शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शहापुरातील भीम मेळाव्यात उसळणार आज जनसागर

By admin | Updated: January 16, 2017 00:26 IST

शहापूर येथील ऐतिहासिक भीम मेळावा हा आंबेडकरी बांधवांचा वारसा आहे. १६ जानेवारी रोजी या मेळाव्याचा ७३ वा वर्धापन दिन आहे.

७३ वा वर्धापन दिन : विविध कार्यक्रमांची रेलचेल, बौद्ध धर्मीय वर-वधू परिचय मेळाव्याचेही आयोजनप्रल्हाद हुमणे जवाहरनगरशहापूर येथील ऐतिहासिक भीम मेळावा हा आंबेडकरी बांधवांचा वारसा आहे. १६ जानेवारी रोजी या मेळाव्याचा ७३ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने मेळाव्याला जनसागर उसळणार आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात १९४४ साली शहापूरवासीयांनी या भीम मेळाव्याची सुरुवात केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐन उमेदीच्या काळात हा मेळावा झाला. आयोजक मोरेश्वर गजभिये यांनी मेळाव्यासंदर्भात सांगितले की, या भीम मेळाव्याच्या इतिहास रोमहर्षक व क्रांतीकारी आहे. १९३८ सालची ती घटना या गावामध्ये रोगाने थैमान घातला होता. त्याला आळा घालण्यासाठी अज्ञानातून एका साधूबाबाला बोलाविण्यात आले. सूचनेनुसार एक हवनकुंड बांधून हवन करण्याचे ठरविण्यात आले. त्यावेळचे पट्टीचे गवंडी बेलदार दिवंगत गंगाराम रंगारी यांनी नि:शुल्क हवनकुंड बांधून दिले होते. परंतु प्रत्यक्ष हवनाच्यावेळी रंगारी ते हवनकुंड हाताने चाचपू लागले. तेव्हा या अस्पृश्याच्या स्पर्धाने हवनकुंड बाटले व देवाचा कोप होवून पुन्हा गावात साथीच्या रोगाचा फैलाव होईल या अज्ञानातूनच गावातील स्पृश्य बांधवांनी त्याला अडविले. अस्पृष्यांनी बांधलेले हवनकुंड चालते, परंतु त्याचा स्पर्श चालत नाही. या अमानुष प्रकाराने गंगाराम रंगारी व्यथीत झाले. या बाबासाहेबांच्या संदेशानी त्यांच्यातील स्वाभीमान जागा झाला. दिवंगत आत्माराम गजभिये, दिवंगत जैराम गजभिये व दिवंगत कवडू खोब्रागडे रंगारीच्या मदतीला ्नधावले. लगेच त्यांनी अस्पृश्य बांधवांची सभा बोलाविली. यात आपल्या उपासनेकरिता स्वतंत्र मंदिर बांधण्याची कल्पना मांडली. ती कल्पना सर्वांनी उचलून धरली. याच सभेत प्रत्येकांनी आपले योगदानही जाहीर केले. प्रत्येकांनी आठवड्यातून दोन आणे नियमित वर्गणी गोळा केली आणि पाहता पाहता या मंदिराचे निर्माणही पूर्ण झाले. विश्वनाथ मंदिर असे नामकरण करण्यात आले. याच अवधीत मंदिराला लागून अस्पृष्य वर्गातील प्रत्येक कुटुंबातील पती पत्नीने श्रमदानातून स्वतंत्र विहिर बांधून एक आदर्श निर्माण केला. यातून प्रेरणा घेऊनच परिसरातील गावात अस्पृषांच्या स्वतंत्र विहिर तयार झाल्यात. बोलताना गजभिये म्हणाले, शहापूर हे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख मोठे खेडेगाव आहे. परिसरातील आंबेडकरी जनतेला शहापूरवासीयांकडून खूप अपेक्षा होत्या. एका सभेत १४ जानेवारीला भीमसागर या नावाने कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार १४ जानेवारी १९४४ रोजी शहापूर येथे भीम सागराची सुरुवात झाली. त्यानंतर दरवर्षी १५ जानेवारी रोजी भीमसागर घेऊ लागला. १९५४ साली भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर भंडारा येथे आले असताना वाटेत शहापूर येथे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. निवडणुकीच्या रणधुमाळीत बाबासाहेब त्या मंदिरापर्यंत जाऊ शहले नाहीत. परंतु मोटारीतूनच त्यांनी ते मंदिर न्याहाळले होते. १ आॅक्टोबर १९५६ च्या बौद्ध दिक्षेनंतर विश्वनाथ मंदिरातील मूर्ती काढून सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्यात आली. या मंदिराचा चेहरामोहरा बदलवून त्याचे बुद्ध विहार असे नामकरण करण्यात आले. एकदा भीमसागरच्या कार्यक्रमास नागपरुचे अ‍ॅड.सखारामपंत मेश्राम आले होते. कामठी येथे दरवर्षी १४ जानेवारीलाच भीमसागरचे आयोजन होत असे. त्यामुळे एकाच दिवशी या दोन्ही कार्यक्रमांना बौद्ध जनतेला उपस्थित राहणे अडचणीचे होते. म्हणूनच जनतेची गैरसोय टाळण्याकरिता शहापूर येथील भीमसागर १४ जानेवारीऐवजी १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात यावा. तसेच भीमसागर या नावाऐवजी भीममेळावा असे नाव देण्यात यावे अशी त्यांनी सूचना केली. अशाप्रकारे दरवर्षी कोणताही खंड न पडता १६ जानेवारीला भीम मेळावा भरू लागला, जो आजतागायत सुरु आहे.