शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपोषण करणाऱ्या तिघांची प्रकृती खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 14:29 IST

Bhandara : प्रकल्पग्रस्त म्हणतात, पालकमंत्र्यांशी बैठक लावा, समस्या सोडवा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने गांधी जयंतीपासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. यामध्ये तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून, प्रशासनाने याबाबत कुठलीही दखल घेतलेली नाही. दरम्यान शनिवारी पालकमंत्री भंडाऱ्यात येत असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक लावावी, अशा प्रकारचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांनी दिले आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त नौकरीकरिता प्रमाणपत्र देण्यात आले होते. ते २०२२-२३ पासून रद्द करण्यात आले होते, ते पूर्ववत बहाल करण्यात यावे, वाढीव कुटुंबांतर्गत पात्र व्यक्तीला दोन लाख ९० हजारांची मदत देण्यात यावी, गोसेखुर्द बाधीत भूमिहीनांना शेतजमीन देण्यात यावी, प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे, त्या गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे आणि ज्यांची ७५ टक्के शेतजमीन संपादित झाली आहे, अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

आमरण उपोषण करणाऱ्यांमध्ये संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे, सचिव शेषराज रामटेके, अतुल राघोर्ते, सुनील भोपे, प्रमिला शहारे, मंगेश पडोळे, कमलेश सुखदेवे, बालू ठवकर, पुरुषोत्तम गायधने, मयुरी सुखदेवे, दिनेश राघोर्ते व नखातेंचा समावेश आहे. दरम्यान सुरू असलेल्या आंदोलनाला तीन दिवस लोटूनही अधिकारी भेट देण्यासाठी आले नाही. 

घेतली निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट आंदोलनकर्त्यांचा शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांची दुपारी भेट घेतली आणि निवेदन सादर केले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या रास्त असूनही प्रशासन आणि सरकार मनावर घेत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. या आंदोलनाची व मागणीची तीव्रता प्रशासनाने लक्षात घ्यावी आणि सरकारच्या कानावर टाकून या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रमिला शहारे, जयश्री वंजारी, शेषराज रामटेके, वर्षा वंजारी, अतुल राघोर्ते तसेच सुरेवाडा, खमारी व कोथुर्णातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :bhandara-acभंडाराStrikeसंप