शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने धान उत्पादक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामूळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असताना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.

ठळक मुद्देगारपिटीने घरांचे नुकसान । पीडितांच्या आर्थिक मदतीकडे नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर कधी अवकाळी पाऊस व गारपिटीसह वादळी पावसाने तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी बेजार झाले आहेत. हातात आलेले उन्हाळी धानपिक नष्ट होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या गारपीटीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांची तुरळक नुकसान देखील झाले आहे.लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामूळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असताना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.काही धानाचा निसवा होण्यापूर्वीच गारपिटीने धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊन पेरवा या किडयुक्त धानाच्या लोंबी बाहेर पडण्याची भिती देखील शेतकऱ्यांत वर्तविली जात आहे.या गारपिटीमुळे ग्रामीण भागातील घरांच्या छपरावरील कवेलुंची देखील तुरळक प्रमाणात हाणी झाल्याचे देखील काही नागरिकांनी सांगीतले आहे. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी सदरचा अवकाळी पोषक ठरताना ऊन्हाळी पीक ऊत्पादकांसाठी बाधक ठरल्याची बोंब आहे. महागडे बी-बियाने व पिककर्ज घेऊन खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर ऊन्हाळी हंगामात कधी अवकाळी व सध्याच्या गारपिटीसह वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.दरम्यान, खरीप हंगामात व ऊन्हाळी हंगामातही पावसाचे थैमान सुरु असल्याने निसर्ग कोपात अडकलेला शेतकरी पुढील काही महिन्यात सुरु होणाºया खरीप हंगामातही संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.रात्रभर वीज खंडितपालांदूर : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून सुसाट जोरदार वादळी वाºयासह विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. पालांदूर परिसरातील मऱ्हेगाव व पाथरी येथे गारपीट झाल्याची माहिती आहे. शेत शिवारातील झाडे उन्मळून पडली. मºहेगाव येथील कौलारू साध्या घरांचे नुकसान झाले. तई येथील गोपीचंद भंडारकर यांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले.उन्हाळी धानाचा हंगाम जोमात सुरू असताना वादळी वारा व पावसामुळे शेतकºयांच्या कळपा भिजल्या. हमीभाव खरेदी केंद्रावरील धान सुद्धा ओले झाले. शेतकºयांच्या शेतावरील मळणी करून विक्रीसाठी उपलब्ध असलेले धानाची पोते सुद्धा ओली झाली. पालांदूर - आसगाव मार्गावर दोन ठिकाणी वीज पडल्याने रात्रभर वीज प्रवाह खंडित झाला होता. वीज नसल्यामुळे आबालवृद्धांना त्रास सहन करीत महावितरणवर रोष व्यक्त करण्यात आला. पोहरा येथून पालांदूरला जोडण्याचा प्रयत्न केला असता अपेक्षित वीज दाब न मिळाल्याने अख्खी रात्र अंधारातच डासांच्या सोबतीने पालांदूर परिसरातील ५४ गावे संकटात होती.वीज अभियंता व प्रधान तंत्रज्ञ यांच्यासह संपूर्ण वीज कर्मचारी अख्ख्या रात्रभर आसगाव ते पालांदूर या ३३ केव्ही वर दोष शोधण्यासाठी प्रयत्नशील होते, मात्र त्यांनावीज पडून १५ शेळ्यांचा मृत्यूमासळ : वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून १५ शेळ्यांचा मृत्यू झाला. सदरची दुर्घटना शुक्रवारी १५ मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील किन्ही गुंजेपार येथे घडली. किन्ही गुंजेपार गावापासून जवळपास १० किमी अंतरावर विश्वनाथ भेंडारकर यांच्या शेतात तालुक्यातील अन्य काही शेळीपालन करणाऱ्या पशुपालकांचा ठिय्या होता. दिवसभर शेळ्यांना चराई करुन आणून राञीदरम्यान त्यांना शेतशिवारात बांधल्या जात असे. यातच विज कोसळून शेतशिवारात असलेल्या तब्बल १५ शेळ्यांचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत जैतपूर (बारव्हा) येथील हिरालाल ठाकरे, शुत्तम कोरे, निलेश गोमासे, गौरी नागोसे, चोपराम पंधरे यांच्या शेळ्या मृत्युमुखी पडल्या. नुकसान भरपाईची मागणी पिडीत शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस