शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

शहरातील वाहतूक कोंडी ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:41 IST

शहरातील मुख्य रस्त्यांवर व प्रमुख चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभे केली जात असल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दरवर्षी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवूनही वाहतूकीची समस्या सुटलेली नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष : नागरिकांना पायी चालणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील मुख्य रस्त्यांवर व प्रमुख चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभे केली जात असल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दरवर्षी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवूनही वाहतूकीची समस्या सुटलेली नाही.शिवाय सकाळी सायंकाळच्यावेळी शाळकरी विद्यार्थी वृध्द नागरिक रस्त्यावरुन ये-जा करीत असताना अती वेगाने येणारे दुचाकीस्वार ट्रॅक्टर चालकांच्या भीतीने रस्त्यावरुन चालताना जीव मुठीत घेवून चालावे लागते. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांमधून होत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव रोड तसेच महात्मा गांधी चौकात वारंवार होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे वाहनधारकांसह सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र याकडे पोलीस प्रशासनाची मात्र दुर्लक्ष होत आहे. गांधी चौकात पोलीस स्टेशनसमोरच वाहनाची लांबच लांब रांग लागत असताना पोलीस कारवाई करताना दिसून येत नाही.नागरिकांची मानसिकता बदलेनाजवळपास दहा वर्षापुर्वी रस्त्याच्या एका कडेला वाहने पार्क केली जावी, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात कोंडलेला रस्त्याचा श्वास आधीच गुदमरलेला असतांना नागरिकांचीही मानसिकता बदलायला तयार नाही. अशा स्थितीत वाहतुक शाखेचे कर्मचारीही हतबल दिसतात. एकट्या पोस्टआॅफीस चौकातही अशीच स्थिती दिसून येते. ऐतिहासीक वारसा लाभलेल्या भंडारा शहरातील मुख्य रस्त्याचे हाल झाले असताना त्यावर कायम तोडगा निघालेला नाही.रस्त्यावर जनावरांचे बस्तानदीड लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचे वास्तव्य दिसून येते. अशावेळी लहान मोठे अपघातही घडले आहेत. शहरात बेवारस जनावरांसाठी कांजी हाऊसची व्यवस्था असतानाही पालिका प्रशासनाने त्याच्या देखभालीकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी मोकाट जनावरे रस्त्यावर फिरुन रहदारीला अडथळा निर्माण करीत असतात. यावर पालिका प्रशासन गांभिर्याने निर्णय घेणार काय असा सवालही उपस्थित होतो.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी