शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे बुकिंग करा रद्द; भर उन्हात शाळा जोरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नसल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी मार्चमध्येच तापमानाने रेकॉर्ड मोडले आहे. पारा ४२ अंशाच्या वर पोहोचला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने एक पत्र काढून शाळा दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची चिंता नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, अनेक शाळांत पंखे, कुलर नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सध्या सूर्य आग ओकत आहे. अशावेळी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शिक्षण विभागाने दुपारी १ वाजेपर्यंत शाळा भरविण्याबाबत पत्र काढले आहे. दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नसल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी मार्चमध्येच तापमानाने रेकॉर्ड मोडले आहे. पारा ४२ अंशाच्या वर पोहोचला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने एक पत्र काढून शाळा दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची चिंता नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, अनेक शाळांत पंखे, कुलर नाहीत. काही शाळांमध्ये विद्यार्थी बाहेरगावावरून येतात. त्यांना भरदुपारी घरी जाणे कठीण होणार आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी एखाद्या शाळेत दुपारी बसून बघावे, त्यानंतर उन्हाची दाहकता त्यांना कळेल, असेही पालकांचे म्हणणे आहे. सध्या उन्हाची दाहकता बघता, शाळा सकाळच्या सत्रातच सुरू ठेवणे गरजेचे आहे. मात्र शिक्षण विभागाने दुपारी १ वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे तसेच पूर्ण क्षमतेने शाळा भरविण्याचे पत्रात नमूद केल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. उन्हाच्या तडाख्यात चिमुकल्यांचे आरोग्य कसे जपायचे, असा प्रश्न शिक्षकांसह आता पालकही उपस्थित करीत आहे.

मुलांचे आरोग्य बिघडले तर काय करणार? तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत शाळेत ठेवल्यास त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   

तापमान ४२ अंशांवर- मागील काही दिवसामध्ये सूर्य आग ओकत आहे.- सध्या स्थितीत ४२ अंशावर तापमान गेले आहे. त्यामुळे घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात यापेक्षाही उन्ह तापण्याची शक्यता आहे.

१ मे पासून सुट्या कोरोनानंतर आता निर्बंध हटविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एप्रिल महिन्यात शाळा सुरू राहणार आहे. त्यानंतर १ मेपासून विद्यार्थ्यांना सुट्या देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पालक काय म्हणतात...

दुपारी १ वाजेपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय अगदी चुकीचा आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी येण्यासाठी दुपारी २ वाजणार म्हणजे, उन्हामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.    - दीपक घोडमारे, पालक

सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. अशावेळी दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत ठेवणे धोकादायक ठरू शकते. शाळेत उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना नाही. शिक्षण विभागाने यावर उचित निर्णय घेणे गरजेचे आहे.    - प्रियंका लाडे, पालक

शिक्षणाधिकारी पत्र काढून झाले मोकळे- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर तसेच माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर या दुपारी १ वाजेपर्यंत शाळा भरविण्याबाबत पत्रक काढून मोकळे झाले आहेत.- दुपारपर्यंत शाळा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी आल्यास काय? याबाबत मात्र फक्त कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे पालकांत संताप आहे.

 

टॅग्स :Schoolशाळा