शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

लहान महादेव गायमुख तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

१९९९ मध्ये निसर्ग पर्यावरण प्रेमी मो. सईद शेख यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गायमुख तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी विनंती केली. त्या अनुषंगाने राज्य शासनाने गायमुख तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग दिला. येथील विकासासाठी प्रथम २५ लाख व त्यानंतर ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून काही विकास कामे केली. परंतु त्यानंतर मात्र या तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे येथे अनेक विकासकामे रखडलेली आहेत.

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि लहान महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुमसर तालुक्यातील गायमुख तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास रखडला असून, येथे आतापर्यंत राज्य शासनाने केवळ ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने या तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग म्हणून १९९९ मध्ये मंजुरी दिली; परंतु तीर्थक्षेत्राचा विकास झाला नाही.सातपुडा पर्वत रांगात निसर्गसौंदर्याने नटलेले गायमुख प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, तुमसरपासून केवळ १५ किलोमीटर अंतरावर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. यात्रेला २०० वर्षांचा इतिहास आहे. भंडाऱ्याचे दिवंगत यादवराव पांडे यांच्या काळापासून यात्रा भरत असून, पांडे यांची नवीन पिढी व जिल्हा प्रशासनातर्फे येथे यात्रेची संपूर्ण व्यवस्था करण्यात येते. १९९९ मध्ये निसर्ग पर्यावरण प्रेमी मो. सईद शेख यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गायमुख तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी विनंती केली. त्या अनुषंगाने राज्य शासनाने गायमुख तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग दिला. येथील विकासासाठी प्रथम २५ लाख व त्यानंतर ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून काही विकास कामे केली. परंतु त्यानंतर मात्र या तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे येथे अनेक विकासकामे रखडलेली आहेत. महाशिवरात्रीला येथे मध्य प्रदेश व विदर्भातून मोठ्या संख्येने येथे भाविक येतात. मात्र येथे सुविधा नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.गायमुख येथे जाण्यासाठी असलेला रस्ता उखडला असून भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विकासाकडेही दुर्लक्ष आहे.

गायमुख यात्रेचा इतिहास - प्राचीन काळी येथे एक ऋषीने भगवान शिवाची तपस्या केली. त्यामुळे स्थळ पवित्र असल्याचे मानले जाते. येथे पंचमुखी भोलाशंकर, हनुमान, मकरध्वज, अंबाबाई, गोरखनाथाचे मंदिर असून, पंचमुखी भोलाशंकराचे मंदिर भारतातील विद्यमान १८ मंदिरांपैकी एक आहे. मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे. पार्वतीची प्राचीन विहीर पहाडावर असून, भाविक येथे भेट देतात. पलीकडील जंगलात मिनी नैनिताल, पांगडी जलाशय डोळ्यांचे पारणे फेडून जाते. गाईच्या मुखातून पर्वतीय झरा सतत वाहून एका जलकुंभात पडते. यावरून या स्थळाचे नाव गायमुख असे पडले आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटन