शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

सत्ता संघर्ष संपला, आता विकासासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 5:00 AM

तीन महिन्यांच्या  दीर्घ प्रतीक्षेनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणीचा मुहूर्त निघाला. १० मे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची तर १९ मे रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली. आता सत्ता स्थापन झाली. पदाधिकारी विराजमान झाले. जिल्हा परिषदेत वर्दळ वाढली. पदाधिकाऱ्यांनी  कामाला सुरुवातही केली आहे. काही नवखे आणि काही अनुभवी अशा पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आता जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जाणार आहे. सर्वसामान्य ग्रामीण जनतेला या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची मोठी अपेक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल दोन वर्षांचे प्रशासकराज आणि निवडणुकीनंतर तीन महिने चाललेला सत्तासंघर्ष एकदाचा संपला. जिल्हा परिषदेत अध्यक्षांसह पदाधिकारी विराजमान झाले. आपसातील मतभेद विसरून ग्रामीण विकासासाठी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. ग्रामीण जनतेची ही अपेक्षा आता पदाधिकारी कसे पूर्ण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भंडारा जिल्हा परिषदेची मुदत १५ जुलै २०२० रोजी संपली. मात्र कोरोना संसर्गामुळे निवडणुका घेणे शक्य नव्हते. जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. तब्बल दोन वर्षे जिल्हा परिषदेत प्रशासकराज होते. अधिकाऱ्यांच्या मनमर्जीने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचा कारभार सुरू होता. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास रखडल्याची सर्वत्र ओरड होती. अधिकारी आमचे ऐकत नाहीत, असे अनेक जण सांगत होते. प्रशासकराज कधी समाप्त होणार, याची उत्सुकता लागली होती.अखेर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाली. मात्र ओबीसी आरक्षणाने ही निवडणूक दोन टप्प्यात घ्यावी लागली. २१ डिसेंबर आणि १८ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान झाले. १९ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली. परंतु पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. पदाधिकाऱ्यांची निवड लांबली. निवडून आलेल्या सदस्यांसह राजकीय नेतेही अस्वस्थ झाले होते. तीन महिन्यांच्या  दीर्घ प्रतीक्षेनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणीचा मुहूर्त निघाला. १० मे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची तर १९ मे रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली.आता सत्ता स्थापन झाली. पदाधिकारी विराजमान झाले. जिल्हा परिषदेत वर्दळ वाढली. पदाधिकाऱ्यांनी  कामाला सुरुवातही केली आहे. काही नवखे आणि काही अनुभवी अशा पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आता जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जाणार आहे. सर्वसामान्य ग्रामीण जनतेला या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची मोठी अपेक्षा आहे.

निधीच्या संतुलित विनियोगाचे मोठे दिव्य

- ग्रामीण विकासासाठी शासनाकडून आलेला निधी योग्य प्रमाणात आणि संतुलित पद्धतीने विकास कामांवर खर्च करण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे.- दोन वर्षे प्रशासकराज काळात जिल्हा परिषदेच्या निधीचा झालेला अपव्यय शोधून संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस पदाधिकाऱ्यांना दाखवावे लागणार आहे.- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणाची काय अवस्था आहे, हे त्यांना पुरते ठाऊक आहे. स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा स्मार्ट कशा होतील, याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

जिल्हा परिषदेचा आखाडा होवू नये- सत्ता स्थापनेच्या नाट्यात सभागृहात हाणामारी झाली. प्रकरण पोलिसापर्यंत गेले. आगामी काळातही याचे पडसाद निश्यितच जिल्हा परिषदेत उमटणार आहेत.  राष्ट्रवादीचा सत्तेचा तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सदस्य कायम आक्रमक राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने मूळ भाजपचे सात सदस्यही सत्ताधारी पक्षाला कायम घेरण्याच्या प्रयत्नात राहणार आहेत. परिणामी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक बैठका वादळी ठरणार आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेचा राजकीय आखाडा होवून नये, अशी अपेक्षा आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद