शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

गूळ निर्मितीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीपात्राच्या खोऱ्यात दोन्ही राज्यातील शेतकरी मागील २०० वर्षांपासून ऊस लागवड करीत आहेत. ऊस विक्री करणे व मोबदला बराच वेळ लागत असल्याने त्यातून मार्ग काढण्याकरिता दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांनी गूळ निर्मितीतून शासकीय मदतीविना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावात व मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात अशी गूळ निर्मिती उद्योगांची संख्या (गुऱ्हाळ) सुमारे १०० पेक्षा अधिक आहे.

मोहन भोयरलाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीपात्राच्या खोऱ्यात दोन्ही राज्यातील शेतकरी मागील २०० वर्षांपासून ऊस लागवड करीत आहेत. ऊस विक्री करणे व मोबदला बराच वेळ लागत असल्याने त्यातून मार्ग काढण्याकरिता दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांनी गूळ निर्मितीतून शासकीय मदतीविना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावात व मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात अशी गूळ निर्मिती उद्योगांची संख्या (गुऱ्हाळ) सुमारे १०० पेक्षा अधिक आहे.तुमसर तालुक्यातील देवनारा, चांद मारा, लोभी, आष्टी, पाथरी, धुटे रा, कवलेवाडा, घानोड, सक्करधरा, सोंड्या टोला इत्यादी गावे नदीकाठावर असून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील गोरे घाट, बड पाणी, महके पार, अंजनविहिरी, दिगघा, बाम्हणी, पुलप्पू ट्टा, हरदोली, छ तेरा, टेकाडी इत्यादी गावे आहेत. या गावात ऊसाची शेती मागील दोनशे वर्षांपासून करणे सुरू आहे. गावातील कोहळी समाज बांधवांची या परिसरात मोठी संख्या आहे. ऊसशेती लागवड करण्यात त्यांचा हातखंडा आहे.  शेतकरी ऊसाची लागवड करीत असल्यामुळे त्यांना ऊसाचे भरघोस उत्पादन होते. परंतु हा ऊस विक्री करण्यास त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच ऊस विक्री केल्यानंतर त्याचा मोबदला मिळण्यास बराच विलंब होतो.  येथील शेतकऱ्यांनी ऊस उद्योग निर्माण करण्यावर भर देऊन गूळ उद्योगाची निर्मिती केली.  आष्टीचे माजी सरपंच व शेतकरी डॉ. अमृत सोनवणे यांनी सांगितले की बावनथडी नदीखोऱ्यात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेतकरी मागील २०० ते २५९ वर्षांपासून ऊसाची शेती करीत असून येथे मोठ्या प्रमाणात गूळ निर्मिती करण्यात येते. ७०  वर्षांपूर्वी या परिसरात विद्युतीकरण झाले नव्हते. तेव्हा ऊसाचा रस काढण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या क्रशरला बैल उपयोगात आणले जात होते. त्यानंतर डिझेल आणि क्रूड ऑइलच्या मदतीने  क्रशरचा उपयोग करण्यात येऊन ऊसापासून रस काढण्यात येत होता.

शासनाकडून मदत नाही- येथील शेतकऱ्यांनी गूळ उद्योग निर्मिती केली. शेकडो महिला व पुरुषांना रोजगार मिळत आहे.  परंतु शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीच मदत मिळत नाही. ऊस गाळप हंगाम डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत सुरू राहते. दोन्ही राज्याच्या सीमावर्ती भागात गूळ निर्मिती केंद्राची संख्या १०० पेक्षा अधिक आहे हे विशेष.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती