शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तर जिल्हा कचेरीत धान फेकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:24 IST

साकोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे. प्रत्येक केंद्रावर धान उघड्यावर आहे. शासनाने खरेदी केलेला धान न उललल्याने गोदाम हाऊसफुल्ल झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावरील धान खरेदी बंद आहे. त्यामुळे शेकडो क्विंटल धान आधारभूत केंद्राबाहेर उघड्यावर आहे.

ठळक मुद्देपरिणय फुकेंचा इशारा : शेकडो क्विंटल धान उघड्यावर, अनेक केंद्रांवर खरेदी ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शासनाच्या दुर्लक्षित धारणाने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान विक्रीच्या प्रतीक्षेत आधारभूत केंद्राबाहेर उघड्यावर आहेत. पावसात ओले होवून या धानाला कोंब फुटले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. येत्या सात दिवसात जिल्ह्यातील संपूर्ण धान खरेदी केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात धान फेकू असा इशारा आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिला आहे.साकोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे. प्रत्येक केंद्रावर धान उघड्यावर आहे. शासनाने खरेदी केलेला धान न उललल्याने गोदाम हाऊसफुल्ल झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावरील धान खरेदी बंद आहे. त्यामुळे शेकडो क्विंटल धान आधारभूत केंद्राबाहेर उघड्यावर आहे. अवकाळी पावसात तब्बल चार ते पाचदा हा धान भिजला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यास महाविकास आघाडी असर्थ ठरल्याचे दिसत असल्याचा आरोप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.आता हा धान येत्या सात दिवसात खरेदी केला नाही तर संपूर्ण शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देवून धान फेकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नैसर्गीक आपत्तीचा सामना करीत शेतकऱ्यांनी धान पिकविला. परंतु शासनाच्या धोरणामुळे शेतकºयांना मोठा फटका बसत आहे. खरेदी केलेल्या धानाचे चुकारे मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.व्यापाऱ्यांशी साटेलोटेजिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागते. उलट व्यापाऱ्यांचा धान तातडीने खरेदी करण्यात येतो. हाच प्रकार शेतकरी उघड्या डोळ्याने पाहत आहे. परंतु यावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. याप्रकरणी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे.वाढीव दर व बोनस मिळाला नाहीशेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर धान विकला. जिल्ह्यात सात लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. आधारभूत किंमतीप्रमाणे १८१५ रूपये प्रती क्विंटल शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु शासनाने जाहीर केलेले वाढीव दर आणि बोनसचा अद्यापही पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असे शेतकरी सांगत आहे.साकोलीचे धान खरेदी केंद्र बंदधान उत्पादनात अग्रेसर असलेल्या साकोलीसह तालुक्यातील अनेक धान केंद्र बंद आहे. शेतकरी आपला धान येथे विक्रीसाठी आणत आहे. परंतु धानाची खरेदी होत नाही. त्यामुळे उघड्यावरच धान ठेवावा लागत आहे. दुसरीकडे अवकाळी पावसाने धानाला कोंब फुटले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान शासनाने भरून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. साकोलीत नव्हे तर जिल्ह्यातील अनेक केंद्र बंद आहेत. परंतु याबाबत शासकीय स्तरावरून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महिनाभरापासून मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुके