शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

प्रतापगड येथे तिबेटीयनांचा शांतिमार्च

By admin | Updated: March 12, 2016 00:51 IST

१० मार्च १९५९ रोजी चीनने तिबेटवर आक्रमण करुन तिबेट बळकावले व तिबेटीयन जनतेवर अत्याचार केले.

तहसीलदारांना निवेदन : तिबेट राष्ट्रीय उत्थान दिवस अर्जुनी मोरगाव : १० मार्च १९५९ रोजी चीनने तिबेटवर आक्रमण करुन तिबेट बळकावले व तिबेटीयन जनतेवर अत्याचार केले. या घटनेचा निषेध तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून रिजनल तिबेटीयन युथ काँग्रेस, भारत-तिबेट मैत्री संघ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.१०) प्रतापगड येथे शांती मार्च काढला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.या शांतीमार्चचे तिबेट राष्ट्रीय उत्थान दिवसाचा वर्धापन दिवस म्हणून आयोजन केले जाते. १० मार्च १९५९ रोजी तिबेटच्या तीन प्रांतातील लाखों तिबेटीयनांनी राजधानी ल्हासा येथे सामूहिकरित्या दलाई लामा यांचे दिर्घायुष्य, तिबेट एक स्वतंत्र देश आहे व चीनने तिबेटमधून निघून जावे, अशी नारेबाजी केली. चीनप्रती तीव्र विरोध दर्शवून तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तीचा परिचय दिला. या ऐतिहासिक दिवसाचे महत्व म्हणून तिबेट राष्ट्रीय उत्थान दिवसानिमित्त शांती मार्चचे आयोजन केले जाते. यावर्षी ५७ वा वर्धापन वर्ष आहे. तिबेटियन हा दिवस प्रांत, क्षेत्र, समाज व आपसी मतभेद विसरुन या दिवसाचे स्मरण करतात. तिबेटच्या स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्यांच्या मागण्या, देशाची ऐतिहासिक सत्यता, पूर्वजांच्या आकांक्षा व विररांच्या शूरगाथेला हृदयात कोरुन एकजुटतेने आक्रमणकारी चीनचा विरोध करुन राष्ट्रहिताच्या कार्याला पुढे नेण्याचे आवाहन तिबेट यूथ काँग्रेसने केले आहे. गुरुवारी नोरग्यालिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगड येथील रिजनल तिबेटीयन यूथ काँग्रेसचे सचिव कर्मा थामजोय, अध्यक्ष केलसंग छोटक, लामा लोबसंग तेन्बा, डोलकर लामो, कर्मा शामजो, छोयबे फुन्सोक वांग्याल यांच्या शिष्टमंडळाने महामहिम राष्ट्रपती भारताचे प्रधानमंत्री, विदेशमंत्री व चीन दूतावासाचे नावे असलेले निवेदन तहसीलदार डी.सी. बोम्बर्डे यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)