शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

गारपिटीसह वादळाचा तडाखा

By admin | Updated: June 2, 2015 00:35 IST

रविवारला रात्री अचानक वादळ वारांसह गारपिट झाली. यात जीवीतहानी झाली नसून धानपिक व कवेलूंच्या घराचे ....

धानपिकासह कौलारू घरांचे मोठे नुकसानवातावरणात गारवा, जीवित हानी टळली, वृक्ष कोलमडले, विद्युत खांबासह टिनाचे पत्रे पडलेलाखांदूर : रविवारला रात्री अचानक वादळ वारांसह गारपिट झाली. यात जीवीतहानी झाली नसून धानपिक व कवेलूंच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विद्युत तारा व खांब तुटल्याने विद्युत विभागाचे मोठे नुकसान झाले. सध्या विद्युत पुरवठा रात्री पासून बंद असून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने लाखांदूर वडसा मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.दिवसभर उन्हाचा तडाखा व रात्री अचानक जोरदार वादळी वारा व गारपीटीचा तडाखा बसल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी कवेलूंच्या घरात राहणाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरला आहे. उन्हाळी धानपिकाची कापणी व मळणी सुरु असताना पावसामुळे व गारपिटीमुळे तोंडावर आलेले धानपिक निसर्गाने हिसकावले. विक्रीसाठी आधारभूत धान खरेदी केंद्र व बाजार समितीच्या परिसरात ठेवलेले हजारो हेक्टर धान्य पाण्यात भिजले. धानाला योग्य भाव नाही. उलट पाण्यात भिजले यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला. कडप्पा पावसात भिजल्याने शेतकरी परिवारासोबत जीवाचे रान करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. वादळाचा सर्वात जास्त फटका लाखांदूर, अंतरगाव, चिचोली, दांडेगाव, कोच्छी, मांढळ, भागडी, परसोडी, आथली, आसोला, कुडेगाव, मांदेड, पाहुणगाव, डोकेसरांडी, ओपारा सरांडी बु., ढोलसर तथा सभोवतालच्या परिसरात जास्त बसला. लाखांदूर येथील फुटपाथवर असलेल्या पानटपऱ्या, भोजनालय भाजीपाला दुकाने पुर्णत: वादळाने उध्वस्त झाले. कवेलूंच्या घरांचे कवेलू उडाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले. मंगल कार्यालये, दुकानांचे टिनपत्रे उडाल्याने अतोनात नुकसान झाले. सर्वात जास्त फटका रस्त्यालगतची झाडे, कार्यालयातील झाडे, फळांची झाडे, आंब्याच्या झाडांचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानझाले. आसोला, आथली, भागडी, कोच्छी या गावातील भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळाला सुरुवात होताच अनेक गावातील विद्युत खांब पडले, तारा तुटल्या यामुळे रात्री ११ वाजतापासून विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद आहे. सकाळपासून विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी कमालीचे प्रयत्न करीत आहेत. झाडांमुळे विद्युत तारा तुटल्याने झाडे तोडण्याचा सपाटा विद्युत विभागाने सुरु केला आहे. येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयांनी अनेक वर्षापासूनचे मोठे झाडे तुटल्याने गावकऱ्यांनी पहाटेच त्याकडे नेण्यासाठीझुंबड केली. तर चिचोली लाखांदूर सोनी मार्गावर अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने तसेच विद्युत तारा रस्त्यावर लोंबकळत असल्याने रात्रभर वाहतुकीची कोंढी निर्माण झाली होती. वादळी वारा व गारपिटीच्या तडाख्याचा तसेच नुकसानीची तिव्रता बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नरेश चुन्ने तसेच काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोहर महावाडे, सदाराम दिघोरे, ताराचंद मातेरे, मनोहर राऊत, गोपाल मेंढे, मागास सेलचे जिल्हा अध्यक्ष (राकाँ) चंद्रशेखर टेंभुर्णे, जितेंद्र पारधी, रामचंद्र परशुरामकर, ओमप्रकाश सोनटक्के, धनराज ढोरे, वामन मिसार यांनी पक्षाच्या वतीने तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ आर्थिक मदत व ताडपत्रीचे वाटप करण्याची मागणी केली. घरांची पडझळखरबी (नाका) : भंडारा तालुका अंतर्गत येणाऱ्या खराडी गावामध्ये काल रात्री १० वाजता अचानक वादळाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. यात अनेकांना नुकसान सहन करावे लागले. घराचे छत उडाले तर काही ठिकाणचे विद्युत पोल मोडले व साईबाबा राईस मिल खराडी येथील राईस मिलचे टिनाचे छत उडाल्यामुळे धान पाण्यात खराब झाले व त्यामुळे १ लाख २५ हजाराचे नुकसान झाले आहेत. नुकसान झालेल्यामध्ये कवळू मुरकुटे, केशव हिवसे, आसाराम मुरकुटे, युवराज मुरकुटे, दिपांकर बांगर, इंद्रजित बांगर आदींचे नुकसान झाले. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)मान्सूनपूर्व पावसाची हजेरीपालांदूर : असह्य उकाड्याने हैराण असताना काल मध्यरात्री जोरदार पूर्व पश्चिम वाऱ्यासह पालांदूर परिसरात वीस मिनिटे पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा झाला असून उन्हाच्या काहिलीपासून जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. आसगाव पालांदूर वीज वाहिनीवर झाडे कोसळल्याने पालांदूर परिसर रात्रभर अंधारात होता. सकाळी ढगांनी आकाश आच्छादले होते. वातावरण एकदम प्रसन्न व आल्हाददायक वाटले. मान्सूनपूर्व संधेला आलेल्या पावसाने शेतकरी शेतजमीनीच्या मशागतीच्या कामाला जोमाने लागणार आहे. येत्या हप्त्याभरात विभषीत मान्सून डेरेदाखल होणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे या पावसाला महत्व देत शेतकरी कामाला लागला आहे.रोहिणी पावसाचा नक्षत्र सुरु आहे. रोहिण्या अपेक्षित बरसल्या तर शेती व्यवसायाला त्याचा लाभ होऊन बागायत मालात वाढ व दर्जात सुधारणा होणार व ६ जून पासून खरीपाचे पऱ्हे टाकणीला आरंभ होणार.चक्रीवादळ व गारपिटीचा तडाखा संपूर्ण तालुक्याला बसला. धानपिक कापणी व मळणीची ही वेळ असल्याने यावेळी सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. लगेच कृषी सहाय्यकांना तोंडी सूचना देवून प्राथमिक नुकसानीची माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु शासनस्तरावरून जोपर्यंत सर्व्हेक्षणाचे आदेश येत नाही तोपर्यंत सखोल सर्व्हेक्षण होणार नाही.- निलेश गेडामतालुका कृषी अधिकारी लाखांदूर