शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

सावकाराने बळकावलेली जमीन मिळेल परत; शेतकऱ्यांनो, तक्रार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 13:25 IST

Bhandara : वार्षिक ३६ टक्के व्याज आकारणी तक्रारीवर उपनिबंधक करणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क : भंडारा : जिल्ह्यात सातत्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बेजार आहे. पिकांचे नुकसान, नापिकी आणि बँकेचे कर्ज, मुलांचे विवाह, मुलांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च अशा संकटांतील शेतकरी सावकाराचा दरवाजा ठोठावतो; पण समोरच्याची गरज पाहून सावकार तीन ते पाच टक्क्यांनी पैसे देतो. सहा महिने किंवा एक वर्षाला चक्रवाढ व्याज आकारतो. याप्रसंगी तारण ठेवलेली जमीनही बळकावतो.

सावकाराने बळकावलेली जमीन शेतकऱ्यांना परत प्राप्त करता येते. यासाठी त्यांना जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करावी लागते. सावकाराचे कर्ज शेतातील पिकातून कमी होईल आणि आपली जमीन पुन्हा परत मिळेल, या आशेने शेतकरी रक्ताचे पाणी करून पिकाला जपतो. आता अवैधरीत्या अधिक दराने कर्ज देणाऱ्या बचत गटांवरही कारवाई केली जाणार आहे.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार अर्ज करावा लागतो. गोपनीय पद्धतीने अर्ज करायचा असतो. अर्ज केल्याच्या तारखेपासून १५ वर्षे मागे संबंधित जमिनीची रजिस्ट्री झाली असल्यास महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत शेतकऱ्याला न्याय मिळतो.

जिल्ह्यात नोंदणी केलेले २७६ सावकारजिल्हा उपनिबंधक कार्यालयात नोंदणी केलेले २७६ सावकार जिल्ह्यात आहेत. हे सावकार गरजूंना कर्ज उपलब्ध करून देतात. यामुळे त्यांना मदत मिळते; परंतु दिलेले कर्ज वसूल करताना अनेकजण तगादा लावतात, बळजबरी करतात.

मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज घेता येत नाहीसावकारीचा परवाना मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला दुसऱ्या क्षेत्रात सावकारी करता येत नाही. तसेच कर्जदाराकडून सरळ व्याज पद्धतीने व्याज आकारायचे असून, चक्रवाढ पद्धत लागू नाही. मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज सावकाराला घेता येत नाही. एखादी व्यक्ती विनापरवाना सावकारी करीत असल्यास जिल्हा निबंधक किवा सहायक निबंधक कधीही वॉरंटशिवाय प्रवेश करून चौकशी करू शकतात.

सावकार किती व्याज घेऊ शकतात?■ सहकार विभागाने १६ सप्टेंबर २०१४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सावकारी कर्जावरील व्याजदर निश्चित केलेला आहे.■ सावकाराने शेतकऱ्याला दिलेल्या तारण कर्जाला प्रतिवर्ष ९ टक्के आणि विनातारण कर्जाला प्रतिवर्ष १२ टक्के व्याजदर ठरलेला आहे.■ शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कर्ज देताना तारण कर्जाला प्रतिवर्ष १५ टक्के आणि विनातारण कर्जाला १८ टक्के व्याजदर आकारण्याची अट कायद्यात आहे.

...तर बचत गटांवर होणार कारवाईजिल्ह्यात सावकारांनी ठरवून दिलेल्या व्याजारपेक्षा अधिक व्याज शेतकऱ्यांकडून घेतल्यास करवाई केली जाते. जिल्ह्यात काही बचत गटांकडून अवैध सावकारी होत आहे

टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेतीbhandara-acभंडारा