शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

हजारो एकरात उन्हाळी धान रोवणीचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:27 IST

चुलबंध नदीखोऱ्यात उन्हाळी धान रोवणीला प्रारंभ झाला असून संपूर्ण फेब्रुवारी महिना महिला मजुरांना काम मिळाले आहे. पाणी टंचाईचा हिशेब करता श्ोतकऱ्यांना शक्य तितक्या बांध्यात धान लावगडीचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देहजारो एकरात रोवणी : मजूरटंचाईचा सामना

आॅनलाईन लोकमतपालांदूर चौ. : चुलबंध नदीखोऱ्यात उन्हाळी धान रोवणीला प्रारंभ झाला असून संपूर्ण फेब्रुवारी महिना महिला मजुरांना काम मिळाले आहे. पाणी टंचाईचा हिशेब करता श्ोतकºयांना शक्य तितक्या बांध्यात धान लावगडीचा निर्णय घेतला आहे.पालांदूर, मऱ्हेगाव, ढिवरखेडा, वाकल, पाथरी, खराशी, खुनारी, लोहारा, नरव्हा, दिघोरी परिसरात उन्हाळी धानाचा हंगाम जोरात आला आहे. यामुळे रोवणीकरिता महिला मजुरांची तीव्र टंचाई या भागात जाणवत आहे. किमान २० दिवस हा हंगाम राहणार असून शेतकऱ्यांचा अख्खा कुटूंब शेतात खपत आहे. स्वतंत्र सिंचन व्यवस्थेतून शेतकरी किमान २ एकरापर्यंत उन्हाळी धान लावण्याचा नियोजन करतो. मात्र भूजलटंचाई व वीज समस्येचा विचार करता या वर्षाला केवळ १ ते दीड एकरातच धानाचा हंगाम धरला आहे. रोवणीचा दर पर एकराला दोन हजार दोनशे रुपये एवढा निश्चीत झाला असून मजुरी पध्दतीने दिवसाला ११० रुपये एवढा दर महिलांकरिता दिला जात आहे. ट्रॅक्टरच्या माध्यमातून चिखलणी सुरु असून ९० टक्के शेती आजही ट्रॅक्टरच्या आधाराने कसली जात आहे. ट्रॅक्टर शेतीला वरदानच ठरले आहे. झटपटच्या काळात वेळेची व पैश्याची बचत ट्रॅक्टरमुळे शक्य झाले आहे.गोसेखुर्द ने हरितक्रांती येईल हे एक दिवास्वप्नच ठरत आहे. धान लागवड कमी करण्याकरिता मंडळकृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांना प्रामाणिकतेने प्रयत्न करीत हरभºयाचे क्षेत्रफळ सुमार वाढविले आहे. भाजीपाल्याचे सुध्दा क्षेत्र वाढले आहे.प्रशासनाच्या हाकेला साथ देत धानपीक कमी केले आहे. भाजीपाला लागवड केली असून बाजारभाव कोसळल्याने भाजीपाल्याची शेती नकोशी झाली आहे. रात्रंदिवस श्रम उपसत भाजीपाला उत्पादीत केला. मात्र भावच नसल्याने लागलेले पैसेही निघत नसल्याने नाईलाजाने धानच बरे म्हणावे लागते.- क्रिष्णा देशमुख, पालांदूर चौ.शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा बारमाही अभ्यास ठेऊनच भाजीपाल घ्यावा. गटागटाने एकत्रीत एका-एकाने वेगवेगळे पीक घ्यावे. एकच पिक अधिक क्षेत्रात लावण्यापेक्षा दोन तीन पिक /भाजीपाला घ्यावा. यामुळे निश्चितपणे इथून नाही तर तिथून पैसे येणारच.- पी.पी. गिदमारे, तालुका कृषी अधिकारी लाखनीपाणी ही राष्टÑीय संपत्ती आहे. तिचा सदुपयोग व्हावा याकरिता कमी पावसात व्यवस्थीत सिंचन व्हावे याकरिता ढिंबक चा वापर करुन धानाऐवजी इतरपिके बाजारपेठेच्या अभ्यासाने उत्पादीत करावी.- मंगेश घोळके, मंडळ कृषी अधिकारी पालांदूर चौ.