शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

वाहतूक संपाचा प्रवाशांना 'दे धक्का'

By admin | Updated: May 1, 2015 00:43 IST

वाहतुकीच्या संदर्भात शासन नवीन कायदे बनविण्याच्या विचाराधीन आहे.

भंडारा : वाहतुकीच्या संदर्भात शासन नवीन कायदे बनविण्याच्या विचाराधीन आहे. याला विरोध म्हणून गुरुवारी वाहतूकदारांनी संपाचे हत्यार उपसले. यात आॅटो-रिक्षा, ट्रान्सफोर्ट व्यावसायिक व एसटीच्या बसेसचाही समावेश असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. याची दखल घेऊन शासनाने तातडीची बैठक बोलाविली. आश्वासनानंतर नाट्यमयरीत्या संप मागे घेण्यात आला. मात्र, पहाटेपासून सुमारे सकाळी ११ वाजेपर्यंत प्रवाशांना याचा फटका बसला. बाहेरगावी जाणारे प्रवाशी व कर्तव्यावर बसेने जाणारे कर्मचाऱ्यांना या संपामुळे ताटकळत बसावे लागले. केंद्र व राज्य शासनाने रस्ते सुरक्षा विधेयक तयार केले आहे. तो अंमलात आणण्याच्या दृष्टीने विचाराधिन आहे. यात वाहनधारकांसह चालकांनाही फटका बसणार आहे. यासोबतच वाहतूक चालकांसाठी नविन नियम बनविण्यात येणार आहे. या नियमात, चालकाने अतिवेगात वाहन चालवू नये. वाहतूक सिग्नल तोडल्यास दंडात्मक कारवाई व वेळप्रसंगी वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खासगीकरण करण्याचा मनसुबा राज्य शासनाने आखला आहे. यात वाहन चालकांसोबत वाहन मालकांची गळचेपी होणार होती. यामुळे गुरूवारला वाहनधारक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप पुकारून शासनाचा विरोध करण्याचे ठरविले. त्यासाठी वाहनतुकदारांनी संपाचे हत्यार उपसले. या संपाचा पटका सर्वसामान्यांना बसला. या संपात एसटी बसची मान्यताप्राप्त संघटना उतरल्याने पहाटेपासून बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला. अनेकांना या संपाची कल्पनाच नसल्याने प्रवाशी बसच्या प्रतिक्षेत ताटकळत उभे होते. तर काही प्रवाशी आॅटो-रिक्क्षाच्या प्रतिक्षेत रस्त्यांवर उभे असल्याचे चित्र बघायला मिळाले. (शहर प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांना भोवणार 'संप'जिल्ह्यातील अनेक कर्मचारी हे मुख्यालयी न राहता नित्याने नागपूर किंवा जिल्हास्थळावरून बस किंवा रेल्वेने जाणे येणे करतात. आजच्या संपाची अनेकांना कल्पना नसल्याने त्यांची पुरती वाट लागली. अनेक कर्मचारी बसच्या प्रतिक्षेत बसस्थानकावर ताटकळ उभे होते. काही रेल्वेने प्रवास करतात. पण, आॅटो-रिक्क्षा संपात सहभागी असल्याने त्यांना मुख्यालयी पोहचण्यास विलंब लागला. अनेकांची बायोमेट्रीकवर उशिरा हजेरी लागली. त्यामुळे त्यांच्या विभागप्रमुखाकडून अशा सर्व कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते.