शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

हे तर शेतकरी आत्महत्या वाढविण्याचे धोरण; अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 18:08 IST

तीन हजार कोटींची मदत गेली कुठे?

भंडारा : राज्यात गत अडीच महिन्यांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही सरकार आहे की नाही, असे जाणवत आहे. बळीराजा आत्महत्या करत असताना कृषिमंत्री फक्त घोषणा करून मोकळे होत आहेत. आत्महत्यामुक्त राज्य करू, असे अभिवचन देणारे सरकार आता शेतकरी आत्महत्या वाढविण्याचे धोरण राबवत असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

मंगळवारी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा परिसरात अतिवृष्टी व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतल्यानंतर भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ नेते नरेश डहारे, जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अंबादास दानवे म्हणाले, भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे धानपीक अक्षरशः सडून गेले आहे. आजही शेतशिवारात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. परंतु, हे सरकार झोपल्याचे सोंग घेऊन आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असताना कृषिमंत्री फक्त घोषणा करून मोकळे होत आहेत. कृषिमंत्र्यांनी तीन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली, मात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तीन रुपयेही आले नाहीत. आपद्ग्रस्तांना मदत करण्याऐवजी वेळ मारून नेली जात आहे. राज्यात सर्वत्र अशीच स्थिती आहे. ठाकरे सरकारशी गद्दारी करून स्थापन केलेले हे सरकार सर्वच स्तरावर सपेशल फेल ठरल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणAmbadas Danweyअंबादास दानवेbhandara-acभंडारा