शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:31 IST

बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारावर शेतकऱ्यांचा रोष ! लाखनी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान खरेदी केंद्रावर धान ...

बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारावर शेतकऱ्यांचा रोष !

लाखनी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीचा शेवटचा दिवस असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे साठवून ठेवलेले धान आपल्या वाहनाने पर्यायी व्यवस्था करून बाजार समिती येथे आणले. शेवटचा दिवस असल्याने धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तोबा गर्दी झाली होती. धानाची आवक वाढल्याने बारदान्याची टंचाई व धान ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने काही काळ बाजार समिती परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

शेतकऱ्यांची ही समस्या या क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यांच्या धानाची उचल झालीच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिल्याने अधिकारी तात्काळ लाखनी बाजार समिती येथे दाखल झाले आणि आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या धानाची उचल करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

शेवटची तारीख असल्याने शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेटसमोर धानाने भरलेले ट्रॅक्टर, ऑटो व ट्रकच्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस खोळंबा झाल्याने काही काळ वाहतूक थांबली होती. पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्यात आली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी पोहोचेपर्यंत शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात ताठर भूमिका घेतली होती.

शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मात्र बाजार समितीचे कोणतेही पदाधिकारी समस्येचे निराकरण करण्यासाठी उपस्थित नव्हते. बाजार समिती व शेतकऱ्यांचे प्रतिनिधीच डोळेझाक करत असतील, तर शेतकऱ्यांनी न्याय मागावा कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला होता. शेतकऱ्यांची ही समस्या आमदार नाना पटोले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. शेवटी पटोले यांनी आपले प्रतिनिधी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, राजू पालीवाल व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू निर्वाण यांना कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी येथे पाठविले, तसेच भ्रमणध्वनीवरून जिल्हा पणन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून संपूर्ण शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. डीएमओ येईपर्यंत शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना आकाश कोरे, राजू पालीवाल व राजू निर्वाण व सहकाऱ्यांना करावा लागला. डीएमओ आल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने सर्व शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी त्यांनी आणलेल्या बारदान्यासहित केली गेली. शेवटी प्रशासनाने सहानुभूतीची भूमिका घेत आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे धान मोजून घेतल्याने प्रश्न सुटला. मात्र, लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पदाधिकारी अनुपस्थित असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला.