शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

ज्येष्ठांनी गिरविले धडे; किती आजी-आजोबांनी दिली परिक्षा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:22 IST

नवभारत साक्षरता अभियान : नातवांच्या शाळेत ज्येष्ठांनी दिली परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवभारत साक्षरता अभियानांतर्गत जिल्ह्यातील आजी आजोबांची रविवारी (दि. २३) जिल्ह्यातील विविध शाळांच्या केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी कौशल्य विकासाबाबत धडे गिरविले.

केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या निरक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. नातवांच्या शाळेत परीक्षा देण्याची अनुभूती आजोबांना आली. या परिक्षेत दिव्यांगांचाही समावेश दिसून आला. त्यांच्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली.

कौशल्ये विकासावर भरकौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि निरक्षण, कुटुंब कल्याण आदी कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला.

असा होता पेपरकेंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत राबविण्यात येत आहे. १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून देशातील निरक्षर व्यक्तींमध्ये महत्वपूर्ण कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने पेपरचे स्वरूप होते. याचा फायदा नवसाक्षरांना मिळणार आहे.

७६९ केद्रजिल्ह्यात ७६९ परिक्षा केंद्रांवरून ही परीक्षा घेण्यात आली. परिक्षेला ७,०६५ निरक्षर बसले होते. यामध्ये पुरुष परीक्षार्थीची संख्या ४ हजार ५०९, तर २ हजार ५५६ महिला परीक्षार्थीचा समावेश होता.

दिव्यांग निरक्षरांना मिळाली ३० मिनिटे जास्तनिरक्षर व्यक्तींसाठी जिल्हा परिषद शाळांच्या केंद्रांवर सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० यावेळेत परीक्षा नियोजित होती. ८ दिव्यांगांनी परिक्षा दिली. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी तीन तासांचा होता. मात्र, दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ देण्यात आला. याचा फायदा अनेक दिव्यांगांना झाला.

७,०६५ जणांनी दिली परिक्षाजिल्ह्यात ७,१५२ निरक्षर आजी आजोबांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी ७,०६५ आजी-आजोबांनी परिक्षा दिली. जिल्हाभरातील जि. प. शाळा व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ही परीक्षा नियोजित होती. यामध्ये संवर्ग तसेच भाषानिहाय वर्गवारीचाही समावेश होता. परिक्षेला ८७ जणांनी दांडी मारली. यात ५९ पुरूषांचा समावेश होता.

"समाजाच्या प्रगतीत सक्षमपणे योगदान देण्यासाठी नवसाक्षरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला."- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प. भंडारा. 

टॅग्स :bhandara-acभंडारा