शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सावकाराने बळकावलेली जमीन मिळेल परत; शेतकऱ्यांनो, तक्रार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 13:25 IST

Bhandara : वार्षिक ३६ टक्के व्याज आकारणी तक्रारीवर उपनिबंधक करणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क : भंडारा : जिल्ह्यात सातत्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बेजार आहे. पिकांचे नुकसान, नापिकी आणि बँकेचे कर्ज, मुलांचे विवाह, मुलांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च अशा संकटांतील शेतकरी सावकाराचा दरवाजा ठोठावतो; पण समोरच्याची गरज पाहून सावकार तीन ते पाच टक्क्यांनी पैसे देतो. सहा महिने किंवा एक वर्षाला चक्रवाढ व्याज आकारतो. याप्रसंगी तारण ठेवलेली जमीनही बळकावतो.

सावकाराने बळकावलेली जमीन शेतकऱ्यांना परत प्राप्त करता येते. यासाठी त्यांना जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करावी लागते. सावकाराचे कर्ज शेतातील पिकातून कमी होईल आणि आपली जमीन पुन्हा परत मिळेल, या आशेने शेतकरी रक्ताचे पाणी करून पिकाला जपतो. आता अवैधरीत्या अधिक दराने कर्ज देणाऱ्या बचत गटांवरही कारवाई केली जाणार आहे.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार अर्ज करावा लागतो. गोपनीय पद्धतीने अर्ज करायचा असतो. अर्ज केल्याच्या तारखेपासून १५ वर्षे मागे संबंधित जमिनीची रजिस्ट्री झाली असल्यास महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत शेतकऱ्याला न्याय मिळतो.

जिल्ह्यात नोंदणी केलेले २७६ सावकारजिल्हा उपनिबंधक कार्यालयात नोंदणी केलेले २७६ सावकार जिल्ह्यात आहेत. हे सावकार गरजूंना कर्ज उपलब्ध करून देतात. यामुळे त्यांना मदत मिळते; परंतु दिलेले कर्ज वसूल करताना अनेकजण तगादा लावतात, बळजबरी करतात.

मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज घेता येत नाहीसावकारीचा परवाना मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला दुसऱ्या क्षेत्रात सावकारी करता येत नाही. तसेच कर्जदाराकडून सरळ व्याज पद्धतीने व्याज आकारायचे असून, चक्रवाढ पद्धत लागू नाही. मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज सावकाराला घेता येत नाही. एखादी व्यक्ती विनापरवाना सावकारी करीत असल्यास जिल्हा निबंधक किवा सहायक निबंधक कधीही वॉरंटशिवाय प्रवेश करून चौकशी करू शकतात.

सावकार किती व्याज घेऊ शकतात?■ सहकार विभागाने १६ सप्टेंबर २०१४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सावकारी कर्जावरील व्याजदर निश्चित केलेला आहे.■ सावकाराने शेतकऱ्याला दिलेल्या तारण कर्जाला प्रतिवर्ष ९ टक्के आणि विनातारण कर्जाला प्रतिवर्ष १२ टक्के व्याजदर ठरलेला आहे.■ शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कर्ज देताना तारण कर्जाला प्रतिवर्ष १५ टक्के आणि विनातारण कर्जाला १८ टक्के व्याजदर आकारण्याची अट कायद्यात आहे.

...तर बचत गटांवर होणार कारवाईजिल्ह्यात सावकारांनी ठरवून दिलेल्या व्याजारपेक्षा अधिक व्याज शेतकऱ्यांकडून घेतल्यास करवाई केली जाते. जिल्ह्यात काही बचत गटांकडून अवैध सावकारी होत आहे

टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेतीbhandara-acभंडारा