शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

गूळ निर्मितीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीपात्राच्या खोऱ्यात दोन्ही राज्यातील शेतकरी मागील २०० वर्षांपासून ऊस लागवड करीत आहेत. ऊस विक्री करणे व मोबदला बराच वेळ लागत असल्याने त्यातून मार्ग काढण्याकरिता दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांनी गूळ निर्मितीतून शासकीय मदतीविना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावात व मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात अशी गूळ निर्मिती उद्योगांची संख्या (गुऱ्हाळ) सुमारे १०० पेक्षा अधिक आहे.

मोहन भोयरलाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीपात्राच्या खोऱ्यात दोन्ही राज्यातील शेतकरी मागील २०० वर्षांपासून ऊस लागवड करीत आहेत. ऊस विक्री करणे व मोबदला बराच वेळ लागत असल्याने त्यातून मार्ग काढण्याकरिता दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांनी गूळ निर्मितीतून शासकीय मदतीविना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावात व मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात अशी गूळ निर्मिती उद्योगांची संख्या (गुऱ्हाळ) सुमारे १०० पेक्षा अधिक आहे.तुमसर तालुक्यातील देवनारा, चांद मारा, लोभी, आष्टी, पाथरी, धुटे रा, कवलेवाडा, घानोड, सक्करधरा, सोंड्या टोला इत्यादी गावे नदीकाठावर असून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील गोरे घाट, बड पाणी, महके पार, अंजनविहिरी, दिगघा, बाम्हणी, पुलप्पू ट्टा, हरदोली, छ तेरा, टेकाडी इत्यादी गावे आहेत. या गावात ऊसाची शेती मागील दोनशे वर्षांपासून करणे सुरू आहे. गावातील कोहळी समाज बांधवांची या परिसरात मोठी संख्या आहे. ऊसशेती लागवड करण्यात त्यांचा हातखंडा आहे.  शेतकरी ऊसाची लागवड करीत असल्यामुळे त्यांना ऊसाचे भरघोस उत्पादन होते. परंतु हा ऊस विक्री करण्यास त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच ऊस विक्री केल्यानंतर त्याचा मोबदला मिळण्यास बराच विलंब होतो.  येथील शेतकऱ्यांनी ऊस उद्योग निर्माण करण्यावर भर देऊन गूळ उद्योगाची निर्मिती केली.  आष्टीचे माजी सरपंच व शेतकरी डॉ. अमृत सोनवणे यांनी सांगितले की बावनथडी नदीखोऱ्यात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेतकरी मागील २०० ते २५९ वर्षांपासून ऊसाची शेती करीत असून येथे मोठ्या प्रमाणात गूळ निर्मिती करण्यात येते. ७०  वर्षांपूर्वी या परिसरात विद्युतीकरण झाले नव्हते. तेव्हा ऊसाचा रस काढण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या क्रशरला बैल उपयोगात आणले जात होते. त्यानंतर डिझेल आणि क्रूड ऑइलच्या मदतीने  क्रशरचा उपयोग करण्यात येऊन ऊसापासून रस काढण्यात येत होता.

शासनाकडून मदत नाही- येथील शेतकऱ्यांनी गूळ उद्योग निर्मिती केली. शेकडो महिला व पुरुषांना रोजगार मिळत आहे.  परंतु शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीच मदत मिळत नाही. ऊस गाळप हंगाम डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत सुरू राहते. दोन्ही राज्याच्या सीमावर्ती भागात गूळ निर्मिती केंद्राची संख्या १०० पेक्षा अधिक आहे हे विशेष.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती