शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

पीकविमा कंपनीचा हेल्पलाइन नंबरच व्यस्त; नोंदणी होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:32 IST

Bhandara : नोंदणी करताना अडचण, शेतकऱ्यांच्या नाकीनव

लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : शुक्रवार व शनिवारला लाखनी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी लागली. त्यामुळे कापलेले धान अर्थात कडपा पाण्यात भिजल्या. पिकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी कृषी व महसूल विभाग तसेच पीकविमा कंपनीच्या अभिकर्त्यांशी संपर्क साधला.

सर्वांनी पिकविमा कंपनीच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार प्रयत्न करून सुद्धा अॅपला नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी कंटाळला आहे. अखेर पीकविमा काय कामाचा? असाच प्रश्न शेतकरी विचारीत आहे. 

संकटकालीन स्थितीत पिकविमा कामात यावा हा खरा हेतू निष्फळ ठरत आहे. तालुक्यातील बऱ्याच गावात कनेक्टिव्हिटीचा प्रश्न ऐरणीवर आहे. कित्येक शेतकऱ्यांजवळ स्मार्टफोन नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना स्मार्टफोनचा वापर करता येत नाही. शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत पीकविमा कंपनीच्या वेबसाइटवर नोंद करणे अत्यावश्यक समजले आहे. मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वास्तव समस्यांमुळे संबंधित विमाकंपनीच्या वेबसाइटवर नुकसान नोंदविणे वेळेत शक्य होत नाही. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मिळणे अशक्य आहे. 

गतवर्षीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कृषी विभागाच्यावतीने पंचनामेही करण्यात आले. मात्र भरपाई मिळालेली नाही. विमा कंपन्यांनी भरपाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले. 

"प्रत्येक शेतकऱ्यांना कंपनीचा अभिकर्ता ७२ तासांत भेटणे शक्य नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत अॅपवर नुकसान नोंदविणे अशक्यच दिसत आहे. संपूर्ण भारतभर १४४४७ हा एकच हेल्पनंबर आहे. काही ठिकाणी कव्हरेजचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे नोंदणीला अडचण जात आहे." - अनुराग गजभिये, पीकविमा अभिकर्ता

"कापणी झालेल्या धानाच्या कडपा पावसाने भिजल्या. माहितीनुसार हेल्पलाइन नंबरची संपर्क केला. मात्र दिवसभरात संपर्क न झाल्याने नोंद होऊ शकली नाही. शासन व प्रशासनाने स्थानिक स्तरावर किंवा सेवा सहकारी संस्थेत नोंदणीचे अधिकार द्यावे." - बबलू वैरागडे, प्रभावित शेतकरी, पालांदूर

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रbhandara-acभंडारा