शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतात काढणीला मजूर अन् बाजारात मालाला भाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

चुलबंध खोऱ्यातील पालांदूर परिसर भाजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज वेगवेगळ्या भाज्या भंडारासह परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठविल्या जातात. परंतु गत आठवडाभरापासून या शेतकऱ्यांना आता फटका बसू लागला आहे. सर्वत्र संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतात राबायला कोणी मजूर तयार नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवून पिकांची काढणी केली आणि बाजारात नेले तर त्याला दर नाही.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शेतात काढणीसाठी मजूर नाही आणि बाजारात माल विकायला जावे तर भाव नाही, अशा स्थितीत लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरातील शेतात भाजीपाला पीक उभे आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाय योजनांचा हा परिणाम असला तरी शेतकरी मात्र शासन प्रशासनाच्या लढाईला खंबीरपणे साथ देत आहेत.चुलबंध खोऱ्यातील पालांदूर परिसर भाजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज वेगवेगळ्या भाज्या भंडारासह परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठविल्या जातात. परंतु गत आठवडाभरापासून या शेतकऱ्यांना आता फटका बसू लागला आहे. सर्वत्र संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतात राबायला कोणी मजूर तयार नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवून पिकांची काढणी केली आणि बाजारात नेले तर त्याला दर नाही. बाजारात वाहन जाईपर्यंत विविध ठिकाणी अनंत अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोच. त्यामुळे आता शेतकºयांनी आपला भाजीपाला परिसरातील गावामध्येच विकण्याचा निर्धार केला आहे. मालाला भाव मिळत नसला तरी काढणीला आलेले पीक काढणे गरजेचे असते.सध्या ठोक बाजारात भाजीचे भाव अर्ध्यावर आलेले आहे. मिरची, भेंडी केवळ १५ रूपये किलोने विकावे लागत आहे. कारल्यासारखे पीक पडल्या भावाने जात आहे. परराज्यात जाणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. मुख्य बाजारपेठ बंद पडल्याने बाहेरगावचे नागरिकही पालांदूरात येत नाही. अपेक्षित विकला जात नाही. बाजार गावाच्या बाहेर भरविला जात असल्याने कोणी तिकडे फिरकतही नाही. टमाटर वांगे, फुलकोबी यातून तर हाती काही उतरतही नाही.उपाययोजनांची गरजभंडारा जिल्ह्यात उत्पादित होणारा भाजीपाला परप्रांतात विक्रीला जात होता. त्यामुळे शेतकºयांनी नियोजनबद्ध पद्धतीने भाजीपाल्याची लागवड केली. मात्र कोरोनाच्या संकटाने सगळे मार्ग शांत झाले आहे. असलेला भाजीपाला विकेल याची कोणतीही खात्री नाही. शासनाने पुढाकार घेवून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती