शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

लघु पाटबंधारे विभागाचे तीन उपविभाग बंद

By admin | Updated: July 17, 2016 00:21 IST

भंडारा तलावांचा जिल्हा म्हणून शासनदप्तरी नोंद आहे. तलावांच्या देखरेखीकरिता राज्य शासनाने तुमसर, मोहाडी व लाखांदूर तालुक्याकरिता स्वतंत्र उपविभाग सुरू करण्याचे आदेश दिले होते.

जलयुक्त शिवार योजनेवर प्रश्नचिन्ह : तुमसर, मोहाडी, लाखांदूरचा समावेशमोहन भोयर तुमसरभंडारा तलावांचा जिल्हा म्हणून शासनदप्तरी नोंद आहे. तलावांच्या देखरेखीकरिता राज्य शासनाने तुमसर, मोहाडी व लाखांदूर तालुक्याकरिता स्वतंत्र उपविभाग सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. परिणामी जलयुक्त शिवार व मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन कार्यक्रमांना खीळ बसली आहे. लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद, भंडारा येथे राज्य शासनाने तुमसर, मोहाडी व लाखांदूर येथे तीन स्वतंत्र उपविभाग सुरू करण्याचे आदेश सहा ते सात वर्षांपुर्वी दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही. राज्य शासन जलयुक्त शिवार व मालगुजारी तलाव पुनरूज्जीवनाला उपविभागाअभावी खीळ बसली आहे. भंडारा जिल्ह्यातच मामा तलाव आहेत. भंडारा जिल्ह्यात १,१५४ मामा तलाव आहे. एका शाखा अभियंत्यावर तीन तीन तालुक्यांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभावी, योग्यरित्या नियोजन करता येणे शक्य नाही.तुमसर तालुक्यासह इतर तालुक्यात पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. तलाव अजून रिकामेच आहे. अनेक वर्षापासून मामा तलाव गाळाने भरले आहेत. देखभाल, दुरूस्ती करण्यात आले नाही. यामुळे या हंगामात हे तलाव सिंचन करण्यास असमर्थ ठरणार आहेत. कोळी बांधवांची मत्स्य शेती धोक्यात आली आहे. येथे जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. विभाग मंजुरीकरिता कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. हे उपविभाग मराठवाड्यात जाण्याची शक्यता असून याकरिता हालचाली सुरू आहेत. सात वर्षापुर्वी मंजूर झालेले उपविभाग का सुरू झाले नाही हा संशोधनाचा विषय आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष कारणीभूत आहे. प्रत्येक तालुक्यात मामा तलावांची मोठी संख्या आहे. राज्यात इतकी तलावांची संख्या कुठेही नाही. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे महत्वपूर्ण तलाव शेवटची घटका मोजत आहेत. शेतकरी व मत्स्यशेती करणाऱ्याकरिता संजिवनी ठरणारे तलावांना येथे घरघर लागली आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नवीन तलव, बोळी, साठवण तलाव, मामा तलावांचे पुनरूज्जीवन करणे हेही एक शासनाचे मिशन आहे, परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.लघु पाटबंधारे विभाग अंतर्गत तुमसर, मोहाडी, लाखांदूर येथे उपविभागांना सहा ते सात वर्षापुर्वी मंजुरी देण्यात आली. हे उपविभाग सुरू करण्याकरिता भंडारा जिल्हा परिषदेने जलसंपदा विभागाकडे पत्र पाठविले आहे. जिल्हा परिषदेकडे उपविभागाकरिता कर्मचारी उपलब्ध असल्याचा अहवाल सादर केला आहे.-पी.एस. पराते, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जि.प. भंडारा. मामा तलावांच्या दुर्लक्षामुळे शेतीला सिंचन होणार नाही, मत्स्यशेती बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. -संजय केवट, संचालक, राष्ट्रीय मत्स्यजिवी सहकारी संघ, नवी दिल्ली.