शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हे तर शेतकरी आत्महत्या वाढविण्याचे धोरण; अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 18:08 IST

तीन हजार कोटींची मदत गेली कुठे?

भंडारा : राज्यात गत अडीच महिन्यांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही सरकार आहे की नाही, असे जाणवत आहे. बळीराजा आत्महत्या करत असताना कृषिमंत्री फक्त घोषणा करून मोकळे होत आहेत. आत्महत्यामुक्त राज्य करू, असे अभिवचन देणारे सरकार आता शेतकरी आत्महत्या वाढविण्याचे धोरण राबवत असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

मंगळवारी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा परिसरात अतिवृष्टी व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतल्यानंतर भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ नेते नरेश डहारे, जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अंबादास दानवे म्हणाले, भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे धानपीक अक्षरशः सडून गेले आहे. आजही शेतशिवारात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. परंतु, हे सरकार झोपल्याचे सोंग घेऊन आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असताना कृषिमंत्री फक्त घोषणा करून मोकळे होत आहेत. कृषिमंत्र्यांनी तीन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली, मात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तीन रुपयेही आले नाहीत. आपद्ग्रस्तांना मदत करण्याऐवजी वेळ मारून नेली जात आहे. राज्यात सर्वत्र अशीच स्थिती आहे. ठाकरे सरकारशी गद्दारी करून स्थापन केलेले हे सरकार सर्वच स्तरावर सपेशल फेल ठरल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणAmbadas Danweyअंबादास दानवेbhandara-acभंडारा