शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांचे होतेय हनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

जिल्हा परिषद सदस्यांना निवडून आले तरी कोणतेही अधिकार नाही. जिल्हा परिषदेत अधिकारी त्यांचे ऐकत नाही. कार्यकर्ते भंडावून सोडत आहेत. आता तर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापना हा सार्वजनिक मनोरंजनाचा विषय झाला आहे. सदस्यही आता चांगलेच वैतागले आहे. तर, दुसरीकडे अधिकारी मात्र ३१ मार्चपूर्वी हात धुवून घेण्याच्या तयारीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा विषय आता जिल्ह्यात मनोरंजनाचा झाला असून आपल्या कार्यकर्त्यांना उत्तर देताना सदस्यही वैतागले आहे. दोन महिने झाले तरी सत्ता स्थापन होत नसल्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांचे हनन होत आहे. ग्रामविकास मंत्रालयाने अद्यापही चुप्पी साधल्याने काही जिल्हा परिषद सदस्य आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.भंडारा जिल्हा परिषदेची दोन टप्प्यात निवडणूक झाली. १९ जानेवारी रोजी एकत्र मतमोजणी झाली. काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसपा एक आणि अपक्ष चार असे सदस्य निवडून आले. लवकरच सत्ता स्थापन होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेची जुळवाजुळव सुरू झाली होती. परंतु आता तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील सत्ता स्थापनेची अधिसूचना जारी झाली नाही. ग्रामविकास मंत्रालयाने याबाबत चुप्पी साधल्याने सदस्य वैतागले आहे.जिल्हा परिषद सदस्यांना निवडून आले तरी कोणतेही अधिकार नाही. जिल्हा परिषदेत अधिकारी त्यांचे ऐकत नाही. कार्यकर्ते भंडावून सोडत आहेत. आता तर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापना हा सार्वजनिक मनोरंजनाचा विषय झाला आहे. सदस्यही आता चांगलेच वैतागले आहे. तर, दुसरीकडे अधिकारी मात्र ३१ मार्चपूर्वी हात धुवून घेण्याच्या तयारीत आहे.

सदस्यांना त्यांचे अधिकार बहाल करावे- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापतीच्या निवडीला वेळ लागत आहे. शासन स्तरावर तत्काळ तिढा सोडविण्याची मागणी आहे. सदस्यांना घटनेने अधिकार दिले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांना तर राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो. परंतु आता सत्ता स्थापन झाली नाही त्यामुळे त्यांच्या अधिकाराचे हनन होत आहे. सदस्यांना तातडीने अधिकार बहाल करावे, अशी मागणी आहे

निवडणूक निकाल लागला. ओबीसींच्या प्रश्नावर न्यायालयाने निर्णयही दिला. मात्र सत्ता स्थापनेला विलंब होत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. फाईल ग्रामविकास मंत्र्यांकडे प्रलंबित असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेला विलंब होत असल्याने ग्रामविकासाला खीळ बसत आहे.-मोहन पंचभाई, जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष

जिल्ह्यात विविध समस्या आहे. ग्रामीण भागाचा विकास खोळंबला आहे. अडीच वर्षांपासून प्रशासक असल्याने अधिकारी राज सुरू आहे. आमदार आणि प्रशासक मिळून निधी लाटत आहे. त्यासाठीच सत्ता स्थापनेला विलंब केला जात आहे. लवकर सत्ता स्थापन झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. -विनोद बांते, गटनेता भाजप

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद