शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतात विद्युतपंप नाही, बिल मात्र हजारांचे

By admin | Updated: May 30, 2017 00:26 IST

साधारणत: एखादी वस्तु घेतली किंवा उपभोग जर घेतला तर त्या वस्तुची किंमत मोजून देणे म्हणजे जबरदस्ती होत नाही.

शेतात मोटारपंपासाठी खांब उभे : वीज बंद, बिल येणे सुरु, कातूर्ली येथील प्रकार, मृत शेतकऱ्याच्या नावेही बील विशाल रणदिवे। लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : साधारणत: एखादी वस्तु घेतली किंवा उपभोग जर घेतला तर त्या वस्तुची किंमत मोजून देणे म्हणजे जबरदस्ती होत नाही. परंतु वस्तु घेतली नाही किंवा उपभोगही घेतला नाही, फक्त त्या वस्तुची किंमत विचारले म्हणजे ती वस्तु घेतली असे होत नाही. अड्याळ वरुण अवघ्या चार किलोमीटर अंतरावर कातुर्ली येथील रामनाथ वाहणे या नावाने विद्युत बिल येत आहे. ज्या नावाने बिल येत आहे ती व्यक्ती मृत पावली आहे. एक वर्षाआधी खांब गाडले गेले. तारा जोडल्या गेल्या, मिटर पेटी लावण्यात आली. परंतु वीज बंद. म्हणजे सर्व काही होऊन सुध्दा त्या शेतात वीज पोहचलीच नाही. आणि शेतातल्या विहिरीवर मोटारपंपही नाही, तरी सुध्दा विजेचे बील ३५ हजार १६० रुपयाचे हा कारभार कोणता असणार?एका महितीनुसार शेतमालकाला पंचायत समितीमधून मोटार पंप मिळणार होते. परंतु दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला पण मोटार पंप मिळाले नाही. त्याचप्रमाणे विशेष घटक योजनेंतर्गत गावातील तीन ते चार लाभार्थी होते की ज्यांना विहिर व मोटारपंप मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी रामनाथ वाहणे यांच्या शेतात विहिर तर बनली परंतु मोटारपंप गेली दोन वर्षापासून अजूनपर्यंत पोहचला नाही. हिच माहिती गाव आणि परिसरात पाण्यासारखी पसरली त्यामुळे असे प्रकरण पुन्हा उघडकीस येऊ शकतात. शेतकऱ्यांचे भले व्हावे म्हणून सरकार या नाही त्या योजना काढतो. परंतु येथील अधिकारीच शेतकऱ्यांची अशी गत करत असतील तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचे कुणाकडे?दोन वर्षापासुन पंप आले नाही वीज जोडली गेली नाही तरीसुध्दा बिल येणे सुरु आहे. याविषयी संबंधित विभागाला तोंडी बोलून सांगून झाले. परंतु बड्या अधिकाऱ्यांसमोर हा शेतकरी मात्र बोलुबोलुन थकुन गेला आहे. यावर्षी तरी मला मोझ्या हक्काचा मोटार पंप व वीज मिळेल अशी त्या शेतकऱ्यांची मागणी आहे.परिसरातील लोकप्रतिनिधी याविषयीची चौकशी करणे गरजेचे आहे परंतु लोकप्रतिनिधीनाही सांगुन फायदा झाला नाही. येथील जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती सदस्यांनी याविषयी लक्ष घालायला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच विद्युत विभागाने सुध्दा असे प्रकरण पुन्हा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.