शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे बुकिंग करा रद्द; भर उन्हात शाळा जोरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नसल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी मार्चमध्येच तापमानाने रेकॉर्ड मोडले आहे. पारा ४२ अंशाच्या वर पोहोचला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने एक पत्र काढून शाळा दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची चिंता नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, अनेक शाळांत पंखे, कुलर नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सध्या सूर्य आग ओकत आहे. अशावेळी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शिक्षण विभागाने दुपारी १ वाजेपर्यंत शाळा भरविण्याबाबत पत्र काढले आहे. दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नसल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी मार्चमध्येच तापमानाने रेकॉर्ड मोडले आहे. पारा ४२ अंशाच्या वर पोहोचला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने एक पत्र काढून शाळा दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची चिंता नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, अनेक शाळांत पंखे, कुलर नाहीत. काही शाळांमध्ये विद्यार्थी बाहेरगावावरून येतात. त्यांना भरदुपारी घरी जाणे कठीण होणार आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी एखाद्या शाळेत दुपारी बसून बघावे, त्यानंतर उन्हाची दाहकता त्यांना कळेल, असेही पालकांचे म्हणणे आहे. सध्या उन्हाची दाहकता बघता, शाळा सकाळच्या सत्रातच सुरू ठेवणे गरजेचे आहे. मात्र शिक्षण विभागाने दुपारी १ वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे तसेच पूर्ण क्षमतेने शाळा भरविण्याचे पत्रात नमूद केल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. उन्हाच्या तडाख्यात चिमुकल्यांचे आरोग्य कसे जपायचे, असा प्रश्न शिक्षकांसह आता पालकही उपस्थित करीत आहे.

मुलांचे आरोग्य बिघडले तर काय करणार? तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत शाळेत ठेवल्यास त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   

तापमान ४२ अंशांवर- मागील काही दिवसामध्ये सूर्य आग ओकत आहे.- सध्या स्थितीत ४२ अंशावर तापमान गेले आहे. त्यामुळे घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात यापेक्षाही उन्ह तापण्याची शक्यता आहे.

१ मे पासून सुट्या कोरोनानंतर आता निर्बंध हटविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एप्रिल महिन्यात शाळा सुरू राहणार आहे. त्यानंतर १ मेपासून विद्यार्थ्यांना सुट्या देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पालक काय म्हणतात...

दुपारी १ वाजेपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय अगदी चुकीचा आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी येण्यासाठी दुपारी २ वाजणार म्हणजे, उन्हामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.    - दीपक घोडमारे, पालक

सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. अशावेळी दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत ठेवणे धोकादायक ठरू शकते. शाळेत उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना नाही. शिक्षण विभागाने यावर उचित निर्णय घेणे गरजेचे आहे.    - प्रियंका लाडे, पालक

शिक्षणाधिकारी पत्र काढून झाले मोकळे- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर तसेच माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर या दुपारी १ वाजेपर्यंत शाळा भरविण्याबाबत पत्रक काढून मोकळे झाले आहेत.- दुपारपर्यंत शाळा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी आल्यास काय? याबाबत मात्र फक्त कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे पालकांत संताप आहे.

 

टॅग्स :Schoolशाळा