शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने धान उत्पादक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामूळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असताना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.

ठळक मुद्देगारपिटीने घरांचे नुकसान । पीडितांच्या आर्थिक मदतीकडे नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर कधी अवकाळी पाऊस व गारपिटीसह वादळी पावसाने तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी बेजार झाले आहेत. हातात आलेले उन्हाळी धानपिक नष्ट होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या गारपीटीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांची तुरळक नुकसान देखील झाले आहे.लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामूळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असताना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.काही धानाचा निसवा होण्यापूर्वीच गारपिटीने धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊन पेरवा या किडयुक्त धानाच्या लोंबी बाहेर पडण्याची भिती देखील शेतकऱ्यांत वर्तविली जात आहे.या गारपिटीमुळे ग्रामीण भागातील घरांच्या छपरावरील कवेलुंची देखील तुरळक प्रमाणात हाणी झाल्याचे देखील काही नागरिकांनी सांगीतले आहे. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी सदरचा अवकाळी पोषक ठरताना ऊन्हाळी पीक ऊत्पादकांसाठी बाधक ठरल्याची बोंब आहे. महागडे बी-बियाने व पिककर्ज घेऊन खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर ऊन्हाळी हंगामात कधी अवकाळी व सध्याच्या गारपिटीसह वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.दरम्यान, खरीप हंगामात व ऊन्हाळी हंगामातही पावसाचे थैमान सुरु असल्याने निसर्ग कोपात अडकलेला शेतकरी पुढील काही महिन्यात सुरु होणाºया खरीप हंगामातही संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.रात्रभर वीज खंडितपालांदूर : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून सुसाट जोरदार वादळी वाºयासह विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. पालांदूर परिसरातील मऱ्हेगाव व पाथरी येथे गारपीट झाल्याची माहिती आहे. शेत शिवारातील झाडे उन्मळून पडली. मºहेगाव येथील कौलारू साध्या घरांचे नुकसान झाले. तई येथील गोपीचंद भंडारकर यांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले.उन्हाळी धानाचा हंगाम जोमात सुरू असताना वादळी वारा व पावसामुळे शेतकºयांच्या कळपा भिजल्या. हमीभाव खरेदी केंद्रावरील धान सुद्धा ओले झाले. शेतकºयांच्या शेतावरील मळणी करून विक्रीसाठी उपलब्ध असलेले धानाची पोते सुद्धा ओली झाली. पालांदूर - आसगाव मार्गावर दोन ठिकाणी वीज पडल्याने रात्रभर वीज प्रवाह खंडित झाला होता. वीज नसल्यामुळे आबालवृद्धांना त्रास सहन करीत महावितरणवर रोष व्यक्त करण्यात आला. पोहरा येथून पालांदूरला जोडण्याचा प्रयत्न केला असता अपेक्षित वीज दाब न मिळाल्याने अख्खी रात्र अंधारातच डासांच्या सोबतीने पालांदूर परिसरातील ५४ गावे संकटात होती.वीज अभियंता व प्रधान तंत्रज्ञ यांच्यासह संपूर्ण वीज कर्मचारी अख्ख्या रात्रभर आसगाव ते पालांदूर या ३३ केव्ही वर दोष शोधण्यासाठी प्रयत्नशील होते, मात्र त्यांनावीज पडून १५ शेळ्यांचा मृत्यूमासळ : वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून १५ शेळ्यांचा मृत्यू झाला. सदरची दुर्घटना शुक्रवारी १५ मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील किन्ही गुंजेपार येथे घडली. किन्ही गुंजेपार गावापासून जवळपास १० किमी अंतरावर विश्वनाथ भेंडारकर यांच्या शेतात तालुक्यातील अन्य काही शेळीपालन करणाऱ्या पशुपालकांचा ठिय्या होता. दिवसभर शेळ्यांना चराई करुन आणून राञीदरम्यान त्यांना शेतशिवारात बांधल्या जात असे. यातच विज कोसळून शेतशिवारात असलेल्या तब्बल १५ शेळ्यांचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत जैतपूर (बारव्हा) येथील हिरालाल ठाकरे, शुत्तम कोरे, निलेश गोमासे, गौरी नागोसे, चोपराम पंधरे यांच्या शेळ्या मृत्युमुखी पडल्या. नुकसान भरपाईची मागणी पिडीत शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस