शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

क्रूरतेचा कळस! तलवारीने सपासप २६ वार करत शिर केले धडावेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 20:38 IST

Bhandara News चुलत बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तलवारीने एक-दोन नव्हे, तर तब्बल २६ वार करून चक्क शिर धडावेगळे केले. क्रूरतेचा कळस गाठणारी ही घटना तुमसर येथे एका हाॅटेलसमोर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली.

ठळक मुद्दे चुलत बहिणीला पळविल्याचा रागातून घडली घटना

भंडारा : चुलत बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तलवारीने एक-दोन नव्हे, तर तब्बल २६ वार करून चक्क शिर धडावेगळे केले. क्रूरतेचा कळस गाठणारी ही घटना तुमसर येथे एका हाॅटेलसमोर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पाहणाऱ्यांनाही अंगावर शहारे येतात. साेबतच क्रूरता गाठणाऱ्या तरुणांनाबद्दल घृणाही निर्माण हाेते.

सचिन गजानन मस्के (वय ३४) रा. शिवाजीनगर तुमसर असे मृत तरुणाचे नाव आहे, तर कुलदीप मनोहर लोखंडे (२९), केतन दिलीप मदारकर (२८) आणि रंजीत सहदेव गभणे (३२) रा. तिघेही रा. शिवाजीनगर तुमसर यांना अटक करण्यात आली. सचिन आणि तीनही आरोपी यांच्यात मैत्री होती. एकमेकांचे मित्र असल्याने घरी येणे-जाणे होते. त्यातच यातील एका आरोपीच्या बहिणीसोबत सचिनचे सूत जुळले. अचानक २७ मे रोजी सचिन त्या तरुणीला घेऊन पसार झाला. पोलिसांनी तरुणीसह सचिनला १ जून रोजी नागपूर बसस्थानकावरून ताब्यात घेतले. तरुणीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले, तर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावून सचिनला घरी पाठविले.

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सचिनसह तीन आरोपी देव्हाडी रोडवरील हाॅटेलमध्ये गेले. तेथे जेवण आटोपून बाहेर पडल्यानंतर काळजाचा थरकाप उडेल अशा पद्धतीने सचिनचा निर्घृण खून केला. दुचाकीवर बसून असलेल्या सचिनवर प्रथम चाकूने मानेवर वार केला. खाली कोसळल्यावर कुलदीपने तलवारीने सपासप वार केले. तीन वारातच सचिनने प्राण सोडला. मात्र, निर्दयी आणि क्रूरतेने सचिन मृत्यूमुखी पडल्यानंतरही त्याच्यावर सपासप वार करून शिर धडापासून वेगळे केले.

तिघांनाही अटक

सचिन मस्के याचा खून केल्यानंतर तिघेही एकाच दुचाकीने घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, ही घटना प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिसांनी रात्री शोध घेऊन कुलदीप लोखंडे, केतन मदारकर, रंजीत गभणे या तिघांना अटक केली. शनिवारी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळाला भेट दिली.

रेल्वेचे आरक्षण रद्द केले नसते तर वाचले असते प्राण

प्रेमप्रकरणात अपयश आल्याने सचिन दु:खी झाला होता. तुमसर सोडून जायचा त्याने निर्धार केला होता. मुंबईला जाण्यासाठी त्याने ३  जून रोजीचे रेल्वे आरक्षणही केले होते. मात्र, अचानक २ जूनला सकाळी सचिनने आरक्षण रद्द केले. आरक्षण रद्द केले नसते आणि मुंबईत गेला असता तर प्राण वाचले असते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी