शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

होळी सणाची परंपरागत घानमाकड झालीय पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:00 IST

होळीची चाहूल लागली की ग्रामीण भागातील तरुणांची घानमाकड तयार करण्याची ओढ लागायची. पळसाचे विशिष्ट आकाराचे लाकूड आणून घानमाकड तयार करायचे. गावातील चौकात घानमाकड बसवून त्यावर गरागरा फिरण्याचा आनंद घेतला जायचा. तीन दशकापूर्वी गावागावात दिसणारे दृश्य आता नामशेष झाले आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात घानमाकड लुप्त झाली असून नवी पिढी गरगर फिरण्याच्या आनंदाला मुकली आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात असायची धमाल : नवी पिढी मुकतेय घानमाकडीवर गरगर फिरण्याच्या आनंदाला

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : होळीची चाहूल लागली की ग्रामीण भागातील तरुणांची घानमाकड तयार करण्याची ओढ लागायची. पळसाचे विशिष्ट आकाराचे लाकूड आणून घानमाकड तयार करायचे. गावातील चौकात घानमाकड बसवून त्यावर गरागरा फिरण्याचा आनंद घेतला जायचा. तीन दशकापूर्वी गावागावात दिसणारे दृश्य आता नामशेष झाले आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात घानमाकड लुप्त झाली असून नवी पिढी गरगर फिरण्याच्या आनंदाला मुकली आहे.होळी हा सण आला की, ग्रामीण भागातील तरुणाई उत्साहात दिसायची. शेणापासून चाकोल्या तयार करण्यापासून पळस फुल जंगलातून आणून रंग तयार करण्याची लगबग सुरु व्हायची. यासोबतच तरुणांच्या आवडीचा प्रकार म्हणजे घानमाकड होय. पळसाच्या झाडापासून तयार होणारी ही घानमाकड काही दशकापूर्वी तरुणांचा जीव की प्राण असायची. घानमाकड तयार करण्यासाठी सर्वप्रथम जंगलात जाऊन विशिष्ट आकाराचे पळसाचे झाड शोधायचे. व्ही आकाराची फांदी शोधून ती तोडली जायची. गावात आणल्यानंतर मैदानात घानमाकडसाठी खुंट रोवला जायचा. तर व्ही आकाराच्या लाकडाला मधोमध कोरून छिद्र तयार केले जायचे. रोवलेल्या खुंटावर आडवी व्ही आकाराची फांदी ठेवून त्यावर दोन्ही बाजूला बसून तिला एक सहकारी गरगरा फिरवायचे. हा प्रकार होळीच्या आठ दिवसांआधीपासून सुरु व्हायचा. होळीच्या दिवशी घानमाकड होळीमध्ये टाकली जायची. मात्र अलिकडे घानमाकड लुप्त झाली. तरुणाईचा हा निखळ आनंदही संपला.निमगावच्या शिक्षकांनी सजवली घानमाकडहसत खेळत ज्ञानार्जन व्हावे, नैसर्गिक आनंद मिळावा या हेतूने पारंपारिकतेचा आधार घेत लुप्त होत चाललेल्या घानमाकडीच्या खेळाला निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी पुनरुज्जीवन दिले. मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांनी घानमाकड तयार केली. शाळेच्या परिसरात ही घानमाकड लावून विद्यार्थ्यांना घानमाकडीवर बसण्याचा आनंद लुटता आला. यासाठी शिक्षक रामकृष्ण कमाने, विजय डाभरे, भास्कर गरपडे, शिक्षिका मीरा मोहतुरे यांनी सहकार्य केले. गत आठ दिवसांपासून ही घानमाकड सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र झाला आहे. यासाठी निमगावचे सरपंच रुपचंद चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनीही सहकार्य केले. आता विद्यार्थी घानमाकडीवर बसून आनंद लुटत आहेत.