शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांचे होतेय हनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

जिल्हा परिषद सदस्यांना निवडून आले तरी कोणतेही अधिकार नाही. जिल्हा परिषदेत अधिकारी त्यांचे ऐकत नाही. कार्यकर्ते भंडावून सोडत आहेत. आता तर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापना हा सार्वजनिक मनोरंजनाचा विषय झाला आहे. सदस्यही आता चांगलेच वैतागले आहे. तर, दुसरीकडे अधिकारी मात्र ३१ मार्चपूर्वी हात धुवून घेण्याच्या तयारीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा विषय आता जिल्ह्यात मनोरंजनाचा झाला असून आपल्या कार्यकर्त्यांना उत्तर देताना सदस्यही वैतागले आहे. दोन महिने झाले तरी सत्ता स्थापन होत नसल्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांचे हनन होत आहे. ग्रामविकास मंत्रालयाने अद्यापही चुप्पी साधल्याने काही जिल्हा परिषद सदस्य आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.भंडारा जिल्हा परिषदेची दोन टप्प्यात निवडणूक झाली. १९ जानेवारी रोजी एकत्र मतमोजणी झाली. काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसपा एक आणि अपक्ष चार असे सदस्य निवडून आले. लवकरच सत्ता स्थापन होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेची जुळवाजुळव सुरू झाली होती. परंतु आता तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील सत्ता स्थापनेची अधिसूचना जारी झाली नाही. ग्रामविकास मंत्रालयाने याबाबत चुप्पी साधल्याने सदस्य वैतागले आहे.जिल्हा परिषद सदस्यांना निवडून आले तरी कोणतेही अधिकार नाही. जिल्हा परिषदेत अधिकारी त्यांचे ऐकत नाही. कार्यकर्ते भंडावून सोडत आहेत. आता तर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापना हा सार्वजनिक मनोरंजनाचा विषय झाला आहे. सदस्यही आता चांगलेच वैतागले आहे. तर, दुसरीकडे अधिकारी मात्र ३१ मार्चपूर्वी हात धुवून घेण्याच्या तयारीत आहे.

सदस्यांना त्यांचे अधिकार बहाल करावे- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापतीच्या निवडीला वेळ लागत आहे. शासन स्तरावर तत्काळ तिढा सोडविण्याची मागणी आहे. सदस्यांना घटनेने अधिकार दिले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांना तर राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो. परंतु आता सत्ता स्थापन झाली नाही त्यामुळे त्यांच्या अधिकाराचे हनन होत आहे. सदस्यांना तातडीने अधिकार बहाल करावे, अशी मागणी आहे

निवडणूक निकाल लागला. ओबीसींच्या प्रश्नावर न्यायालयाने निर्णयही दिला. मात्र सत्ता स्थापनेला विलंब होत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. फाईल ग्रामविकास मंत्र्यांकडे प्रलंबित असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेला विलंब होत असल्याने ग्रामविकासाला खीळ बसत आहे.-मोहन पंचभाई, जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष

जिल्ह्यात विविध समस्या आहे. ग्रामीण भागाचा विकास खोळंबला आहे. अडीच वर्षांपासून प्रशासक असल्याने अधिकारी राज सुरू आहे. आमदार आणि प्रशासक मिळून निधी लाटत आहे. त्यासाठीच सत्ता स्थापनेला विलंब केला जात आहे. लवकर सत्ता स्थापन झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. -विनोद बांते, गटनेता भाजप

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद