शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

सत्ता संघर्ष संपला, आता विकासासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

तीन महिन्यांच्या  दीर्घ प्रतीक्षेनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणीचा मुहूर्त निघाला. १० मे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची तर १९ मे रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली. आता सत्ता स्थापन झाली. पदाधिकारी विराजमान झाले. जिल्हा परिषदेत वर्दळ वाढली. पदाधिकाऱ्यांनी  कामाला सुरुवातही केली आहे. काही नवखे आणि काही अनुभवी अशा पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आता जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जाणार आहे. सर्वसामान्य ग्रामीण जनतेला या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची मोठी अपेक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल दोन वर्षांचे प्रशासकराज आणि निवडणुकीनंतर तीन महिने चाललेला सत्तासंघर्ष एकदाचा संपला. जिल्हा परिषदेत अध्यक्षांसह पदाधिकारी विराजमान झाले. आपसातील मतभेद विसरून ग्रामीण विकासासाठी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. ग्रामीण जनतेची ही अपेक्षा आता पदाधिकारी कसे पूर्ण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भंडारा जिल्हा परिषदेची मुदत १५ जुलै २०२० रोजी संपली. मात्र कोरोना संसर्गामुळे निवडणुका घेणे शक्य नव्हते. जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. तब्बल दोन वर्षे जिल्हा परिषदेत प्रशासकराज होते. अधिकाऱ्यांच्या मनमर्जीने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचा कारभार सुरू होता. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास रखडल्याची सर्वत्र ओरड होती. अधिकारी आमचे ऐकत नाहीत, असे अनेक जण सांगत होते. प्रशासकराज कधी समाप्त होणार, याची उत्सुकता लागली होती.अखेर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाली. मात्र ओबीसी आरक्षणाने ही निवडणूक दोन टप्प्यात घ्यावी लागली. २१ डिसेंबर आणि १८ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान झाले. १९ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली. परंतु पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. पदाधिकाऱ्यांची निवड लांबली. निवडून आलेल्या सदस्यांसह राजकीय नेतेही अस्वस्थ झाले होते. तीन महिन्यांच्या  दीर्घ प्रतीक्षेनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणीचा मुहूर्त निघाला. १० मे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची तर १९ मे रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली.आता सत्ता स्थापन झाली. पदाधिकारी विराजमान झाले. जिल्हा परिषदेत वर्दळ वाढली. पदाधिकाऱ्यांनी  कामाला सुरुवातही केली आहे. काही नवखे आणि काही अनुभवी अशा पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आता जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जाणार आहे. सर्वसामान्य ग्रामीण जनतेला या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची मोठी अपेक्षा आहे.

निधीच्या संतुलित विनियोगाचे मोठे दिव्य

- ग्रामीण विकासासाठी शासनाकडून आलेला निधी योग्य प्रमाणात आणि संतुलित पद्धतीने विकास कामांवर खर्च करण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे.- दोन वर्षे प्रशासकराज काळात जिल्हा परिषदेच्या निधीचा झालेला अपव्यय शोधून संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस पदाधिकाऱ्यांना दाखवावे लागणार आहे.- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणाची काय अवस्था आहे, हे त्यांना पुरते ठाऊक आहे. स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा स्मार्ट कशा होतील, याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

जिल्हा परिषदेचा आखाडा होवू नये- सत्ता स्थापनेच्या नाट्यात सभागृहात हाणामारी झाली. प्रकरण पोलिसापर्यंत गेले. आगामी काळातही याचे पडसाद निश्यितच जिल्हा परिषदेत उमटणार आहेत.  राष्ट्रवादीचा सत्तेचा तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सदस्य कायम आक्रमक राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने मूळ भाजपचे सात सदस्यही सत्ताधारी पक्षाला कायम घेरण्याच्या प्रयत्नात राहणार आहेत. परिणामी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक बैठका वादळी ठरणार आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेचा राजकीय आखाडा होवून नये, अशी अपेक्षा आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद