शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण काळरात्र! टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
2
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
3
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
4
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
5
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
6
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
7
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
8
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
9
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
10
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
11
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
13
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
14
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
15
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
16
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
17
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
18
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
19
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
20
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
Daily Top 2Weekly Top 5

१० कोटी रुपयांचे ऊसाचे चुकारे थकीत

By admin | Updated: June 11, 2015 00:27 IST

एकीकडे धानाचे भाव पडले, महागाई वाढली, शेतातील उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसताना..

मार्चपासून वेतन ठप्प : कारभार वैनगंगा साखर कारखान्याचा करडी (पालोरा) : एकीकडे धानाचे भाव पडले, महागाई वाढली, शेतातील उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसताना शेतकऱ्यांना ऊसाच्या नगदी चुकाऱ्यांचा आधार वाटत होता. मात्र वैनगंगा शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे १० कोटींचे चुकारे जानेवारीपासून थकीत ठेवले आहेत. मार्च महिन्यापासून कामगारांना वेतन मिळालेले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. शासनाच्या जाहीर हमी भावापेक्षा कमी दरात ऊसाची खरेदी केली जात असतांनाही शेतकऱ्यांची कुरबुर नाही. कामगारांना कमी वेतन दिले जात असतानाही त्यांच्या तक्रारी नाहीत. मात्र एवढे सहन करुनही ऊसाचे वेळेवर चुकारे मिळत नसतील, कर्मचाऱ्यांना नियमित मिळत नसेल तर न्याय मागायचा कुणाकडे? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. दि.३१ मार्चपर्यंत ऊसाचे चुकारे देण्याचे आश्वासान कारखाना प्रशासनाने दिले होते. मात्र मार्च, एप्रिल, मे महिना संपून जून महिना सुरु झालेला असताना चुकाऱ्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही. कारखान्यातील २०० च्यावर कामगारांना मार्च २०१५ पासून वेतन मिळालेले नाही. परिणामी, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र सांगायचे कुणाला, तक्रार करणाऱ्याला कामावर ठेवले जाईल, याची शाश्वती नसल्यामुळे कुणीही बंड पुकारायला तयार नाहीत. चुकारे आज देऊ, उद्या देऊ या पलिकडे सांगायला तयार नाहीत. त्यामुळे ऊसाचे चुकारे अडचणीत सापडले असून कामगारांच्या वेतनाचा प्रश्न वेळीच सुटण्याची शक्यता धूसर झाली आहे. (वार्ताहर)कर्मचारी कपात मोहीमऊसाची लागवड वाढावी यासाठी कारखान्याने बीटनिहाय कार्यालय व कृषी सहाय्यक नेमले होते. मात्र वेळेवर चुकारे मिळत नसल्याने ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी कमी केली. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र घटले. कारखान्याने ऊसाचे क्षेत्र कमी झाल्याचे कारण सांगत कृषी कर्मचारी कपातीचे धोरण अंगिकारले आहे. त्यामुळे तरुणांवर बेरोजगार होण्याचे संकट ओढवले आहे. कारखान्याने २० ते २५ कृषी सहाय्यकांना कमी केले असले तरी कारखाना प्रशासन १० ते १२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचे सांगत आहे.साखरेचे उत्पादन सर्वत्र वाढल्यामुळे साखरेचे दर घसरले आहेत. साखरेची निर्यात करताना अडचणी येत आहेत. बँकांकडूनही पाहिजे त्या प्रमाणात पैसा उपलब्ध होत नसल्यामुळे ऊसाचे चुकारे व कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी लवकरच निर्णय होईल. शेतकऱ्यांचा एक रुपयाही ठेवला जाणार नाही. पुढील वर्षात दोन टप्प्यात वेतन देण्याच्या दिशेने विचार सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा दिले जाईल. जिथे कामे नव्हते तेथील १०-१२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. आवश्यक तिथे गुणवत्तेनुसार भरती केली जाईल. - दादा टिचकुलेउपाध्यक्ष, वैनगंगा शुगर अँड पावर कारखाना देव्हाडा.