शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

काेराेनात शिवभोजन थाळीने हजारो लोकांचे पोट भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सुरुवातीला १३ शिवभोजन केंद्रे होती. मात्र, आता नागरिकांचा वाढत असलेला प्रतिसाद पाहून राज्य शासनाने या केंद्रांची संख्या वाढविल्याने आता जिल्ह्यात एकूण ३८  केंद्रांमार्फत मोफत शिवभोजन दिले जात आहे. १४ एप्रिल ते १५ जुलैपर्यंत मोफत शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार आहे. संचारबंदीतही आधार ठरल्याने या योजनेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. राज्यस्तरावरून अनुदानाचा विलंब झाल्यास केंद्र चालकांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागते.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३८ कार्यरत केंद्रे : १४ जुलैपर्यंत मिळणार मोफत थाळी

संतोष जाधवर लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  गोरगरिबांना वेळेत अन्न मिळावे, त्यांची उपासमार थांबावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळीची योजना सुरू केली. या शिवभोजन थाळीचा अनेक गरजूंना आधार होत असून, कामानिमित्ताने बाहेरगावी आलेल्यांनाही पोटभर जेवण मिळत असल्याने योजना सर्वसामान्यांसाठी आधार ठरली आहे. जिल्ह्यात सुरुवातीला १३ शिवभोजन केंद्रे होती. मात्र, आता नागरिकांचा वाढत असलेला प्रतिसाद पाहून राज्य शासनाने या केंद्रांची संख्या वाढविल्याने आता जिल्ह्यात एकूण ३८  केंद्रांमार्फत मोफत शिवभोजन दिले जात आहे. १४ एप्रिल ते १५ जुलैपर्यंत मोफत शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार आहे. संचारबंदीतही आधार ठरल्याने या योजनेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. राज्यस्तरावरून अनुदानाचा विलंब झाल्यास केंद्र चालकांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, जिल्हास्तरावरून अनुदान प्राप्त होताच केंद्र चालकांना वितरित करण्यासाठी पाठपुरावा केला जाताे.

 केंद्रचालक म्हणतात....

शिवभोजन थाळीसाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आम्ही कोरोना नियमांच्या पालनात एका वेळी दहा जणांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. जिल्हा परिषद प्रांगणात आमचे केंद्र असल्याने येथे अनेक कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. सर्व शासन नियमांनुसार पूर्ण व्यवस्था आहे. - रंजना खोब्रागडे, व्यवस्थापक, नवप्रभा साधन केंद्र, भंडारा

दुसऱ्यांदा लॉकडाऊन सुरू झाले होते. त्यावेळी केंद्रात अधिक ग्राहक येत होते. कधी कधी अनुदान मिळविण्यास थोडा उशीर लागला तरी आम्ही सर्वसामान्यांची गैरसोय होऊ देत नाही. आता अनुदान मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे वितरण सुलभ हाेते.शिवभाेजन केंद्र चालक, भंडारा

जिल्हा परिषद कँटीनच्या शिवभोजनाची चवच न्यारी... 

भंडारा शहरातील जिल्हा परिषद कँटीनमधील शिवभोजन थाळीची चवच न्यारी असल्याचे येथील आलेल्या ग्राहकांनी सांगितले. याशिवाय येथे कोरोना नियमांचे पालन व स्वच्छता राहत असल्याने माविंम संचलित केंद्रांतर्गत कार्यरत शिवभोजन केंद्राकडे अनेकांचा ओढा आहे. केंद्र चालकांना सरकारतर्फे अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. १४ एप्रिलपासून राज्य शासनाने मोफत शिवभोजन थाळी देण्यास सुरुवात केली आहे. १५ जुलैपर्यंत मोफत थाळी मिळणार आहे. 

 ग्रामीणला ३५ तर शहरात ४५  रुपये अनुदान - राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीत दोन चपात्या, एक भाजी, भात, आमटी असे पोटभर जेवण दिले जाते. सर्वसामान्यांना जरी मोफत अथवा पाच ते दहा रुपये मोजावे लागत असले तरी शासन केंद्र चालकांना ग्रामीण भागात ३५ रुपये तर शहरी भागात ४५ रुपयांचे अनुदान देत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उत्तम प्रतीचे जेवण मिळत असल्याने ही योजना सामान्यांना दिलासा देणारी ठरली आहे. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी लवकर आलेल्या नागरिकांना शिवभोजन थाळीमुळे कमी पैशात चांगले जेवण  मिळत आहे. 

शिवभोजन केंद्रांचा इष्टांक शासनाने वाढविला असून, जिल्ह्यात सध्या ३८ शिवभोजन केंद्रे कार्यरत असून, त्या माध्यमातून अनेकांना लाभ दिला जात आहे. केंद्राचे अनुदान हे ऑनलाइन दिले जाते. राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होताच केंद्रांना तत्काळ वितरित करण्यात येते. - अनिल बन्सोड,जिल्हा पुरवठा अधिकारी,भंडारा  

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय