शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने विस्तार अधिकारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 05:00 IST

मंगळवारी रात्री ते लाखनी वरुन भंडारा येथे आले. जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेऊन  ते खात रोडवरील आपल्या घराकडे जात होते. खांब तलाव चौकातील खड्डेमय रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक खड्ड्यातून उसळली आणि ते दुचाकीसह खाली कोसळले. त्याचवेळी मागेहून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली त्यांचे डोके आले. अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खड्ड्यातून दुचाकी स्लीप झाल्यानंतर त्याचवेळी मागेहून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली डोके चिरडून विस्तार अधिकारी जागीच ठार झाला. ही घटना भंडारा शहरातील खांब तलाव चौकात मंगळवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. शहरातील खड्ड्यांनी गत दहा दिवसात तीन बळी घेतले. केवळराम सहादेव पंचभाई (४२) रा. गंगानगर, खात रोड खोकरला, भंडारा असे मृताचे नाव आहे. ते लाखनी पंचायत समितीमध्ये महिला व बालविकास प्रकल्प विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री ते लाखनी वरुन भंडारा येथे आले. जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेऊन  ते खात रोडवरील आपल्या घराकडे जात होते. खांब तलाव चौकातील खड्डेमय रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक खड्ड्यातून उसळली आणि ते दुचाकीसह खाली कोसळले. त्याचवेळी मागेहून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली त्यांचे डोके आले. अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. यावेळी वीजपुरवठा ही खंडित झाला होता आणि पाऊसही सुरू होता.  या घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तोपर्यंत ट्रक पसार झाला होता. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या अपघाताचा तपास ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत. 

पत्नीने ९ वाजता केला होता फोन- दररोज वेळेत घरी येणारे केवळराम मंगळवारी रात्री ९     वाजेपर्यंतही घरी आले नाही. म्हणून पत्नीने त्यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी पाऊस असल्याने जिल्हा परिषदेत थांबल्याचे सांगितले. पाऊस थांबला की घराकडे निघतो असेही सांगितले. मात्र, त्यानंतर पत्नीने १० वाजताच्या सुमारास फोन लावला तेव्हा फोन बंद येत होता. दरम्यान काही वेळात या अपघाताची माहितीच पत्नीला मिळाली. कुटुंबावर जणू आभाळच कोसळले.बांधकाम विभाग आणखी किती जणांचे बळी घेणार?- शीतलामाता मंदिर परिसरात रस्त्याचे काम गत तीन वर्षांपासून थांबले आहे. परिणामी, या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. भंडारा ते रामटेक हा राष्ट्रीय महामार्ग आणि भंडारा ते तुमसर हा राज्य मार्ग येथूनच जातो. शीतला माता मंदिर, बहिरंगेश्वर चौक, किसान चौक, शास्त्री नगर आणि वरठीपर्यंत या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, पावसामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नाही आणि अपघात होत आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघात