शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहरात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:00 IST

शहरात आधीच अरुंद रस्ते आणि त्यावर असलेल्या अतिक्रमणाने वाहतुकीची नेहमी कोंडी होते. शहरातील राजीव गांधी चौक, त्रिमुर्ती चौक, गांधी चौक, मोठा बाजार परिसर, शास्त्री चौक, खांबतलाव चौक, गभने चौक, बसस्थानक परिसर येथे मोठी गर्दी असते. अरुंद रस्त्यावरून आपली वाहने काढताना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसणासुदीचे दिवस : गांधी चौकात वाहतूक पोलीस दिसत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुंबईच्या वाहतूक नियंत्रणाचा दांडगा अनुभव असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक असतानाही भंडारा शहरातील वाहतुकीचे दररोज धिंडवडे निघत आहे. सणासुदीच्या दिवसात रस्त्यावर होणारी गर्दी नियंत्रणासाठी कुठेही पोलीस दिसत नाही. पोळ्याच्या दिवशी गांधी चौकात तब्बल अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातून कुणीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढे आले नाही.शहरात आधीच अरुंद रस्ते आणि त्यावर असलेल्या अतिक्रमणाने वाहतुकीची नेहमी कोंडी होते. शहरातील राजीव गांधी चौक, त्रिमुर्ती चौक, गांधी चौक, मोठा बाजार परिसर, शास्त्री चौक, खांबतलाव चौक, गभने चौक, बसस्थानक परिसर येथे मोठी गर्दी असते. अरुंद रस्त्यावरून आपली वाहने काढताना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे. अनेक व्यवसायीकांनी आपली दुकाने थेट रस्त्यालगतच थाटली आहे. त्यातच खरेदीसाठी येणाऱ्या वाहनधारकांची मोठी गर्दी होते. शुक्रवारी पोळ्याचा सण साजरा झाला. सकाळपासूनच नागरिकांनी गांधी चौकासह विविध परिसरात खरेदीसाठी गर्दी केली. यामुळे गांधी चौकात वाहतुकीची कोंडी झाली. तब्बल अर्धा तास वाहने जागची हालली नाही. हा प्रकार काही सुज्ञ नागरिकांनी वाहतूक शाखेला सांगितला. त्यावेळी एखादा पोलीस कर्मचारी पाठवितो एवढा निरोप दिला. परंतु तेथे पोलिसच पोहचला नाही. गत तीन महिन्यांपासून गांधी चौकात वाहतूक शिपाई राहत नसल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांनी वाहतुक कोंडीवर उपाययोजनाची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी