शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांचे होतेय हनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

जिल्हा परिषद सदस्यांना निवडून आले तरी कोणतेही अधिकार नाही. जिल्हा परिषदेत अधिकारी त्यांचे ऐकत नाही. कार्यकर्ते भंडावून सोडत आहेत. आता तर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापना हा सार्वजनिक मनोरंजनाचा विषय झाला आहे. सदस्यही आता चांगलेच वैतागले आहे. तर, दुसरीकडे अधिकारी मात्र ३१ मार्चपूर्वी हात धुवून घेण्याच्या तयारीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा विषय आता जिल्ह्यात मनोरंजनाचा झाला असून आपल्या कार्यकर्त्यांना उत्तर देताना सदस्यही वैतागले आहे. दोन महिने झाले तरी सत्ता स्थापन होत नसल्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांचे हनन होत आहे. ग्रामविकास मंत्रालयाने अद्यापही चुप्पी साधल्याने काही जिल्हा परिषद सदस्य आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.भंडारा जिल्हा परिषदेची दोन टप्प्यात निवडणूक झाली. १९ जानेवारी रोजी एकत्र मतमोजणी झाली. काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसपा एक आणि अपक्ष चार असे सदस्य निवडून आले. लवकरच सत्ता स्थापन होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेची जुळवाजुळव सुरू झाली होती. परंतु आता तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील सत्ता स्थापनेची अधिसूचना जारी झाली नाही. ग्रामविकास मंत्रालयाने याबाबत चुप्पी साधल्याने सदस्य वैतागले आहे.जिल्हा परिषद सदस्यांना निवडून आले तरी कोणतेही अधिकार नाही. जिल्हा परिषदेत अधिकारी त्यांचे ऐकत नाही. कार्यकर्ते भंडावून सोडत आहेत. आता तर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापना हा सार्वजनिक मनोरंजनाचा विषय झाला आहे. सदस्यही आता चांगलेच वैतागले आहे. तर, दुसरीकडे अधिकारी मात्र ३१ मार्चपूर्वी हात धुवून घेण्याच्या तयारीत आहे.

सदस्यांना त्यांचे अधिकार बहाल करावे- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापतीच्या निवडीला वेळ लागत आहे. शासन स्तरावर तत्काळ तिढा सोडविण्याची मागणी आहे. सदस्यांना घटनेने अधिकार दिले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांना तर राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो. परंतु आता सत्ता स्थापन झाली नाही त्यामुळे त्यांच्या अधिकाराचे हनन होत आहे. सदस्यांना तातडीने अधिकार बहाल करावे, अशी मागणी आहे

निवडणूक निकाल लागला. ओबीसींच्या प्रश्नावर न्यायालयाने निर्णयही दिला. मात्र सत्ता स्थापनेला विलंब होत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. फाईल ग्रामविकास मंत्र्यांकडे प्रलंबित असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेला विलंब होत असल्याने ग्रामविकासाला खीळ बसत आहे.-मोहन पंचभाई, जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष

जिल्ह्यात विविध समस्या आहे. ग्रामीण भागाचा विकास खोळंबला आहे. अडीच वर्षांपासून प्रशासक असल्याने अधिकारी राज सुरू आहे. आमदार आणि प्रशासक मिळून निधी लाटत आहे. त्यासाठीच सत्ता स्थापनेला विलंब केला जात आहे. लवकर सत्ता स्थापन झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. -विनोद बांते, गटनेता भाजप

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद