शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

१० कोटी रुपयांचे ऊसाचे चुकारे थकीत

By admin | Updated: June 11, 2015 00:27 IST

एकीकडे धानाचे भाव पडले, महागाई वाढली, शेतातील उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसताना..

मार्चपासून वेतन ठप्प : कारभार वैनगंगा साखर कारखान्याचा करडी (पालोरा) : एकीकडे धानाचे भाव पडले, महागाई वाढली, शेतातील उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसताना शेतकऱ्यांना ऊसाच्या नगदी चुकाऱ्यांचा आधार वाटत होता. मात्र वैनगंगा शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे १० कोटींचे चुकारे जानेवारीपासून थकीत ठेवले आहेत. मार्च महिन्यापासून कामगारांना वेतन मिळालेले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. शासनाच्या जाहीर हमी भावापेक्षा कमी दरात ऊसाची खरेदी केली जात असतांनाही शेतकऱ्यांची कुरबुर नाही. कामगारांना कमी वेतन दिले जात असतानाही त्यांच्या तक्रारी नाहीत. मात्र एवढे सहन करुनही ऊसाचे वेळेवर चुकारे मिळत नसतील, कर्मचाऱ्यांना नियमित मिळत नसेल तर न्याय मागायचा कुणाकडे? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. दि.३१ मार्चपर्यंत ऊसाचे चुकारे देण्याचे आश्वासान कारखाना प्रशासनाने दिले होते. मात्र मार्च, एप्रिल, मे महिना संपून जून महिना सुरु झालेला असताना चुकाऱ्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही. कारखान्यातील २०० च्यावर कामगारांना मार्च २०१५ पासून वेतन मिळालेले नाही. परिणामी, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र सांगायचे कुणाला, तक्रार करणाऱ्याला कामावर ठेवले जाईल, याची शाश्वती नसल्यामुळे कुणीही बंड पुकारायला तयार नाहीत. चुकारे आज देऊ, उद्या देऊ या पलिकडे सांगायला तयार नाहीत. त्यामुळे ऊसाचे चुकारे अडचणीत सापडले असून कामगारांच्या वेतनाचा प्रश्न वेळीच सुटण्याची शक्यता धूसर झाली आहे. (वार्ताहर)कर्मचारी कपात मोहीमऊसाची लागवड वाढावी यासाठी कारखान्याने बीटनिहाय कार्यालय व कृषी सहाय्यक नेमले होते. मात्र वेळेवर चुकारे मिळत नसल्याने ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी कमी केली. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र घटले. कारखान्याने ऊसाचे क्षेत्र कमी झाल्याचे कारण सांगत कृषी कर्मचारी कपातीचे धोरण अंगिकारले आहे. त्यामुळे तरुणांवर बेरोजगार होण्याचे संकट ओढवले आहे. कारखान्याने २० ते २५ कृषी सहाय्यकांना कमी केले असले तरी कारखाना प्रशासन १० ते १२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचे सांगत आहे.साखरेचे उत्पादन सर्वत्र वाढल्यामुळे साखरेचे दर घसरले आहेत. साखरेची निर्यात करताना अडचणी येत आहेत. बँकांकडूनही पाहिजे त्या प्रमाणात पैसा उपलब्ध होत नसल्यामुळे ऊसाचे चुकारे व कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी लवकरच निर्णय होईल. शेतकऱ्यांचा एक रुपयाही ठेवला जाणार नाही. पुढील वर्षात दोन टप्प्यात वेतन देण्याच्या दिशेने विचार सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा दिले जाईल. जिथे कामे नव्हते तेथील १०-१२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. आवश्यक तिथे गुणवत्तेनुसार भरती केली जाईल. - दादा टिचकुलेउपाध्यक्ष, वैनगंगा शुगर अँड पावर कारखाना देव्हाडा.