शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्हा परिषदेत तिरंगी-चाैरंगी लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या ५२ गटांची निवडणूक घाेषित झाली. मात्र, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने १३ गटांतील निवडणुकीला स्थगिती मिळाली. आता ३९ गटांतील निवडणूक हाेत आहे. मंगळवारपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. परंतु सर्वाेच्च न्यायालयात काय निकाल लागताे याकडे लक्ष लागले हाेते. अखेर बुधवारी निवडणूका हाेणार हे निश्चित झाले आणि सर्वच उमेदवार प्रचाराला लागले आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनिश्चिततेच्या सावटात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने बुधवारपासून प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातील ३९ गटांमध्ये सध्यातरी तिरंगी-चाैरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी अपक्षांचा जाेर दिसत असून यामुळे पक्षाच्या उमेदवारांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असली तरी निवडणूका पुढे जाणार तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित हाेत आहे.जिल्हा परिषदेच्या ५२ गटांची निवडणूक घाेषित झाली. मात्र, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने १३ गटांतील निवडणुकीला स्थगिती मिळाली. आता ३९ गटांतील निवडणूक हाेत आहे. मंगळवारपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. परंतु सर्वाेच्च न्यायालयात काय निकाल लागताे याकडे लक्ष लागले हाेते. अखेर बुधवारी निवडणूका हाेणार हे निश्चित झाले आणि सर्वच उमेदवार प्रचाराला लागले आहेत. भंडारा तालुक्यातील नऊ गटांत निवडणूक होत असून गणेशपूर, खोकरल, धारगाव, आमगाव, ठाणा याठिकाणी चौरंगी तर इतर ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. सर्वांचे लक्ष गणेशपूरच्या निवडणुकीकडे लागले आहे. तुमसर तालुक्यातील चिखला व आंबागड येथे चाैरंगी तर आष्टी बपेरा येरली खापा, देव्हाडी येथे तिरंगी लढत हाेत आहे. माेहाडी तालुक्यातील चारही गटामध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे. आंधळगाव पाचगांव, बेटाळा आणि करडी येथे रणधुमाळी सुरू आहे. बेटाळा क्षेत्रात अपक्षाने जाेर वाढविला आहे. साकाेली तालुक्यातील सहा गटांत निवडणूक हाेत असून पिंडकेपार, कुंभली, परसाेडी, वडद येथे चाैरंगी तर किन्ही, सानगडी गटात तिरंगी लढत हाेत आहे. वडद, कुंभली आणि पिंडकेपार येथे माेठ्या प्रमाणात अपक्ष रिंगणात आहेत.लाखनी तालुक्यातील केवळ दाेन गटांत निवडणूक हाेत असल्याने येथे उत्साह दिसत नाही. पाेहरा आणि लाखांदूर येथे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. परंतु पुढे जाण्याची प्रतीक्षा सुरू आहे. पवनी तालुक्यातील अड्याळ पिंपळगाव, काेंढा, आसगाव आणि सावरला येथे तिरंगी लढतीची शक्यता असून कुठेही सरळ लढत हाेणार नाही. लाखांदूर तालुक्यात मासळ, दिघाेरी, भागडी, सरांडी, माेहरणा, पिंपळगाव येथे निवडणूक हाेत असून सर्वच ठिकाणी तिहेरी लढतीची शक्यता आहे. विविध पक्षात बंडखाेरी झाली असून, १२ अपक्ष उमेदवार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे गणित बिघडवू शकते.

प्रचाराला सुरुवात, अन् उमेदवारांची घालमेल- ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर निवडणूक हाेणार की नाही याबाबतची अनिश्चितता गुरुवारी सायंकाळपर्यंत कायम हाेती. राज्य मंत्रीमंडळात निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु दिवसभरात राज्य निवडणूक आयाेगाकडून काेणताही आदेश काढण्यात आला नाही. उमेदवारांनी दिवसभर प्रचार केला. परंतु निवडणूक स्थगित तर हाेणार नाही ना? अशी शंकाही त्यांना सतावत हाेती. प्रत्येकजण निवडणूक आयाेगाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून हाेते. दाेन दिवसांपासून प्रचाराला सुरुवात झाली असली तरी उमेदवार प्रचार करताना सावध पवित्रा घेत असल्याचे दिसत आहे. ऐनवेळी निवडणूक रद्द झाली तर आपल्याला आर्थिक फटका बसू नये अशी त्यांची भूमिका आहे. एकीकडे प्रचारतर करावा लागत आहे. परंतु निवडणूक रद्द झाली तर काय अशी अनिश्चितताही सतावत आहे.

ओबीसींच्या भूमिकेकडे उमेदवारांचे लक्ष- निवडणूक झाली आणि आपल्या गटातील ओबीसी समाजाने निवडणूकीवर बहिष्कार टाकला तर काय? अशी शंकाही उमेदवारांना सतावत आहे. ओबीसी संघटनानी आरक्षण नाही तर मतदान नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उमेदवार संभ्रमात सापडले आहे. भंडारा जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात ओबीसी समाज असून निवडणूकीत भाग घेतला नाही तर माेठा प्रभाव या निवडणूकीवर पडू शकताे. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद