शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

सानगडीच्या वैभवाची साक्ष देते किल्यावरील अजस्त्र ताेफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 16:16 IST

आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्याची मात्र आता दुरवस्था हाेत आहे.

ठळक मुद्देपुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : सुरक्षा व दुरुस्तीकडे प्रशासनाने फिरविली पाठ

संजय साठवणे

साकाेली (भंडारा) : भोसलेकालीन सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यावर असलेली अजस्त्र तोफ गतवैभवाची साक्ष देते. शेकडाे वर्षांपासून ऊन, पावसाचा मारा झेलत आजही ही बुलंद तोफ किल्ल्यावर कायम आहे. मात्र, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तोफेची पुरातत्व विभागाकडे साधी नाेंदही नाही. दुसरीकडे प्रशासनानेही सुरक्षा व दुरुस्तीकडे पाठ फिरविली आहे.

साकाेली तालुक्यात भोसलेकालीन सहानगड म्हणजे आजचे ऐतिहासिक वारसा सांगणारे सानगडी गाव. सुमारे अडीच हेक्टर क्षेत्रात असलेला प्राचीन किल्ला, बाहुडी, प्रवेशद्वार यासह इतिहासाच्या साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू या परिसरात विखुरलेल्या आहे. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्याची मात्र आता दुरवस्था हाेत आहे.

सानगडीच्या किल्ल्यावर अष्टधातूंची माेठी तोफ आहे. या तोफेची लांबी ११ फूट, घेर पाच फूट आणि पाच कडे आहेत. या तोफेच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. शत्रूंवर तोफेने मारा करताना टाकीतील पाण्यात बसले जायचे, त्यामुळे बहिरेपणा येत नव्हता. तत्कालीन भाेसले राजांनी सुद्धा या तोफेला बैलजोडी आणि हत्ती आणून हलविण्याचा प्रयत्न केला. परंतु ताे असफल ठरला त्यानंतर मात्र कुणीही या तोफेला बाहेर नेण्याचा प्रयत्न केला नाही.

तोफेपुढे बोलला जाताे नवस !

तोफेला परिसरातील नागरिक तोफमाय म्हणून संबोधतात. इंग्रजांनी या तोफेला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. आजही जुने जाणते लाेक सांगतात की, दैवी शक्तीमुळे तोफ जागेची हालत सुद्धा नाही. त्यामुळेच दैवी शक्ती असल्याचा दावा करून या तोफेपुढे नवस बोलल्या जाते.

स्वातंत्र चळवळीत सहभाग

सानगडी स्वतांत्र्यापूर्वी वीर पुरुषांची कर्मभूमी हाेती. पूर्वी येथे जगन्नाथ गोलीवार यांच्या नेतृत्वात प्रभात फेरी निघायची, करेंगे या मरेंगे या आंदाेलनात त्यांच्या मागे पाेलीस लागल्याने ते भूमिगत झाले. भारत छोडो आंदाेलनात सोमा काशीनाथ बोकडे यांच्यासह ३१ लाेकांना कारागृहात पाठविण्यात आले हाेते.

साकाेली परिसरातील सानगडी येथे भोसलेकालीन किल्ला आहे. स्थानिक कारभार पाहण्यासाठी सानगडी येथे किल्ला बांधण्यात आला हाेता. परंतु आता किल्ल्याची पडझड झाली आहे. पुरातत्व विभाग व शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे पंचधातूंची तोफ हाेय. ही तोफ पुजे-अर्चेपुरती मर्यादित झाली आहे.

-प्रा. डाॅ. किशाेर नागपुरे, इतिहास विभाग प्रमुख, एम. बी. पटेल महाविद्यालय साकाेली.

टॅग्स :historyइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणSocialसामाजिक