शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

जलवाहिनी नवीन, पाणी मात्र दूषित; पवनीवासीयांमध्ये रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 17:43 IST

Bhandara : नवीन पाणीपुरवठा योजना कोणत्या कामाची नागरिकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी: पवनीवासीयांना शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. मात्र पवनीकरांना नळाद्वारे दूषित पाणी येत असल्याने नागरिकांत प्रचंड रोष व्यक्त होत आहे. शुद्ध व मुबलक पाणी पुरवठ्यासाठी निर्माण केलेली नवीन पाणीपुरवठा योजना कोणत्या कामाची? असा प्रश्न पडला आहे.

महाराष्ट्र नागरोत्थान स्वर्ण जयंती योजना अंतर्गत २८ कोटी रुपये खर्च करून गोसेखुर्द धरणावरून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मागील चार वर्षापासून सुरू असलेले बांधकाम आता पूर्णत्वास आले असून शहरवासीयांची पाणी मिळण्याची प्रतीक्षा संपली. शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेतून जनतेला प्रायोगिक तत्वावर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जवळपास याला दीड महिन्यांचा कालावधी होत आहे. डेंग्यू, मलेरिया, हगवण, विषमज्वर यासारखे अनेक रोगांचे थैमान नाकारता येत नाही. 

जुनीच जलवाहीनी चांगली!शहरात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठा संबंधाने मुख्याधिकारी यांचेशी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. प्रायोगिक तत्वावर सुरू असलेला पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत अनावश्यक कामासाठी नवीन तर पिण्याचे पाणी जुन्या फिल्टर प्लॅटमधून सोडण्यात यावे अशी मागणी संघटक यादवराव भोगे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेली आहे. 

ऑपरेटर कार्यालयातनगरपरिषदेमध्ये पाणीपुरवठा पंपावर ऑपरेटरची पूर्णकालीन नियुक्ती आहे मात्र सदर व्यक्तीचे पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष असल्याने कर्तव्याकडे लक्ष नाही. हे महाशय कार्यालयातच जास्त तर पंपाकडे कमी जात असल्याने कंत्राटी पद्धतीवर नियुक्त कर्मचाऱ्यांकडून कसेबसे काम काढल्या जाते. सदर कंत्राटींना कसलाही तांत्रिक अनुभव नसल्याने कर्तव्य बजावताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याकडे नगरपरिषदेने विशेष लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. 

धरण परीसरातील पंपगृहालगत दिसला वाघगोसेखुर्द धरणावर असलेल्या पंपगृह जवळ पट्टेदार वाघ दिसल्याने येथे कार्यरत कर्मचारी व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जिवाच्या भीतीने कर्मचारी पळाले. याठिकाणी पंपगृह समोरील पुलावर प्रवेशद्वाराची आवश्यकता असून कर्मचाऱ्यांना निवासस्थानाची सोय करणे गरजेचे आहे. 

२८ कोटी रुपयांचा खर्च पाणीपुरवठा योजनेवर झाला आहेपवनी शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यादृष्टीने वाढीव पाणीपुरवठा तयार करण्यात आली. मात्र प्रायोगिक त्तत्वावरच पाणीपुरवठा दूषित होत आहे.

"मार्चअखेर निर्माण झालेली परिस्थितीवर मात करून शहरातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल. यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना १०० टक्के पूर्ण होईपर्यंत जुन्याच जलवाहिनी मधून पाणीपुरवठा करण्यात येईल."- डॉ. विवेक मेश्राम, मुख्याधिकारी.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणbhandara-acभंडारा