शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जीव मुठीत धरून 'त्यांनी' रात्री जागून काढल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:56 IST

भंडारात ६० इमारती जीर्ण : अतिवृष्टीने वाढली अनेकांची धडकी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरात जीर्ण इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. नागरिक जीर्ण इमारतींतून स्वतःहून बाहेर निघत नाहीत तर दुसरीकडे प्रशासन कारवाईची नोटीस बजावून दिवस ढकलत आहे. पावसाळ्यात जीर्ण इमारती कोसळण्याच्या घटना जिल्ह्यात घडत असतात. सतर्कता न बाळगल्यास जीवित व वित्तहानी होते. पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा मुद्दा दरवर्षीच चर्चेत असतो; मात्र, त्यावर ठोस उपाययोजना भंडारा नगरपालिकेकडून होत नाही.

भंडारा शहरात ५० ते ६० वर्षे व त्यापेक्षाही जुन्या इमारती आजही बजरंग चौक, हेडगेवार चौक, मोठा बाजार मेन रोड परिसरात दिसून येत आहेत. या इमारतींमध्ये वास्तव्यासह दुकाने थाटली आहेत. मोडकळीस आलेल्या इमारतींचा वापर न करण्याबाबत प्रशासनाकडून बजावले जाते; परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. भंडारा शहरात जुन्या वस्तीत एका बाजूला एक अशा खेटून इमारती उभ्या आहेत. त्यामुळे एखाद्या जीर्ण इमारतीचा भाग कोसळल्यास आजूबाजूच्या रहिवाशांच्या जिवालादेखील धोका पोहोचण्याची भीती असते. पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासन अतिधोकादायक, धोकादायक इमारतींना नोटीस पाठवते. परंतु, या नोटिसांकडे दुर्लक्ष करून त्यात वास्तव्य केले जात असल्याचे चित्र भंडारा शहरात दिसून येत आहे.

शासकीय इमारती, निवासस्थाने जीर्ण शहरात शासकीय कार्यालयांच्या व वसाहतींच्या अनेक इमारती जीर्ण झालेल्या आहेत. काही इमारती सिमेंट व लोखंडी पत्र्याच्या आहेत. शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने शासकीय वसाहती व कार्यालयीन इमारती जैसे थे स्थितीत उभ्या आहेत.

शहरात धोकादायक ६० इमारती भंडारा शहरात जवळपास ६० इमारती जीर्ण असून, धोकादायक स्थितीत आहेत. या इमारत मालकांना स्थानिक प्रशासनाने नोटिसा बजावलेल्या आहेत. या इमारतीमध्ये बरीच कुटुंबे वास्तव्यास आहेत. तर काहींचे व्यवसाय सुरू आहेत. काही इमारतींत शिकवणी वर्ग तर काही इमारती कार्यालयीन कामासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे.

पालिकेने पाठविल्या ४० नोटीस शहरातील ४० जीर्ण इमारत मालकांना स्थानिक प्रशासनाने नोटीस बजावलेली आहे. ही नोटीस प्राप्त होऊनसुद्धा एकानेही घर सोडलेले नाही. दुसरीकडे राहण्याची व्यवस्था नाही. उत्पन्नाचे फारसे साधन नाही, त्यामुळे जावे तरी कुठे, असा प्रश्न अनेकांकडून प्रशासनास विचारला जात आहे.

अनेकांसमोर निवासाचा प्रश्न शहरातील जीर्ण इमारतींमध्ये जवळपास १५० नागरिक वास्तव्य करीत आहेत. अनेकांना राहण्यासाठी दुसरे घर नाही, प्रशासन निवारा देण्यास असमर्थ आहे. काहींची घरकुलाची मागणी आहे. काहींमध्ये मोठ्या प्रमाणात आपापसांत वादविवाद आहेत. त्यामुळे इथून जावे तरी कोठे, असा प्रश्न अनेकांसमोर आहे. इमारतीतून जागा सोडल्यास निवासाचा प्रश्न उभा राहू शकतो. 

टॅग्स :bhandara-acभंडारा