शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

शेतात काढणीला मजूर अन् बाजारात मालाला भाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

चुलबंध खोऱ्यातील पालांदूर परिसर भाजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज वेगवेगळ्या भाज्या भंडारासह परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठविल्या जातात. परंतु गत आठवडाभरापासून या शेतकऱ्यांना आता फटका बसू लागला आहे. सर्वत्र संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतात राबायला कोणी मजूर तयार नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवून पिकांची काढणी केली आणि बाजारात नेले तर त्याला दर नाही.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शेतात काढणीसाठी मजूर नाही आणि बाजारात माल विकायला जावे तर भाव नाही, अशा स्थितीत लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरातील शेतात भाजीपाला पीक उभे आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाय योजनांचा हा परिणाम असला तरी शेतकरी मात्र शासन प्रशासनाच्या लढाईला खंबीरपणे साथ देत आहेत.चुलबंध खोऱ्यातील पालांदूर परिसर भाजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज वेगवेगळ्या भाज्या भंडारासह परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठविल्या जातात. परंतु गत आठवडाभरापासून या शेतकऱ्यांना आता फटका बसू लागला आहे. सर्वत्र संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतात राबायला कोणी मजूर तयार नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवून पिकांची काढणी केली आणि बाजारात नेले तर त्याला दर नाही. बाजारात वाहन जाईपर्यंत विविध ठिकाणी अनंत अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोच. त्यामुळे आता शेतकºयांनी आपला भाजीपाला परिसरातील गावामध्येच विकण्याचा निर्धार केला आहे. मालाला भाव मिळत नसला तरी काढणीला आलेले पीक काढणे गरजेचे असते.सध्या ठोक बाजारात भाजीचे भाव अर्ध्यावर आलेले आहे. मिरची, भेंडी केवळ १५ रूपये किलोने विकावे लागत आहे. कारल्यासारखे पीक पडल्या भावाने जात आहे. परराज्यात जाणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. मुख्य बाजारपेठ बंद पडल्याने बाहेरगावचे नागरिकही पालांदूरात येत नाही. अपेक्षित विकला जात नाही. बाजार गावाच्या बाहेर भरविला जात असल्याने कोणी तिकडे फिरकतही नाही. टमाटर वांगे, फुलकोबी यातून तर हाती काही उतरतही नाही.उपाययोजनांची गरजभंडारा जिल्ह्यात उत्पादित होणारा भाजीपाला परप्रांतात विक्रीला जात होता. त्यामुळे शेतकºयांनी नियोजनबद्ध पद्धतीने भाजीपाल्याची लागवड केली. मात्र कोरोनाच्या संकटाने सगळे मार्ग शांत झाले आहे. असलेला भाजीपाला विकेल याची कोणतीही खात्री नाही. शासनाने पुढाकार घेवून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती