शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हे वैभवी पाऊल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 11:52 IST

Bhandara : जिल्ह्यातील सारस्वतांनी केले निर्णयाचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय म्हणजे वैभवी पाऊल आहे. अनेक वर्षांचा सुरू असलेला यासाठीचा संघर्ष अखेर गोड निर्णयात बदलला, याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया भंडारा जिल्ह्यातील सारस्वतांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्याचे कळताच जिल्ह्यातील साहित्य वर्तुळात आनंदाची लहर पसरली.

हा तर योगायोगच ! चार दिवसांपूर्वीच भाषा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीचे डॉ. हरिश्चंद्र बोरकर हे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी या बैठकीत हाच विषय मांडला होता. योगायोग म्हणजे, त्याबद्दल निर्णयही केंद्र सरकारने घटस्थापनेच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधून घेतला.

ज्येष्ठ कवि आणि कथाकार प्रमोदकुमार अणेराव म्हणाले, हा निर्णय मराठी बोलणाऱ्या, मराठी साहित्य वाचणाऱ्या आणि मराठी साहित्य सेवा करणाऱ्या व्यक्तीसाठी अतिशय आनंदाची आणि सकारात्मक आहे. गेल्या तीन दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे आणि समितीने अतिशय परिश्रमपूर्वक मराठी भाषेचे अभिजातत्व सिद्ध केले आणि त्याचे ऐतिहासिक प्राचीन मूळ शोधून काढले. त्यासाठी त्यांनी जवळजवळ २५०० वर्षांपूर्वीची मराठी भाषा परंपरा पुढे आणली. मध्यंतरी राजकीय इच्छा शक्तीचा अभाव आणि अनेक व्यवधानांमुळे अभिजात भाषेचा मागणी मागे आणि आणि प्रलंबित पडली होती. आज पाली, बंगाली, आसामी व प्राकृत या भाषांबरोबर मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मी घटना निश्चित मराठी भाषिकांना सुखवणारी आणि अभिमानाची आहे 

ज्येष्ठ साहित्यिक आणि झाडीबोलीचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर म्हणाले, यामुळे मराठी भाषेचे वैभव पुन्हा वाढेल, यात संशय नाही. अग्रगण्य भाषा म्हणून ती उदयास येईल. देशातील घटनामान्य भाषेत मराठी पहिल्या क्रमावर आहे. मराठीतील वाझय प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. आद्यकवी मुकुंदराजांच्या विवेकसिंधु या ग्रंथाची नाळ विदर्भाच्या मातीशी जुळली आहे. महाराष्ट्रात मराठीचे सर्वांत मोठे क्षेत्र विदर्भ आणि वन्हाडात आहे. मराठीतील गद्य प्राचीन असून, त्याचा सन्मान या निमित्ताने झाला, याचा आनंद आहे. 

प्रा. सुमंत देशपांडे म्हणाले, अनेक वर्षांची ही मागणी होती. या निर्णयामुळे मराठीचे प्राचीनत्व सिद्ध झाले आहे. मराठी ही मूळ भाषा 10041 होती, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे भाषिक संशोधनाला नवा आयाम मिळेल. प्राचीन ग्रंथांची ओळख होऊन मराठीतील वाङ्ग्य प्रकाराला उजाळा मिळेल. 

ज्येष्ठ साहित्यिक तथा . एम. पटेल जे महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक ममता राऊत म्हणाल्या, अडीच हजार वर्षांचा इतिहास मराठी भाषेला आहे. अभिजात दर्जा मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. उशिरा का होईना, न्याय मिळाला, याचा आनंद आहे. मराठी मागे पडत होती. गौणत्व येत होते. मात्र, या दर्जामुळे पुन्हा सन्मानाचे दिवस येतील. मराठीचा अभिजात दर्जा जपून, सन्मान वाढविण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा