शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'ऑटोचालक ते सभापती', रितेश वासनिक यांचा खडतर व प्रेरणादायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 12:48 IST

प्रस्थापितांच्या विरोधामुळे राजकीय जीवन डगमगले, पण पहिल्याच प्रयत्नात पंचायत समिती निवडणूक सर करून, सरळ सभापती पदावर वर्णी लागली. त्यांच्या संघर्षमय जीवनाची कथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

ठळक मुद्देसभापती रितेश वासनिक यांची प्रेरणादायी कहाणी

तथागत मेश्राम

वरठी (भंडारा) : संघर्ष व संकटे यांना सामोरे जाणारा माणूस यशाचे शिखर गाठतो, ही उपमा रितेश वासनिक यांनी सिद्ध करून दाखविली. संघर्ष व संकटांना पाठ न दाखविता, त्यांनी मार्गक्रमण सुरू ठेवले. परिस्थितीशी लढा देण्याचा त्यांनी चंग बांधला. मित्रांच्या मदतीने ऑटो चालकाचा व्यवसाय पत्करला. ऑटो चालकाच्या समस्या सोडविण्याची धडपड सुरू झाली. सामाजिक कामामुळे ओळख निर्माण झाल्याने गर्दी वाढू लागली. प्रस्थापितांच्या विरोधामुळे राजकीय जीवन डगमगले, पण पहिल्याच प्रयत्नात पंचायत समिती निवडणूक सर करून, सरळ सभापती पदावर वर्णी लागली. त्यांच्या संघर्षमय जीवनाची कथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

रितेश वासनिक यांचा ऑटो चालक ते थेट सभापती जीवन प्रवास खडतर आहे. बालवयात संकटे त्यांच्या दारावर उभी होती. हलाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांच्या आईचा मोलाचा वाटा आहे. मोलमजुरी करून मुलांचे पोषण करण्याचे धर्य त्यांनी कायम ठेवले. आईच्या कष्टाची जान असलेल्या रितेशने बालवयात आईला आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला. शालेय शिक्षण पूर्ण करताना मिळेल ते काम करून उत्पन्नाचे स्रोत शोधले. लहानपणापासून ऑटो रिक्षा चालविण्याची ओढ होती, पण ऑटो रिक्षा विकत घेण्याइतके पैसे नसल्याने भाड्याचा ऑटो रिक्षा चालविला. यासाठी अविनाश रामटेके व पवन रामटेके यांनी त्यांना मदत केली. व्यवसाय व सामाजिक कार्य करताना स्वकमाईने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

अन्यायाची चीड असल्याने ते प्रस्थापितांच्या विरोधात पटकन उभे राहायचे. स्पष्ट बोलण्याचा त्यांच्यात असलेले गुण त्यांना अडसर ठरला. राजकीय पदार्पणात त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मात खावी लागली. दरम्यान, त्यांचे लग्न झाले. काही महिन्यांतच पंचायत समितीची पोटनिवडणूक लागली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पत्नीवर विश्वास दाखविला. त्या बहुमताने निवडून आल्या. १८ महिन्यांत रितेश व त्यांच्या पत्नी आकांक्षा यांनी कामाचा सपाटा लावला. लोकांच्या हाकेला धावून जाण्याची वृत्ती त्यांना जन आशीर्वाद रुपाने मिळाली.

लोकशाहीत बहुमत असल्याखेरीज सत्ता मिळत नाही, पण रितेश यांचे नशीब बलवत्तर होते. सत्ता स्थापनेएवढी संख्या नसतानाही पक्षातील वरिष्ठांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला. त्यांची सभापती पदावर वर्णी लागली. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून अन्नदानाचे काम सुरू आहे. दररोज शेकडो गरजूंना अन्न त्यांच्या केंद्रामार्फत मिळत आहे.

टॅग्स :Socialसामाजिकbhandara-acभंडारा