शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

ज्येष्ठांनी गिरविले धडे; किती आजी-आजोबांनी दिली परिक्षा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:22 IST

नवभारत साक्षरता अभियान : नातवांच्या शाळेत ज्येष्ठांनी दिली परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवभारत साक्षरता अभियानांतर्गत जिल्ह्यातील आजी आजोबांची रविवारी (दि. २३) जिल्ह्यातील विविध शाळांच्या केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी कौशल्य विकासाबाबत धडे गिरविले.

केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या निरक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. नातवांच्या शाळेत परीक्षा देण्याची अनुभूती आजोबांना आली. या परिक्षेत दिव्यांगांचाही समावेश दिसून आला. त्यांच्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली.

कौशल्ये विकासावर भरकौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि निरक्षण, कुटुंब कल्याण आदी कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला.

असा होता पेपरकेंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत राबविण्यात येत आहे. १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून देशातील निरक्षर व्यक्तींमध्ये महत्वपूर्ण कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने पेपरचे स्वरूप होते. याचा फायदा नवसाक्षरांना मिळणार आहे.

७६९ केद्रजिल्ह्यात ७६९ परिक्षा केंद्रांवरून ही परीक्षा घेण्यात आली. परिक्षेला ७,०६५ निरक्षर बसले होते. यामध्ये पुरुष परीक्षार्थीची संख्या ४ हजार ५०९, तर २ हजार ५५६ महिला परीक्षार्थीचा समावेश होता.

दिव्यांग निरक्षरांना मिळाली ३० मिनिटे जास्तनिरक्षर व्यक्तींसाठी जिल्हा परिषद शाळांच्या केंद्रांवर सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० यावेळेत परीक्षा नियोजित होती. ८ दिव्यांगांनी परिक्षा दिली. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी तीन तासांचा होता. मात्र, दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ देण्यात आला. याचा फायदा अनेक दिव्यांगांना झाला.

७,०६५ जणांनी दिली परिक्षाजिल्ह्यात ७,१५२ निरक्षर आजी आजोबांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी ७,०६५ आजी-आजोबांनी परिक्षा दिली. जिल्हाभरातील जि. प. शाळा व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ही परीक्षा नियोजित होती. यामध्ये संवर्ग तसेच भाषानिहाय वर्गवारीचाही समावेश होता. परिक्षेला ८७ जणांनी दांडी मारली. यात ५९ पुरूषांचा समावेश होता.

"समाजाच्या प्रगतीत सक्षमपणे योगदान देण्यासाठी नवसाक्षरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला."- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प. भंडारा. 

टॅग्स :bhandara-acभंडारा