शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हे तर शेतकरी आत्महत्या वाढविण्याचे धोरण; अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 18:08 IST

तीन हजार कोटींची मदत गेली कुठे?

भंडारा : राज्यात गत अडीच महिन्यांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही सरकार आहे की नाही, असे जाणवत आहे. बळीराजा आत्महत्या करत असताना कृषिमंत्री फक्त घोषणा करून मोकळे होत आहेत. आत्महत्यामुक्त राज्य करू, असे अभिवचन देणारे सरकार आता शेतकरी आत्महत्या वाढविण्याचे धोरण राबवत असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

मंगळवारी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा परिसरात अतिवृष्टी व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतल्यानंतर भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ नेते नरेश डहारे, जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अंबादास दानवे म्हणाले, भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे धानपीक अक्षरशः सडून गेले आहे. आजही शेतशिवारात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. परंतु, हे सरकार झोपल्याचे सोंग घेऊन आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असताना कृषिमंत्री फक्त घोषणा करून मोकळे होत आहेत. कृषिमंत्र्यांनी तीन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली, मात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तीन रुपयेही आले नाहीत. आपद्ग्रस्तांना मदत करण्याऐवजी वेळ मारून नेली जात आहे. राज्यात सर्वत्र अशीच स्थिती आहे. ठाकरे सरकारशी गद्दारी करून स्थापन केलेले हे सरकार सर्वच स्तरावर सपेशल फेल ठरल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणAmbadas Danweyअंबादास दानवेbhandara-acभंडारा