नियोजन बारगळले : उन्हाच्या काहिलीने शिक्षकांचे बेहाल, संघटनांनीच केली पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाभंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विभागाच्या बदल्यांचे सत्र ६ ते १३ मे या कालावधीत राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांच्या बदली सत्राला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. ही बदली प्रक्रिया कार्यशाळा जिल्हा परिषद प्रशासनाने तीन दिवस राबविण्याचे ठरविले आहे. मात्र या कार्यशाळेसाठी बोलविण्यात आलेल्या शिक्षकांची गैरसोय झाली. याउलट पोलिसांची मदत घेऊन बंदोबस्तात ही बदली प्रक्रिया राबविण्यात आल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षक, केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षकांच्या बदल्या या कार्यशाळेतून करण्याचे नियोजन शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजित केले.जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना एकाच शाळेत अनेक वर्षाचा कालावधी लोटला आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्यामुळे मे महिन्यात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी ही कार्यशाळा राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नक्षलप्रभावित साकोली, लाखनी, लाखांदूर क्षेत्रातील शिक्षकांसह अन्य शिक्षकांच्याही या कार्यशाळेतून बदल्या करण्यात येत आहे. काही शिक्षकांनी समायोजनातून बदली करण्याची विनवनी शिक्षण विभागकडे केली आहे तर काही शिक्षकांनी सेवाज्येष्ठतेनुसार बदली प्रक्रिया राबविण्याची मागणी केली.बुधवारला पार पडलेल्या कार्यशाळेत केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या बदल्या कार्यक्रम घेण्यात आला. गुरूवारला इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या सहायक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया राबविण्यात आली. शुक्रवारला पदवीधर शिक्षकांना या कार्यशाळेतून बदल्याच्या ठिकाणी पाठविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना एकाचवेळी पाचारण केले. त्यामुळे बुधवार व गुरूवारी या कार्यशाळेसाठी शिक्षकांची रीघ लागली होती. रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांची प्रतिनियुक्ती किंवा बदल प्रक्रिया पूर्ण करण्याहेतूने काही शिक्षकांना बोलावूनही ही कार्यशाळा आटोपती घेता आली असती. मात्र शिक्षण विभागाने सरसकट जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना भंडारा जिल्हा परिषद येथे बोलाविले. त्यामुळे सर्वांची एकच भाऊगर्दी दिसली. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यशाळेसाठी येणाऱ्या शिक्षकांची व्यवस्था केली असल्याने बाहेरगावावरून आलेल्या शिक्षकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. (शहर प्रतिनिधी)जिल्हा परिषदेचा नियोजनाचा अभावउन्हाची प्रखरता असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने बाहेरगावावरून येणाऱ्या शिक्षकांसाठी व्यवस्था केली नव्हती. प्रखर उन्हात हे शिक्षक झाडांच्या आडोशाला उभे राहून या प्रक्रियेत सहभागी झाले होते. ही बाब हेरून शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेच्या आवारात कापडी मंडप टाकला व शिक्षकांसाठी पिण्याचे थंड पाणी व शितपेयाची व्यवस्था केली होती.पोलिसांच्या बंदोबस्तात बदल्याजिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली. तीन दिवसीय कार्यशाळेतून शिक्षकांच्या बदल्या होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच बदली प्रक्रिया पोलिसांच्या बंदोबस्तात राबविण्यात आली. त्यामुळे शिक्षकांच्या बदलीसाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवल्याने शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली होती. निश्चित टक्केवारीपेक्षा अधिकच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी गरज नसतानाही शिक्षक देण्यात आले आहे. शिक्षकांच्या समस्यांसाठी संघटना लढा देत असल्यामुळे त्याचा बदला घेण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू आहे. पोलीस बंदोबस्तातील या प्रक्रियेचा आम्ही निषेध करतो.- मुबारक सय्यद,जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.नियमाप्रमाणे २ मे रोजी यादी प्रसिद्ध करावयाची होती. ही यादी वेळेवर लावण्यात आली. या यादीत वरिष्ठाला कनिष्ठ तर कनिष्ठाला वरिष्ठ दाखविण्यात आले आहे. याद्या अद्ययावत करण्याची सीईओंना विनंती केली होती. या बदली प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय झाल्यास आयुुक्त, न्यायालयात दाद मागू.- रमेश सिंगनजुडे,जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ.