शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

शेतात काढणीला मजूर अन् बाजारात मालाला भाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

चुलबंध खोऱ्यातील पालांदूर परिसर भाजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज वेगवेगळ्या भाज्या भंडारासह परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठविल्या जातात. परंतु गत आठवडाभरापासून या शेतकऱ्यांना आता फटका बसू लागला आहे. सर्वत्र संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतात राबायला कोणी मजूर तयार नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवून पिकांची काढणी केली आणि बाजारात नेले तर त्याला दर नाही.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शेतात काढणीसाठी मजूर नाही आणि बाजारात माल विकायला जावे तर भाव नाही, अशा स्थितीत लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरातील शेतात भाजीपाला पीक उभे आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाय योजनांचा हा परिणाम असला तरी शेतकरी मात्र शासन प्रशासनाच्या लढाईला खंबीरपणे साथ देत आहेत.चुलबंध खोऱ्यातील पालांदूर परिसर भाजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज वेगवेगळ्या भाज्या भंडारासह परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठविल्या जातात. परंतु गत आठवडाभरापासून या शेतकऱ्यांना आता फटका बसू लागला आहे. सर्वत्र संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतात राबायला कोणी मजूर तयार नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवून पिकांची काढणी केली आणि बाजारात नेले तर त्याला दर नाही. बाजारात वाहन जाईपर्यंत विविध ठिकाणी अनंत अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोच. त्यामुळे आता शेतकºयांनी आपला भाजीपाला परिसरातील गावामध्येच विकण्याचा निर्धार केला आहे. मालाला भाव मिळत नसला तरी काढणीला आलेले पीक काढणे गरजेचे असते.सध्या ठोक बाजारात भाजीचे भाव अर्ध्यावर आलेले आहे. मिरची, भेंडी केवळ १५ रूपये किलोने विकावे लागत आहे. कारल्यासारखे पीक पडल्या भावाने जात आहे. परराज्यात जाणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. मुख्य बाजारपेठ बंद पडल्याने बाहेरगावचे नागरिकही पालांदूरात येत नाही. अपेक्षित विकला जात नाही. बाजार गावाच्या बाहेर भरविला जात असल्याने कोणी तिकडे फिरकतही नाही. टमाटर वांगे, फुलकोबी यातून तर हाती काही उतरतही नाही.उपाययोजनांची गरजभंडारा जिल्ह्यात उत्पादित होणारा भाजीपाला परप्रांतात विक्रीला जात होता. त्यामुळे शेतकºयांनी नियोजनबद्ध पद्धतीने भाजीपाल्याची लागवड केली. मात्र कोरोनाच्या संकटाने सगळे मार्ग शांत झाले आहे. असलेला भाजीपाला विकेल याची कोणतीही खात्री नाही. शासनाने पुढाकार घेवून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती